HomeArchiveमुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी...

मुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी वातानुकूलित स्वछतागृह!

Details
मुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी वातानुकूलित स्वछतागृह!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

उद्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रूतगती मार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने लांबचा प्रवास करून येणाऱ्या महिलांची कुचंबणा रोजचीच होऊन बसली आहे. या परिस्थितीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून मुंबईतील एकमेव व वातानुकूलित फक्त महिलांसाठी स्वछतागृह साकारले आहे. सामाजिक प्रश्नावर भान जागविणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते रविवारी या स्वच्छतागृहाचे उदघाटन होणार आहे.

दहिसर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. या पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहने प्रचंड संख्येने मुंबईत येत असतात. मात्र या मार्गावर महिलांसाठीचे स्वच्छतागृह शोधूनही सापडत नाही. त्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि तेही फक्त महिलांसाठी स्वछतागृह उभारण्यासाठी दहिसर नाक्याची निवड करण्यात आली आहे. या स्वछतागृहात दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनही बसविण्यात आली आहेत. या शौचालयासाठी स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हाय मास्ट लॅम्प बसविण्यात आला आहे. हे शौचालय मुंबईसाठी एक पॅटर्न म्हणून पुढे यावे अशी रचना करण्यात आली आहे.

 

पालघर, वसई विरारकडून मोठा प्रवास करून मुंबईत प्रवेश करणाऱ्या महिलांसाठी, प्रवेशद्वारावरच फक्त महिलांसाठी हे स्वछतागृह उपलब्ध झाल्याने महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः येथे महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे स्वछतागृहाच्या परिसरात बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहाची गरज

यापूर्वी कांदिवली हायवेला आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. त्याची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या स्वच्छ व नीटनेटक्या स्वच्छतागृहाचे कौतुक करीत, महिलांसाठीही असेच स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह असावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार दहिसर चेकनाक्याजवळ महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.”
 
“उद्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रूतगती मार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने लांबचा प्रवास करून येणाऱ्या महिलांची कुचंबणा रोजचीच होऊन बसली आहे. या परिस्थितीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून मुंबईतील एकमेव व वातानुकूलित फक्त महिलांसाठी स्वछतागृह साकारले आहे. सामाजिक प्रश्नावर भान जागविणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते रविवारी या स्वच्छतागृहाचे उदघाटन होणार आहे.

दहिसर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. या पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहने प्रचंड संख्येने मुंबईत येत असतात. मात्र या मार्गावर महिलांसाठीचे स्वच्छतागृह शोधूनही सापडत नाही. त्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि तेही फक्त महिलांसाठी स्वछतागृह उभारण्यासाठी दहिसर नाक्याची निवड करण्यात आली आहे. या स्वछतागृहात दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनही बसविण्यात आली आहेत. या शौचालयासाठी स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हाय मास्ट लॅम्प बसविण्यात आला आहे. हे शौचालय मुंबईसाठी एक पॅटर्न म्हणून पुढे यावे अशी रचना करण्यात आली आहे.

 

पालघर, वसई विरारकडून मोठा प्रवास करून मुंबईत प्रवेश करणाऱ्या महिलांसाठी, प्रवेशद्वारावरच फक्त महिलांसाठी हे स्वछतागृह उपलब्ध झाल्याने महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः येथे महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे स्वछतागृहाच्या परिसरात बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहाची गरज

यापूर्वी कांदिवली हायवेला आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. त्याची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या स्वच्छ व नीटनेटक्या स्वच्छतागृहाचे कौतुक करीत, महिलांसाठीही असेच स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह असावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार दहिसर चेकनाक्याजवळ महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.”
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content