HomeArchiveमहाराष्ट्र मिलिटरी स्कूलची...

महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरू

Details
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची प्रवेश प्रक्रिया सुरू

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची पाचवी ते दहावीच्या इयत्तेसाठी फक्त मुलांसाठी निवासी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तळवली, टोकावडे (मुरबाड) परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या निवासी शाळेत केवळ मुलांनाच इंग्रजी माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते.

यंदाच्या दहावीच्या परिक्षेत सलग 12 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा या शाळेने राखली आहे. त्याचबरोबर हॉकी, नेमबाजी, धनुर्विद्या, मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग आदी खेळांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून लौकिक कायम ठेवला आहे. पाचवी ते दहावीपर्यंत ही शाळा असून शालेय अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच सैनिकी प्रशिक्षण, स्वयंसंरक्षण, रायफल शूटींग, साहसी खेळ, कराटे, मुष्टियुद्ध आदी विविध स्वरूपाचे ज्ञान प्रात्याक्षिकांसह विद्यार्थ्यांना दिले जाते.

हॉकीच्या खेळासाठी याठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हे मैदान विविध स्पर्धांसाठी एक मोठे आकर्षण ठरले आहे. या ठिकाणच्या अनेक विद्यार्थ्यांनी मुष्टियुद्ध व हॉकी या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच राज्यात डिजिटल वर्गाच्या माध्यमातून सैनिकी शाळांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रमदेखील संस्थेच्या वतीने राबवण्यात आला.

संस्थेचे संचालक रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार सुरू आहे. वेगवेगळ्या संकल्पना व नवे प्रयोग सातत्याने याठिकाणी करत विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्वाचे सर्वांगीण विकासाचे कार्य नेटकेपणाने करण्यात येते. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यात वैयक्तिकपणे लक्ष देऊन त्यांना अनुकूल असा वाव दिला जातो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांकडून सातत्याने मार्गदर्शन केले जाते. निवृत्त लष्करी अधिकारीदेखील नियमितपणे याठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना विविध तंत्र शिकवत असतात. केवळ मुंबई, ठाणे किंवा महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील विद्यार्थी याठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत.

अधिक माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रमोद देसले 7038566888, गणेश व्यापारी 9270507597 तसेच काशिनाथ भोईर यांच्याशी 9273115838, 8888195574 वर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची पाचवी ते दहावीच्या इयत्तेसाठी फक्त मुलांसाठी निवासी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तळवली, टोकावडे (मुरबाड) परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या निवासी शाळेत केवळ मुलांनाच इंग्रजी माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते.

यंदाच्या दहावीच्या परिक्षेत सलग 12 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा या शाळेने राखली आहे. त्याचबरोबर हॉकी, नेमबाजी, धनुर्विद्या, मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग आदी खेळांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून लौकिक कायम ठेवला आहे. पाचवी ते दहावीपर्यंत ही शाळा असून शालेय अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच सैनिकी प्रशिक्षण, स्वयंसंरक्षण, रायफल शूटींग, साहसी खेळ, कराटे, मुष्टियुद्ध आदी विविध स्वरूपाचे ज्ञान प्रात्याक्षिकांसह विद्यार्थ्यांना दिले जाते.

हॉकीच्या खेळासाठी याठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हे मैदान विविध स्पर्धांसाठी एक मोठे आकर्षण ठरले आहे. या ठिकाणच्या अनेक विद्यार्थ्यांनी मुष्टियुद्ध व हॉकी या खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच राज्यात डिजिटल वर्गाच्या माध्यमातून सैनिकी शाळांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रमदेखील संस्थेच्या वतीने राबवण्यात आला.

संस्थेचे संचालक रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार सुरू आहे. वेगवेगळ्या संकल्पना व नवे प्रयोग सातत्याने याठिकाणी करत विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्वाचे सर्वांगीण विकासाचे कार्य नेटकेपणाने करण्यात येते. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यात वैयक्तिकपणे लक्ष देऊन त्यांना अनुकूल असा वाव दिला जातो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांकडून सातत्याने मार्गदर्शन केले जाते. निवृत्त लष्करी अधिकारीदेखील नियमितपणे याठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना विविध तंत्र शिकवत असतात. केवळ मुंबई, ठाणे किंवा महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील विद्यार्थी याठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत.

अधिक माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रमोद देसले 7038566888, गणेश व्यापारी 9270507597 तसेच काशिनाथ भोईर यांच्याशी 9273115838, 8888195574 वर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content