HomeArchiveमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे...

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार वितरीत!

Details
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार वितरीत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार आणि साहित्यिकांचे लेखनाचे विषय बघता महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या साहित्याचा प्रभाव समाजावर असल्याचे जाणवते. म्हणून महाराष्ट्र हे प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे राज्य आहे. खऱ्या साहित्याची निर्मिती नेहमीच प्रादेशिक भाषेत होत असते, असे उद्गार सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती साहित्यिक पद्मश्री सितांशु यशश्चंद्र यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वार्षिक ग्रंथ पुरस्कार देताना नुकतेच पुण्यात काढले.

 

यावेळी डॉ. विजया वाड, मुकुंद राज कुलकर्णी, अभिनेता जितेंद्र जोशी, राजीव तांबे, यतीन माझिरे, छाया महाजन, विनायक कुळकर्णी, संतोष शेणई, डॉ. जयश्री तोडकर यांना गौरविण्यात आले. बँकिंगविषयक ग्रंथासाठी देण्यात येणारा कै. सुभाष हरी गोखले पुरस्कार प्रसिद्ध आर्थिक लेखक आणि गुंतवणूक समुपदेशक विनायक कुळकर्णी यांना “अर्थभान- बँकिंग आणि विमा” पुस्तकासाठी गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे होते. उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांचीही उपस्थिती होती. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार आणि साहित्यिकांचे लेखनाचे विषय बघता महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या साहित्याचा प्रभाव समाजावर असल्याचे जाणवते. म्हणून महाराष्ट्र हे प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे राज्य आहे. खऱ्या साहित्याची निर्मिती नेहमीच प्रादेशिक भाषेत होत असते, असे उद्गार सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती साहित्यिक पद्मश्री सितांशु यशश्चंद्र यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वार्षिक ग्रंथ पुरस्कार देताना नुकतेच पुण्यात काढले.

 

यावेळी डॉ. विजया वाड, मुकुंद राज कुलकर्णी, अभिनेता जितेंद्र जोशी, राजीव तांबे, यतीन माझिरे, छाया महाजन, विनायक कुळकर्णी, संतोष शेणई, डॉ. जयश्री तोडकर यांना गौरविण्यात आले. बँकिंगविषयक ग्रंथासाठी देण्यात येणारा कै. सुभाष हरी गोखले पुरस्कार प्रसिद्ध आर्थिक लेखक आणि गुंतवणूक समुपदेशक विनायक कुळकर्णी यांना “अर्थभान- बँकिंग आणि विमा” पुस्तकासाठी गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे होते. उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांचीही उपस्थिती होती. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.”
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content