HomeArchiveमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे...

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार वितरीत!

Details
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वार्षिक ग्रंथ पुरस्कार वितरीत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार आणि साहित्यिकांचे लेखनाचे विषय बघता महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या साहित्याचा प्रभाव समाजावर असल्याचे जाणवते. म्हणून महाराष्ट्र हे प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे राज्य आहे. खऱ्या साहित्याची निर्मिती नेहमीच प्रादेशिक भाषेत होत असते, असे उद्गार सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती साहित्यिक पद्मश्री सितांशु यशश्चंद्र यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वार्षिक ग्रंथ पुरस्कार देताना नुकतेच पुण्यात काढले.

 

यावेळी डॉ. विजया वाड, मुकुंद राज कुलकर्णी, अभिनेता जितेंद्र जोशी, राजीव तांबे, यतीन माझिरे, छाया महाजन, विनायक कुळकर्णी, संतोष शेणई, डॉ. जयश्री तोडकर यांना गौरविण्यात आले. बँकिंगविषयक ग्रंथासाठी देण्यात येणारा कै. सुभाष हरी गोखले पुरस्कार प्रसिद्ध आर्थिक लेखक आणि गुंतवणूक समुपदेशक विनायक कुळकर्णी यांना “अर्थभान- बँकिंग आणि विमा” पुस्तकासाठी गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे होते. उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांचीही उपस्थिती होती. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार आणि साहित्यिकांचे लेखनाचे विषय बघता महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या साहित्याचा प्रभाव समाजावर असल्याचे जाणवते. म्हणून महाराष्ट्र हे प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे राज्य आहे. खऱ्या साहित्याची निर्मिती नेहमीच प्रादेशिक भाषेत होत असते, असे उद्गार सरस्वती सन्मान प्राप्त गुजराती साहित्यिक पद्मश्री सितांशु यशश्चंद्र यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वार्षिक ग्रंथ पुरस्कार देताना नुकतेच पुण्यात काढले.

 

यावेळी डॉ. विजया वाड, मुकुंद राज कुलकर्णी, अभिनेता जितेंद्र जोशी, राजीव तांबे, यतीन माझिरे, छाया महाजन, विनायक कुळकर्णी, संतोष शेणई, डॉ. जयश्री तोडकर यांना गौरविण्यात आले. बँकिंगविषयक ग्रंथासाठी देण्यात येणारा कै. सुभाष हरी गोखले पुरस्कार प्रसिद्ध आर्थिक लेखक आणि गुंतवणूक समुपदेशक विनायक कुळकर्णी यांना “अर्थभान- बँकिंग आणि विमा” पुस्तकासाठी गुजराती साहित्यिक सितांशु यशश्चंद्र यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे होते. उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांचीही उपस्थिती होती. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content