HomeArchiveमासेमारी बंदीच्या काळातील...

मासेमारी बंदीच्या काळातील नुकसानभरपाई द्या – रमेश पाटील

Details
मासेमारी बंदीच्या काळातील नुकसानभरपाई द्या – रमेश पाटील

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा काळ आहे. या काळात समुद्र खवळलेला असून हा मत्स्य प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे मत्स्यव्यवसाय खात्याने या काळात मासेमारीवर कायद्याने बंदी घातली आहे. या दोन महिन्यांच्या काळात मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने कोळी समाजावर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे कोळी समाजाला राज्यशासनाने उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करून नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे आमदार रमेश पाटील यांनी केली आहे.

 

आपण हा महत्वाचा मुद्दा विधान परिषदेतदेखील मांडला अशी माहिती त्यांनी दिली. मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या काळात खोल समुद्रात मासेमारी करणारे कोळी बांधव, खलाशी व मासे विक्री करणाऱ्या कोळी महिला आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हाताला काम नसल्याने आर्थिक ते विवंचनेत असतात. घरखर्च चालण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मासेमारी करणाऱ्या गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतील कोळी बांधवांना मासेमारी बंदीच्या या काळात गेली अनेक वर्षे आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे राज्य सरकारनेही मासेमारी बंदीच्या काळात आर्थिक नुकसानभरपाई देण्याची तरतूद करावी अशी मागणी रमेश पाटील यांनी केली आहे. राज्यात मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा काळ आहे. या काळात समुद्र खवळलेला असून हा मत्स्य प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे मत्स्यव्यवसाय खात्याने या काळात मासेमारीवर कायद्याने बंदी घातली आहे. या दोन महिन्यांच्या काळात मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने कोळी समाजावर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे कोळी समाजाला राज्यशासनाने उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करून नुकसानभरपाई द्यावी अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे आमदार रमेश पाटील यांनी केली आहे.

 

आपण हा महत्वाचा मुद्दा विधान परिषदेतदेखील मांडला अशी माहिती त्यांनी दिली. मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या काळात खोल समुद्रात मासेमारी करणारे कोळी बांधव, खलाशी व मासे विक्री करणाऱ्या कोळी महिला आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हाताला काम नसल्याने आर्थिक ते विवंचनेत असतात. घरखर्च चालण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मासेमारी करणाऱ्या गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतील कोळी बांधवांना मासेमारी बंदीच्या या काळात गेली अनेक वर्षे आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे राज्य सरकारनेही मासेमारी बंदीच्या काळात आर्थिक नुकसानभरपाई देण्याची तरतूद करावी अशी मागणी रमेश पाटील यांनी केली आहे. राज्यात मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.”
 

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content