HomeArchiveमागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ...

मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

Details
मागाठाण्यातील 2000 ज्येष्ठ नागरिक चालले काशी विश्वनाथ यात्रेला!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आपल्या मुलाने आयुष्यात एकदातरी काशीला घेऊन जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हा योग मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलले आहे. चलो काशी यात्रेला असा पुकार करत मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिक आज खास रेल्वेने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झाले.

मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेने बोरिवली ते वाराणसी असा 36 तासांचा प्रवास केल्यावर येत्या रविवारी पहाटे हे ज्येष्ठ नागरिक वाराणसी स्टेशनला पोहोचतील. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी तेथील पोलीस आयुक्तांनी येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली आहे असे आमदार सुर्वे यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान खास गंगा स्नान, संध्याकाळी गंगा आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान या ज्येष्ठ नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स तसेच सुमारे 100 शिवसैनिक व महिला प्रत्येक डब्यात तैनात राहून त्यांची बडदास्त ठेवतील असे आमदार सुर्वे यांनी सांगितले. त्याचदिवशी रात्री 11 वाजता हे ज्येष्ठ नागरिक परतीच्या प्रवासाला मुंबईकडे रवाना होऊन मंगळवरी 36 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर दुपारी मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आईने मला एकदा तरी काशी यात्रेला घेऊन जा असे सांगितले. आईची इच्छा मी पूर्ण केली. माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकदेखील आई वडिलांप्रमाणे असून कलीयुगातील या श्रावण बाळाने येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची काशी विश्वनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. गेले एक महिना आम्ही या यात्रेची तयारी करत होतो. यापूर्वी येथील जेष्ठ नागरिकांना नाशिक त्र्यंम्बकेश्वर, शिर्डी, पालघरची महालक्ष्मी यांची दर्शनयात्रा आपण आयोजित केली होती असेही सुर्वे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आपल्या मुलाने आयुष्यात एकदातरी काशीला घेऊन जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. हा योग मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य खुलले आहे. चलो काशी यात्रेला असा पुकार करत मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिक आज खास रेल्वेने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झाले.

मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. रेल्वेने बोरिवली ते वाराणसी असा 36 तासांचा प्रवास केल्यावर येत्या रविवारी पहाटे हे ज्येष्ठ नागरिक वाराणसी स्टेशनला पोहोचतील. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी तेथील पोलीस आयुक्तांनी येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली आहे असे आमदार सुर्वे यांनी सांगितले.

यात्रेदरम्यान खास गंगा स्नान, संध्याकाळी गंगा आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रवासादरम्यान या ज्येष्ठ नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स तसेच सुमारे 100 शिवसैनिक व महिला प्रत्येक डब्यात तैनात राहून त्यांची बडदास्त ठेवतील असे आमदार सुर्वे यांनी सांगितले. त्याचदिवशी रात्री 11 वाजता हे ज्येष्ठ नागरिक परतीच्या प्रवासाला मुंबईकडे रवाना होऊन मंगळवरी 36 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर दुपारी मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या आईने मला एकदा तरी काशी यात्रेला घेऊन जा असे सांगितले. आईची इच्छा मी पूर्ण केली. माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकदेखील आई वडिलांप्रमाणे असून कलीयुगातील या श्रावण बाळाने येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांची काशी विश्वनाथ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. गेले एक महिना आम्ही या यात्रेची तयारी करत होतो. यापूर्वी येथील जेष्ठ नागरिकांना नाशिक त्र्यंम्बकेश्वर, शिर्डी, पालघरची महालक्ष्मी यांची दर्शनयात्रा आपण आयोजित केली होती असेही सुर्वे यांनी सांगितले.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content