HomeArchiveमोदींचे हस्तक!

मोदींचे हस्तक!

Details
मोदींचे हस्तक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

आगामी लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांत पीडली गेलेली जनता सत्तांतर पाहण्यास आतूर आहे. काँग्रेसचे तरूण अध्यक्ष राहुल गांधी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी झटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निर्भीडपणे हल्ला चढवीत आहेत. त्यांच्या भगिनी प्रियांका गांधीदेखील त्यांना मदत करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. देशातील 22 छोटे-मोठे विरोधी पक्ष देश मोदीमुक्त करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पण मोदीविरोधकांचा मुखवटा धारण करून काही मोदीहस्तक त्यांच्या मार्गात खोडा घालत आहेत.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 31 टक्के तर विरोधकांना 69 टक्के मते मिळाली. विरोधकांच्या मतांचे असे विभाजन झाले नसते तर भाजपा सत्तेच्या जवळपासदेखील पोहोचली नसती. मोदी पंतप्रधान झाले नसते. पण इंग्रजांप्रमाणे विरोधकांमध्ये फाटाफूट करून सत्ता काबीज करण्याचे कसब भाजपाला चांगलेच जमले आहे.

 

दक्षिणेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मोदींचे प्रमुख हस्तक आहेत. मोदी विरोधकांमध्ये फूट पाडण्याची त्यांनी सुपारीच घेतली आहे. एकीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू विरोधकांच्या ऐक्यासाठी झटत असताना दुसरीकडे के. चंद्रशेखर राव तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राव यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाल्यामुळे हे यश त्यांच्या डोक्यात शिरले आहे. ते स्वत:ला राष्ट्रीय नेते समजू लागले आहेत. राव यांना भाजपाने विरोधकांमध्ये फूट पाडण्याची सुपारी दिली, हे खुले गुपित आहे. आपले काम राव इमानेइतबारे करीत आहेत. दक्षिणेतील मोदींचे ते प्रमुख हस्तक आहेत.

 

उत्तर प्रदेशात मोदी विजयाचा मार्ग सुकर करण्याची सुपारी एका नव्हे तर दोन विरोधी पक्षांनी घेतली आहे. अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि मायावती यांचा बहुजन समाज पक्ष हे ते दोन पक्ष होय. काही दिवसांपूर्वी या दोन पक्षांचे मनोमीलन झाले. पण आपल्या आघाडीत त्यांनी काँग्रेसला स्थान दिले नाही. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेशात त्यांना तुफानी प्रतिसाद मिळू लागला. प्रियांका यांच्या राजकारण प्रवेशानंतर तरी अखिलेश-मायावती काँग्रेसला आपल्याबरोबर घेतील, असे वाटत होते. पण तसे घडले नाही. गुरूवारी या दोन पक्षांनी आपले जागावाटप जाहीर केले. राज्यातील लोकसभेच्या 80 जागांपैकी 75 जागा या दोन पक्षांनी आपसात वाटून घेतल्या आहेत. त्यापैकी बहुजन समाज पार्टीच्या वाट्याला 38 जागा आल्या आहेत, तर समाजवादी पार्टीला 37 जागा मिळाल्या आहेत. तीन जागा त्यांनी राष्ट्रीय लोकदलचे अजित सिंह यांच्यासाठी सोडल्या आहेत. गांधी परिवाराचा गड असलेल्या अमेठी आणि रायबरेली या जागांना त्यांनी स्पर्श केलेला नाही. या दोन्ही जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडल्या आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसचा प्रभाव कमी झाला आहे, यात वाद नाही. पण प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशानंतर तेथील राजकीय समीकरणे बदलतील, यात शंका नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला सन्मानाने बरोबर घेण्याऐवजी अखिलेश आणि मायावती यांनी काँग्रेसला दूर लोटणे म्हणजे सरळसरळ भाजपाला मदत करणे होय.

