HomeArchive`मराठी’साठी कवी, लेखक,...

`मराठी’साठी कवी, लेखक, प्रकाशक एकवटले!

Details
“`मराठी’साठी कवी, लेखक, प्रकाशक एकवटले!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लहान मुलांची भाषा बघितली तर मराठी कशी टिकणार, ही काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. प्रकाशन व्यवसायात पन्नास टक्के घट झाली आहे. मराठीच्या दुरवस्थेविषयी सरकार गंभीर नाही. मराठी विषयाच्या सक्तीसाठी सरकारने कायदा करावा, म्हणून कायद्याचा मसुदा सरकारला दिला, तरी पुढे काही घडले नाही. राज्यात मराठी भाषा वाचवायची असेल तर सरकारने किमान दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करावा, अशी जोरदार व एकमुखी मागणी लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी मंगळवारी केली.

क्वचितच एकत्र येणाऱ्या मराठी सारस्वतांची मराठीच्या मुद्द्यावर एकजूट झाल्याचे दिसून आले. मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करावा व राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ जूनला धरणे धरण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात हा विचार पुढे आला.

लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, प्रा. मिलिंद जोशी, मंगला गोडबोले, अश्विनी धोंगडे, नीलिमा गुंडी, संजय सोनवणी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, दीपक शिकारपूर, वि. दा. पिंगळे, डॉ. सतीश देसाई, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, संगीता बर्वे, आश्लेषा महाजन, रविमुकुल, बंडा जोशी, क्षितिज पाटुकले, अंजली कुलकर्णी, अरूण फडके, अनिल गोरे यांसह अनेक लेखक, कवी, प्रकाशक, शिक्षक बैठकीला उपस्थित होते.

शिक्षण विनोदाच्या तावडीत

मराठी नाटकाचा व सिनेमाचा प्रेक्षक तसेच वाचक कमी झाला आहे. या दशकात मराठीपुढे मोठे संकट ओढावले आहे. मराठी टिकवायची असेल तर मोठा संघर्ष केला पाहिजे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळात आंदोलन केले पाहिजे. तामिळनाडूसारखी भूमिका घेतली तरच मराठी टिकेल, असे भाष्यकार रामदास फुटाणे यांनी ठणकावले. मराठी भाषा आणि शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडले आहे, अशी टपलीही त्यांनी मारली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लहान मुलांची भाषा बघितली तर मराठी कशी टिकणार, ही काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. प्रकाशन व्यवसायात पन्नास टक्के घट झाली आहे. मराठीच्या दुरवस्थेविषयी सरकार गंभीर नाही. मराठी विषयाच्या सक्तीसाठी सरकारने कायदा करावा, म्हणून कायद्याचा मसुदा सरकारला दिला, तरी पुढे काही घडले नाही. राज्यात मराठी भाषा वाचवायची असेल तर सरकारने किमान दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करावा, अशी जोरदार व एकमुखी मागणी लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी मंगळवारी केली.

क्वचितच एकत्र येणाऱ्या मराठी सारस्वतांची मराठीच्या मुद्द्यावर एकजूट झाल्याचे दिसून आले. मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करावा व राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ जूनला धरणे धरण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात हा विचार पुढे आला.

लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, प्रा. मिलिंद जोशी, मंगला गोडबोले, अश्विनी धोंगडे, नीलिमा गुंडी, संजय सोनवणी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, दीपक शिकारपूर, वि. दा. पिंगळे, डॉ. सतीश देसाई, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, संगीता बर्वे, आश्लेषा महाजन, रविमुकुल, बंडा जोशी, क्षितिज पाटुकले, अंजली कुलकर्णी, अरूण फडके, अनिल गोरे यांसह अनेक लेखक, कवी, प्रकाशक, शिक्षक बैठकीला उपस्थित होते.

शिक्षण विनोदाच्या तावडीत

मराठी नाटकाचा व सिनेमाचा प्रेक्षक तसेच वाचक कमी झाला आहे. या दशकात मराठीपुढे मोठे संकट ओढावले आहे. मराठी टिकवायची असेल तर मोठा संघर्ष केला पाहिजे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळात आंदोलन केले पाहिजे. तामिळनाडूसारखी भूमिका घेतली तरच मराठी टिकेल, असे भाष्यकार रामदास फुटाणे यांनी ठणकावले. मराठी भाषा आणि शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडले आहे, अशी टपलीही त्यांनी मारली.”

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content