HomeArchive`मराठी’साठी कवी, लेखक,...

`मराठी’साठी कवी, लेखक, प्रकाशक एकवटले!

Details
“`मराठी’साठी कवी, लेखक, प्रकाशक एकवटले!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लहान मुलांची भाषा बघितली तर मराठी कशी टिकणार, ही काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. प्रकाशन व्यवसायात पन्नास टक्के घट झाली आहे. मराठीच्या दुरवस्थेविषयी सरकार गंभीर नाही. मराठी विषयाच्या सक्तीसाठी सरकारने कायदा करावा, म्हणून कायद्याचा मसुदा सरकारला दिला, तरी पुढे काही घडले नाही. राज्यात मराठी भाषा वाचवायची असेल तर सरकारने किमान दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करावा, अशी जोरदार व एकमुखी मागणी लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी मंगळवारी केली.

क्वचितच एकत्र येणाऱ्या मराठी सारस्वतांची मराठीच्या मुद्द्यावर एकजूट झाल्याचे दिसून आले. मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करावा व राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ जूनला धरणे धरण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात हा विचार पुढे आला.

लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, प्रा. मिलिंद जोशी, मंगला गोडबोले, अश्विनी धोंगडे, नीलिमा गुंडी, संजय सोनवणी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, दीपक शिकारपूर, वि. दा. पिंगळे, डॉ. सतीश देसाई, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, संगीता बर्वे, आश्लेषा महाजन, रविमुकुल, बंडा जोशी, क्षितिज पाटुकले, अंजली कुलकर्णी, अरूण फडके, अनिल गोरे यांसह अनेक लेखक, कवी, प्रकाशक, शिक्षक बैठकीला उपस्थित होते.

शिक्षण विनोदाच्या तावडीत

मराठी नाटकाचा व सिनेमाचा प्रेक्षक तसेच वाचक कमी झाला आहे. या दशकात मराठीपुढे मोठे संकट ओढावले आहे. मराठी टिकवायची असेल तर मोठा संघर्ष केला पाहिजे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळात आंदोलन केले पाहिजे. तामिळनाडूसारखी भूमिका घेतली तरच मराठी टिकेल, असे भाष्यकार रामदास फुटाणे यांनी ठणकावले. मराठी भाषा आणि शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडले आहे, अशी टपलीही त्यांनी मारली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लहान मुलांची भाषा बघितली तर मराठी कशी टिकणार, ही काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. प्रकाशन व्यवसायात पन्नास टक्के घट झाली आहे. मराठीच्या दुरवस्थेविषयी सरकार गंभीर नाही. मराठी विषयाच्या सक्तीसाठी सरकारने कायदा करावा, म्हणून कायद्याचा मसुदा सरकारला दिला, तरी पुढे काही घडले नाही. राज्यात मराठी भाषा वाचवायची असेल तर सरकारने किमान दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करावा, अशी जोरदार व एकमुखी मागणी लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी मंगळवारी केली.

क्वचितच एकत्र येणाऱ्या मराठी सारस्वतांची मराठीच्या मुद्द्यावर एकजूट झाल्याचे दिसून आले. मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करावा व राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ जूनला धरणे धरण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात हा विचार पुढे आला.

लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, प्रा. मिलिंद जोशी, मंगला गोडबोले, अश्विनी धोंगडे, नीलिमा गुंडी, संजय सोनवणी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, दीपक शिकारपूर, वि. दा. पिंगळे, डॉ. सतीश देसाई, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, संगीता बर्वे, आश्लेषा महाजन, रविमुकुल, बंडा जोशी, क्षितिज पाटुकले, अंजली कुलकर्णी, अरूण फडके, अनिल गोरे यांसह अनेक लेखक, कवी, प्रकाशक, शिक्षक बैठकीला उपस्थित होते.

शिक्षण विनोदाच्या तावडीत

मराठी नाटकाचा व सिनेमाचा प्रेक्षक तसेच वाचक कमी झाला आहे. या दशकात मराठीपुढे मोठे संकट ओढावले आहे. मराठी टिकवायची असेल तर मोठा संघर्ष केला पाहिजे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळात आंदोलन केले पाहिजे. तामिळनाडूसारखी भूमिका घेतली तरच मराठी टिकेल, असे भाष्यकार रामदास फुटाणे यांनी ठणकावले. मराठी भाषा आणि शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडले आहे, अशी टपलीही त्यांनी मारली.”

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content