 

लोकसभेत भाजपाला अशाप्रकारे मैत्रीचा हात दिल्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत या दोन पक्षांना एकमेकांच्या सहाय्याने आणि भाजपाच्या वरदहस्ताने सत्ता मिळविता येईल, यात शंका नाही. भाजपाला विरोध करण्याचा आव आणीत धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करायची आणि भाजपाला मदत करायची, ही मोदी हस्तकांची किळसवाणी रणनीती आहे. या संधीसाधू राजकारणाचा करावा तितका निषेध थोडाच आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

आगामी लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांत पीडली गेलेली जनता सत्तांतर पाहण्यास आतूर आहे. काँग्रेसचे तरूण अध्यक्ष राहुल गांधी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी झटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निर्भीडपणे हल्ला चढवीत आहेत. त्यांच्या भगिनी प्रियांका गांधीदेखील त्यांना मदत करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. देशातील 22 छोटे-मोठे विरोधी पक्ष देश मोदीमुक्त करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पण मोदीविरोधकांचा मुखवटा धारण करून काही मोदीहस्तक त्यांच्या मार्गात खोडा घालत आहेत.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 31 टक्के तर विरोधकांना 69 टक्के मते मिळाली. विरोधकांच्या मतांचे असे विभाजन झाले नसते तर भाजपा सत्तेच्या जवळपासदेखील पोहोचली नसती. मोदी पंतप्रधान झाले नसते. पण इंग्रजांप्रमाणे विरोधकांमध्ये फाटाफूट करून सत्ता काबीज करण्याचे कसब भाजपाला चांगलेच जमले आहे.

 

दक्षिणेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मोदींचे प्रमुख हस्तक आहेत. मोदी विरोधकांमध्ये फूट पाडण्याची त्यांनी सुपारीच घेतली आहे. एकीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू विरोधकांच्या ऐक्यासाठी झटत असताना दुसरीकडे के. चंद्रशेखर राव तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राव यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाल्यामुळे हे यश त्यांच्या डोक्यात शिरले आहे. ते स्वत:ला राष्ट्रीय नेते समजू लागले आहेत. राव यांना भाजपाने विरोधकांमध्ये फूट पाडण्याची सुपारी दिली, हे खुले गुपित आहे. आपले काम राव इमानेइतबारे करीत आहेत. दक्षिणेतील मोदींचे ते प्रमुख हस्तक आहेत.

 

उत्तर प्रदेशात मोदी विजयाचा मार्ग सुकर करण्याची सुपारी एका नव्हे तर दोन विरोधी पक्षांनी घेतली आहे. अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि मायावती यांचा बहुजन समाज पक्ष हे ते दोन पक्ष होय. काही दिवसांपूर्वी या दोन पक्षांचे मनोमीलन झाले. पण आपल्या आघाडीत त्यांनी काँग्रेसला स्थान दिले नाही. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेशात त्यांना तुफानी प्रतिसाद मिळू लागला. प्रियांका यांच्या राजकारण प्रवेशानंतर तरी अखिलेश-मायावती काँग्रेसला आपल्याबरोबर घेतील, असे वाटत होते. पण तसे घडले नाही. गुरूवारी या दोन पक्षांनी आपले जागावाटप जाहीर केले. राज्यातील लोकसभेच्या 80 जागांपैकी 75 जागा या दोन पक्षांनी आपसात वाटून घेतल्या आहेत. त्यापैकी बहुजन समाज पार्टीच्या वाट्याला 38 जागा आल्या आहेत, तर समाजवादी पार्टीला 37 जागा मिळाल्या आहेत. तीन जागा त्यांनी राष्ट्रीय लोकदलचे अजित सिंह यांच्यासाठी सोडल्या आहेत. गांधी परिवाराचा गड असलेल्या अमेठी आणि रायबरेली या जागांना त्यांनी स्पर्श केलेला नाही. या दोन्ही जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडल्या आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसचा प्रभाव कमी झाला आहे, यात वाद नाही. पण प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशानंतर तेथील राजकीय समीकरणे बदलतील, यात शंका नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला सन्मानाने बरोबर घेण्याऐवजी अखिलेश आणि मायावती यांनी काँग्रेसला दूर लोटणे म्हणजे सरळसरळ भाजपाला मदत करणे होय.

 

लोकसभेत भाजपाला अशाप्रकारे मैत्रीचा हात दिल्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत या दोन पक्षांना एकमेकांच्या सहाय्याने आणि भाजपाच्या वरदहस्ताने सत्ता मिळविता येईल, यात शंका नाही. भाजपाला विरोध करण्याचा आव आणीत धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करायची आणि भाजपाला मदत करायची, ही मोदी हस्तकांची किळसवाणी रणनीती आहे. या संधीसाधू राजकारणाचा करावा तितका निषेध थोडाच आहे.”
 
 
 

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content