HomeArchiveमहाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत...

महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत तब्बल ३५ लाखांची वाढ !

Details
महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत तब्बल ३५ लाखांची वाढ !

    30-Jun-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

रेनी अब्राहम

महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये गेल्या 15 दिवसांत तब्बल 35 लाख मतदार वाढले असून मुंबईत यातील सुमारे दोन लाख युवा मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने एक नोव्हेंबरपासून मतदारयादीचे पुनर्निरीक्षण करण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत ही वाढ झाली. राज्यात यापूर्वी एकूण 8.44 कोटी मतदार होते.यामध्ये 4.43 कोटी पुरूष तर 4.01 कोटी महिला मतदारांचा समावेश होता. त्यात आता 35 लाख मतदरांची भर पडली असून पुढे हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सध्या देशातली निम्मी लोकसंख्या 25 वर्षांखालील तरूणांची आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मतदारयादीतल्या या भरमसाठ वाढीला मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात नजीकच्या काळात 12.6 कोटी लोकसंख्या असेल असा अंदाज आहे. अशा वेळी मतदारांच्या संख्येत 35 लाखांची वाढ होणे चांगले आहे. यात बहुसंख्य नवे मतदार आहेत. चार जानेवारीपर्यंत म्हणजे मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण संपेपर्यंत ही संख्या आणखी वाढेल, असे त्याने सांगितले.

एक नोव्हेंबर 2018 च्या आकडेवारीनुसार, नव्याने दाखल झालेल्या मतदारांमध्ये मुंबई शहरात 1349692 पुरूष तर 1109410 महिला मतदारांचा समावेश आहे. मुंबई उपनगरात नव्याने दाखल झालेल्या मतदारांमध्ये 3725323 पुरूष आणि 3092946 महिला मतदारांचा समावेश आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यातही मतदारांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्रात जास्त मतदार असलेल्या भागांमध्ये सध्या पुणे (7189265 मतदार), नाशिक (4260393), जळगाव (3293157), अमरावती (2334854), नागपूर (3873959), यवतमाळ (2038514), नांदेड (2406859), औरंगाबाद (2649641), अहमदनगर (3318555), सोलापूर (3226683), सातारा (2387877), कोल्हापूर (2965314), रायगड (2161614) आणि सांगली (2233831) यांचा समावेश आहे.”
 
“रेनी अब्राहम

महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये गेल्या 15 दिवसांत तब्बल 35 लाख मतदार वाढले असून मुंबईत यातील सुमारे दोन लाख युवा मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने एक नोव्हेंबरपासून मतदारयादीचे पुनर्निरीक्षण करण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत ही वाढ झाली. राज्यात यापूर्वी एकूण 8.44 कोटी मतदार होते.यामध्ये 4.43 कोटी पुरूष तर 4.01 कोटी महिला मतदारांचा समावेश होता. त्यात आता 35 लाख मतदरांची भर पडली असून पुढे हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सध्या देशातली निम्मी लोकसंख्या 25 वर्षांखालील तरूणांची आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मतदारयादीतल्या या भरमसाठ वाढीला मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात नजीकच्या काळात 12.6 कोटी लोकसंख्या असेल असा अंदाज आहे. अशा वेळी मतदारांच्या संख्येत 35 लाखांची वाढ होणे चांगले आहे. यात बहुसंख्य नवे मतदार आहेत. चार जानेवारीपर्यंत म्हणजे मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण संपेपर्यंत ही संख्या आणखी वाढेल, असे त्याने सांगितले.

एक नोव्हेंबर 2018 च्या आकडेवारीनुसार, नव्याने दाखल झालेल्या मतदारांमध्ये मुंबई शहरात 1349692 पुरूष तर 1109410 महिला मतदारांचा समावेश आहे. मुंबई उपनगरात नव्याने दाखल झालेल्या मतदारांमध्ये 3725323 पुरूष आणि 3092946 महिला मतदारांचा समावेश आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यातही मतदारांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्रात जास्त मतदार असलेल्या भागांमध्ये सध्या पुणे (7189265 मतदार), नाशिक (4260393), जळगाव (3293157), अमरावती (2334854), नागपूर (3873959), यवतमाळ (2038514), नांदेड (2406859), औरंगाबाद (2649641), अहमदनगर (3318555), सोलापूर (3226683), सातारा (2387877), कोल्हापूर (2965314), रायगड (2161614) आणि सांगली (2233831) यांचा समावेश आहे.”

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content