HomeArchiveमराठी अधिकाऱ्याला रेल्वेचे...

मराठी अधिकाऱ्याला रेल्वेचे महाव्यवस्थापकपद द्यावे – राहुल शेवाळे

Details
मराठी अधिकाऱ्याला रेल्वेचे महाव्यवस्थापकपद द्यावे – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईची लाईफलाईन म्हणवल्या जाणाऱ्या रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे मुंबईकरांना होणारा त्रास थांबवायचा असेल तर ‘जनरल मॅनेजर’ या पदावर मराठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे सामान्य प्रवाशांना झालेल्या त्रासाची दखल घेत, याबाबत रेल्वेमंत्रालयाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही खासदार शेवाळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक निवृत्त होऊन दीड महिना उलटला, तरीही नव्या अधिकाऱ्याची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. रिक्त असलेले महाव्यवस्थापकांचे पद, हेदेखील, मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या गोंधळामागचे एक कारण आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या पदावर तातडीने अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे. मात्र इथल्या प्रवाशांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी ‘जनरल मॅनेजर’पदी मराठी अधिकाऱ्याचीच नेमणूक करावी, अशी मागणी शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार तक्रार करूनही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे या साऱ्या प्रकाराला नेमकं कोण जबाबदार आहे, नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सामन्य जनतेला हवी आहेत. यासाठीच याबाबतची एक श्वेतपत्रिका रेल्वे मंत्रालयाने काढावी, अशीही मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईची लाईफलाईन म्हणवल्या जाणाऱ्या रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे मुंबईकरांना होणारा त्रास थांबवायचा असेल तर ‘जनरल मॅनेजर’ या पदावर मराठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे सामान्य प्रवाशांना झालेल्या त्रासाची दखल घेत, याबाबत रेल्वेमंत्रालयाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही खासदार शेवाळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक निवृत्त होऊन दीड महिना उलटला, तरीही नव्या अधिकाऱ्याची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. रिक्त असलेले महाव्यवस्थापकांचे पद, हेदेखील, मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या गोंधळामागचे एक कारण आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या पदावर तातडीने अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे. मात्र इथल्या प्रवाशांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी ‘जनरल मॅनेजर’पदी मराठी अधिकाऱ्याचीच नेमणूक करावी, अशी मागणी शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार तक्रार करूनही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे या साऱ्या प्रकाराला नेमकं कोण जबाबदार आहे, नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सामन्य जनतेला हवी आहेत. यासाठीच याबाबतची एक श्वेतपत्रिका रेल्वे मंत्रालयाने काढावी, अशीही मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.”

Continue reading

जॅनिक सिनरने मोडला पीट सॅम्प्रासचा ३२ वर्षांपूर्वीचा विक्रम

इटलीच्या स्टार टेनिसपटूने आणि सध्याचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिनरने टेनिसविश्वात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. त्याने एटीपी १००० मास्टर्स स्पर्धेत वर्षाची सुरुवात सलग २० विजयांनी करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. असा पराक्रम करणारा तो नोव्हाक...

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...
Skip to content