HomeArchiveम्हाडा काढणार मुंबई...

म्हाडा काढणार मुंबई व उपनगरातील २३८ घरांची लॉटरी!

Details
म्हाडा काढणार मुंबई व उपनगरातील २३८ घरांची लॉटरी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई व उपनगरातील २३८ घरांची म्हाडातर्फे लॉटरी काढण्यात येणार असून यामध्ये कमी उत्पन्न व उच्च उत्पन्न गटातील लोकांना ही घरे देण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ही लॉटरी काढण्यात येईल, असा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि मुंबई दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर उपस्थित होते.

 

मुंबई व उपनगरात १०८ व्यावसायिक गाळे आहेत त्यांचीही लॉटरी काढण्यात येणार असून म्हाडाच्या कन्नमवार नगर, टिळक नगर, चेंबूर, टागोरनगर येथे ५६ मोकळ्या जागा आहेत. त्यावर काही लोकांनी एक मजल्याची घरे तसेच झोपडया उभ्या केल्या आहेत. त्यांच्यावर एमआरटीपी कायद्याखाली कारवाई करून जागा मोकळ्या करण्यात येणार आहेत, असे सांगताना चव्हाण यांनी म्हाडाचे अधिकारी याबाबत दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

गोरेगाव पहाडी येथे तसेच मोतीलाल नगर याठिकाणी म्हाडा ७००३ घरे बांधणार आहे. काही जागांवर आरक्षणे आहेत, त्याबाबतीतही संबंधित आधिकाऱ्यांना लक्ष देण्यास सांगितले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई व उपनगरातील २३८ घरांची म्हाडातर्फे लॉटरी काढण्यात येणार असून यामध्ये कमी उत्पन्न व उच्च उत्पन्न गटातील लोकांना ही घरे देण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ही लॉटरी काढण्यात येईल, असा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि मुंबई दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर उपस्थित होते.

 

मुंबई व उपनगरात १०८ व्यावसायिक गाळे आहेत त्यांचीही लॉटरी काढण्यात येणार असून म्हाडाच्या कन्नमवार नगर, टिळक नगर, चेंबूर, टागोरनगर येथे ५६ मोकळ्या जागा आहेत. त्यावर काही लोकांनी एक मजल्याची घरे तसेच झोपडया उभ्या केल्या आहेत. त्यांच्यावर एमआरटीपी कायद्याखाली कारवाई करून जागा मोकळ्या करण्यात येणार आहेत, असे सांगताना चव्हाण यांनी म्हाडाचे अधिकारी याबाबत दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

गोरेगाव पहाडी येथे तसेच मोतीलाल नगर याठिकाणी म्हाडा ७००३ घरे बांधणार आहे. काही जागांवर आरक्षणे आहेत, त्याबाबतीतही संबंधित आधिकाऱ्यांना लक्ष देण्यास सांगितले आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.”
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content