HomeArchiveमत्स्य उद्योगाला बसला...

मत्स्य उद्योगाला बसला जीएसटीचा फटका

Details
मत्स्य उद्योगाला बसला जीएसटीचा फटका

    03-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
केंद्र सरकारने मत्स्य उद्योगाला ५ टक्के जीएसटी लावल्याने त्याचा मोठा फटका मत्स्य उद्योगांना बसला आहे. त्यामुळे फिश मिल कंपन्यांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. फिश मिल कंपन्यांच्या संपामुळे त्यांनी मासेखरेदी बंद केली आहे. त्यामुळे मच्छिमार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मत्स्य उद्योगाला जीएसटी मधून वगळावे, अशी आग्रही मागणी वेसावा नाखवा मंडळचे (ट्रॉतर)चे अध्यक्ष देवेंद्र काळे व सचिव पराग भावे यांनी केली आहे.
 
 
गेली दोन ते तीन वर्षे मच्छिमारांना मासळी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मासळीचा नवीन हंगाम सुरू झाल्यावर फक्त ७५ टक्के मासळी ही खाण्यायोग्य असते तर उर्वरित मासळी ही फिश मिलला दिली जाते. मात्र फिश मिलच्या संपामुळे वर्सोव्याच्या मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली आहे, असे ते म्हणाले.
 
 
१ जून ते ३१ जुलै या काळात मासेमारीला राज्यात बंदी असते. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरूवात झाली. मासळीदेखील मिळू लागली. मात्र, फिश मिलच्या संपामुळे मासळीला उठाव नसल्याने मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई, कुलाबा, वरळी, माहीम, खार दांडा या कोळीवाड्यांसह ससून डॉक, भाऊंचा धक्का येथील घाऊक मासळी विक्री केंद्रावर मासळीला उठाव नसल्याने मासळी कवडीमोल भावाने विकावी लागते, अन्यथा ती फेकून द्यावी लागते. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे, असे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके व प्रवीण भावे यांनी सांगितले.
याप्रकरणी कोळी महासंघाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे आमदार रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच कोळी महासंघाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची भेट घेणार असून मत्स्य उद्योगाला जीएसटीमधून वेगळावे, अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
“केंद्र सरकारने मत्स्य उद्योगाला ५ टक्के जीएसटी लावल्याने त्याचा मोठा फटका मत्स्य उद्योगांना बसला आहे. त्यामुळे फिश मिल कंपन्यांनी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. फिश मिल कंपन्यांच्या संपामुळे त्यांनी मासेखरेदी बंद केली आहे. त्यामुळे मच्छिमार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून मत्स्य उद्योगाला जीएसटी मधून वगळावे, अशी आग्रही मागणी वेसावा नाखवा मंडळचे (ट्रॉतर)चे अध्यक्ष देवेंद्र काळे व सचिव पराग भावे यांनी केली आहे.”
 
 
“गेली दोन ते तीन वर्षे मच्छिमारांना मासळी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मासळीचा नवीन हंगाम सुरू झाल्यावर फक्त ७५ टक्के मासळी ही खाण्यायोग्य असते तर उर्वरित मासळी ही फिश मिलला दिली जाते. मात्र फिश मिलच्या संपामुळे वर्सोव्याच्या मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली आहे, असे ते म्हणाले.”
 
 
“१ जून ते ३१ जुलै या काळात मासेमारीला राज्यात बंदी असते. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरूवात झाली. मासळीदेखील मिळू लागली. मात्र, फिश मिलच्या संपामुळे मासळीला उठाव नसल्याने मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई, कुलाबा, वरळी, माहीम, खार दांडा या कोळीवाड्यांसह ससून डॉक, भाऊंचा धक्का येथील घाऊक मासळी विक्री केंद्रावर मासळीला उठाव नसल्याने मासळी कवडीमोल भावाने विकावी लागते, अन्यथा ती फेकून द्यावी लागते. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडला आहे, असे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके व प्रवीण भावे यांनी सांगितले.”
“याप्रकरणी कोळी महासंघाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे आमदार रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच कोळी महासंघाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची भेट घेणार असून मत्स्य उद्योगाला जीएसटीमधून वेगळावे, अशी आग्रही मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.”

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content