HomeArchiveमहापौरांच्या पुस्तकाचे उद्धव...

महापौरांच्या पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

Details
महापौरांच्या पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

    25-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या “”ध्यास शिवसेनेचा.. मुंबईच्या विकासाचा..” या पुस्तकाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. ८ मार्च २०१७ रोजी मुंबईच्या महापौर पदावर आलेल्या महाडेश्वर यांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.
 
 
या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा सचित्र व शब्दबद्ध असा बोलका आढावा घेतला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवसेनेने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल परब, माजी लोकसभा अध्यक्ष प्रि. मनोहर जोशी, आमदार तृप्ती सावंत, रजनी मेस्त्री, पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
 

 
 
आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे हृदयच! राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या मुंबापुरीचा प्रथम नागरिक म्हणून काम करताना शिवसेनेने उराशी जपलेले मुंबापुरीच्या विकासाचे ध्येय पूर्णत्वाकडे नेण्याचा उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिक प्रयत्न केला. मुंबईसारख्या महानगरीला सातत्याने भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी कोस्टल रोडचा निर्णय करणे, केंद्र सरकारच्या “”स्वच्छ भारत”” अभियानांतर्गत राजधान्यांच्या गटात स्वच्छ सर्वेक्षणाचा मुंबई शहराला प्रथम क्रमांक मिळाला. गरजू रूग्णांना महापौर निधीतून मिळणारी ५ हजारांची मदत २५ हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय महापौरांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.
 

 
 

 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या “”ध्यास शिवसेनेचा.. मुंबईच्या विकासाचा..” या पुस्तकाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. ८ मार्च २०१७ रोजी मुंबईच्या महापौर पदावर आलेल्या महाडेश्वर यांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.”
 
 
“या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा सचित्र व शब्दबद्ध असा बोलका आढावा घेतला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवसेनेने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल परब, माजी लोकसभा अध्यक्ष प्रि. मनोहर जोशी, आमदार तृप्ती सावंत, रजनी मेस्त्री, पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.”
 
 

 
 
“आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे हृदयच! राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या मुंबापुरीचा प्रथम नागरिक म्हणून काम करताना शिवसेनेने उराशी जपलेले मुंबापुरीच्या विकासाचे ध्येय पूर्णत्वाकडे नेण्याचा उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिक प्रयत्न केला. मुंबईसारख्या महानगरीला सातत्याने भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी कोस्टल रोडचा निर्णय करणे, केंद्र सरकारच्या “”स्वच्छ भारत”” अभियानांतर्गत राजधान्यांच्या गटात स्वच्छ सर्वेक्षणाचा मुंबई शहराला प्रथम क्रमांक मिळाला. गरजू रूग्णांना महापौर निधीतून मिळणारी ५ हजारांची मदत २५ हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय महापौरांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.”

 

 
 

 
 

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content