HomeArchiveमुंबई, कोकण किनारपट्टीवरील...

मुंबई, कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा दिलासा

Details
“मुंबई, कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा दिलासा”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डिझेलवरील कर परताव्याच्या वाटपास सुरूवात
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेलवरील विक्रीकर परताव्याची रक्कम शासनाने मंजूर केली आहेत. यामुळे समुद्र किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारामुळे ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

कोकण तसेच मुंबई किनारपट्टीवर मासेमारी करण्यासाठी हायस्पीड नौकांचा वापर केला जातो. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलवर त्यांना कर परतावा मिळणे आवश्यक होते. परंतु अनेक दिवसांपासून ही रक्कम प्रलंबित होती. यासंदर्भात मच्छिमारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मत्स्यविकास विभागाने हा निधी मंजूर केला आहे. त्यासंदर्भातील शासनाचा आदेश सोमवारी, ८ एप्रिल रोजी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी २० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर करण्यात आलेला निधी जिल्हानिहाय वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सिंधुदूर्गमध्ये तीन कोटी, पालघरमध्ये तीन कोटी, ठाण्यात दोन कोटी, रत्नागिरीत तीन कोटी, रायगडमध्ये तीन कोटी, मुंबई उपनगरात तीन कोटी, मुंबई शहर भागात तीन कोटी, असे एकूण २० कोटी रूपये वितरित केले जात आहेत.

एकूण १४२ कोटी रूपयांचे वितरण केले जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा २० कोटींचा आहे. उर्वरित १२२ कोटी रूपयांचे यापुढे दरमहा वाटप केले जाणार आहे. जून २०१९ पर्यंत सर्व वाटप पूर्ण होईल. ही रक्कम वितरित करण्यासाठी संबधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांना वितरण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. उर्वरित रक्कम त्वरित मच्छिमारांना वितरित केली जाणार आहे. मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे देसाई यांनी सांगितले.”
 
“डिझेलवरील कर परताव्याच्या वाटपास सुरूवात
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेलवरील विक्रीकर परताव्याची रक्कम शासनाने मंजूर केली आहेत. यामुळे समुद्र किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारामुळे ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

कोकण तसेच मुंबई किनारपट्टीवर मासेमारी करण्यासाठी हायस्पीड नौकांचा वापर केला जातो. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलवर त्यांना कर परतावा मिळणे आवश्यक होते. परंतु अनेक दिवसांपासून ही रक्कम प्रलंबित होती. यासंदर्भात मच्छिमारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मत्स्यविकास विभागाने हा निधी मंजूर केला आहे. त्यासंदर्भातील शासनाचा आदेश सोमवारी, ८ एप्रिल रोजी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी २० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर करण्यात आलेला निधी जिल्हानिहाय वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सिंधुदूर्गमध्ये तीन कोटी, पालघरमध्ये तीन कोटी, ठाण्यात दोन कोटी, रत्नागिरीत तीन कोटी, रायगडमध्ये तीन कोटी, मुंबई उपनगरात तीन कोटी, मुंबई शहर भागात तीन कोटी, असे एकूण २० कोटी रूपये वितरित केले जात आहेत.

एकूण १४२ कोटी रूपयांचे वितरण केले जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा २० कोटींचा आहे. उर्वरित १२२ कोटी रूपयांचे यापुढे दरमहा वाटप केले जाणार आहे. जून २०१९ पर्यंत सर्व वाटप पूर्ण होईल. ही रक्कम वितरित करण्यासाठी संबधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांना वितरण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. उर्वरित रक्कम त्वरित मच्छिमारांना वितरित केली जाणार आहे. मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे देसाई यांनी सांगितले.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content