HomeArchiveमुंबईतील भाजपा आमदार...

मुंबईतील भाजपा आमदार व नगरसेवक देणार एक महिन्याचा पगार

Details
मुंबईतील भाजपा आमदार व नगरसेवक देणार एक महिन्याचा पगार

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या परीने सहाय्यता करणार आहेत. लोढा यांनी मुंबईतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सामान्यापेक्षा १२ पट जास्त पाऊस पडल्याने शेकडो गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. शेतीचे नुकसान होऊन हजारो घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही व परिधान करण्यासाठी कपडेही नाही. मुंबईतील लोकांचा इतिहास राहिला आहे की, देशात कुठेही आपत्ती आली असल्यास येथील लोक मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अडीच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही लोढा यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या परीने सहाय्यता करणार आहेत. लोढा यांनी मुंबईतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सामान्यापेक्षा १२ पट जास्त पाऊस पडल्याने शेकडो गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. शेतीचे नुकसान होऊन हजारो घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही व परिधान करण्यासाठी कपडेही नाही. मुंबईतील लोकांचा इतिहास राहिला आहे की, देशात कुठेही आपत्ती आली असल्यास येथील लोक मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अडीच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही लोढा यांनी सांगितले.”

Continue reading

५००-१०००च्या जुन्या नोटा अजूनही बदलून मिळणार?

सोशल मीडियाच्या जमान्यात माहिती जितक्या वेगाने पसरते, तितक्याच वेगाने अफवा आणि फसवणुकीचे जाळेही विणले जाते. सध्या इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या (बंदी घातलेल्या) नोटांबाबत मोठा दावा...

‘होर्मुझ’च्या कोंडीमुळे जागतिक विमानसेवा धोक्यात

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणने गेल्या दोन महिन्यांपासून 'होर्मुझची सामुद्रधुनी' रोखून धरल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कठोर लष्करी पावले उचलण्याचे संकेत दिले...

जॅनिक सिनरने मोडला पीट सॅम्प्रासचा ३२ वर्षांपूर्वीचा विक्रम

इटलीच्या स्टार टेनिसपटूने आणि सध्याचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिनरने टेनिसविश्वात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. त्याने एटीपी १००० मास्टर्स स्पर्धेत वर्षाची सुरुवात सलग २० विजयांनी करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. असा पराक्रम करणारा तो नोव्हाक...
Skip to content