HomeArchiveमंगळस्वारी: एक मैलाचा...

मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा (भाग-3)

Details
मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा (भाग-3)

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

प्रसाद केरकर, मुख्य संपादक, दै. कृषिवल

[email protected]

स्वातंत्र्यानंतर भारताने देखील इस्त्रो ही अंतराळ संशोधन संस्था स्थापन करून या क्षेत्रात उडी घेतली. पंडित नेहरूंची दूरदृष्टी त्याला कारणीभूत होती. ज्येष्ठ संशोधक विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्त्वाखाली यासंशोधनाला सुरूवात झाली. तामीळनाडूतील थुंबा हे ठिकाण त्यासाठी निवडले गेले. आपण देशात बनविलेला आर्यभट्ट हा उपग्रह रशियातून सोडण्यात आला. त्यावेळी आपल्याकडे उपग्रह सोडण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले नव्हते. त्यामुळे तो रशियातून सोडण्यात आला. त्यानंतर भारतीय अवकाश शास्त्रज्ञांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. आपण सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने 80 च्या दशकात भारतीय अवकाशविराला अंतराळात पाठविले होते. मात्र आता इस्त्रो स्वत:च्या बळावर अवकाशात माणूस नेऊ शकतो. भविष्यात ते सहज शक्य आहे.

 

चांद्रयान, मंगळयान अशा प्रकारच्या आपल्या स्वाऱ्या आजवर यशस्वी झाल्या आहेत. त्याचबरोबर आपण उपग्रह सोडण्याच्या संदर्भातील अनेक विक्रम केले आहेत. अगदी शंभराहून जास्त उपग्रह एकाचवेळी सोडण्याचा आपण जागतिक विक्रमही केला आहे. यातून आपली ही संस्था स्वबळावर उभी राहाणार आहे. कारण उपग्रहांचे प्रक्षेपण हा एक मोठा व्यवसाय आहे. अनेक देशांकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध नाही. सर्वच देशांना त्यांच्या दळणवणासाठी उपग्रह हा लागतोच. ती सेवा आता इस्त्रो अनेक देशांना पुरवित आहे. गेल्या 60 वर्षांत स्पुटनिकच्या प्रक्षेपणानंतर जगात अनेक तांत्रिक बदल झाले. उपग्रहांमुळे दळणवळण सुलभ झाले. शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज आगाऊ देता येऊ लागला. शत्रू पक्षावर नजर ठेवून त्यांच्या हालचाली टिपता येऊ लागल्या. मानवाच्या विकासात हा मोलाचा टप्पा आहे. त्यामुळेच 60 वर्षांपूर्वी स्पुटनिकचे अवकाशातील प्रक्षेपण ही संशोधनातील क्रांतिकारी घटना आहे. त्यानंतर आता मंगळावरची स्वारी हाएक मैलाचा दगड ठरला आहे.

आता पुढील टप्पा म्हणजे, सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी पार्कर सोलर प्रोब हे अंतराळ यान पुढील वर्षी 31 जुलै नासा अंतराळात सोडणार आहे. अशाप्रकारे थेट सूर्याच्या जवळ जाणारे हे पहिलेच यान असेल. ही मोहीम एकूण सात वर्षांची असून, ती 2025 मध्ये संपेल.हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून 40 लाख मैल एवढे जवळ जाईल. 2,550 फॅरेनहीट एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये हे यान ताशी 4.30 लाख किमी वेगाने सूर्याच्या 24 प्रदक्षिणा करत आपल्या सूर्यमालेतील या ताऱ्यांच्या वातावरणाचा अभ्यास करेल. मानवाची आपल्या ग्रहमालिकेचा शोध घेण्याची इच्छा अतिशय तीव्र आहे. आता तर या मालिकेचा पीतग्रहावर त्याचे चाल केली आहे. माणसाचा हा प्रयत्न म्हणजे नवनवीन शोधांचा ध्यास घेऊन काम करण्याचा प्रकार आहे.यात त्यांच्या संशोधनाला यश लाभो हीच सदिच्छा!”
 
“प्रसाद केरकर, मुख्य संपादक, दै. कृषिवल

[email protected]

स्वातंत्र्यानंतर भारताने देखील इस्त्रो ही अंतराळ संशोधन संस्था स्थापन करून या क्षेत्रात उडी घेतली. पंडित नेहरूंची दूरदृष्टी त्याला कारणीभूत होती. ज्येष्ठ संशोधक विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्त्वाखाली यासंशोधनाला सुरूवात झाली. तामीळनाडूतील थुंबा हे ठिकाण त्यासाठी निवडले गेले. आपण देशात बनविलेला आर्यभट्ट हा उपग्रह रशियातून सोडण्यात आला. त्यावेळी आपल्याकडे उपग्रह सोडण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले नव्हते. त्यामुळे तो रशियातून सोडण्यात आला. त्यानंतर भारतीय अवकाश शास्त्रज्ञांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. आपण सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने 80 च्या दशकात भारतीय अवकाशविराला अंतराळात पाठविले होते. मात्र आता इस्त्रो स्वत:च्या बळावर अवकाशात माणूस नेऊ शकतो. भविष्यात ते सहज शक्य आहे.

 

चांद्रयान, मंगळयान अशा प्रकारच्या आपल्या स्वाऱ्या आजवर यशस्वी झाल्या आहेत. त्याचबरोबर आपण उपग्रह सोडण्याच्या संदर्भातील अनेक विक्रम केले आहेत. अगदी शंभराहून जास्त उपग्रह एकाचवेळी सोडण्याचा आपण जागतिक विक्रमही केला आहे. यातून आपली ही संस्था स्वबळावर उभी राहाणार आहे. कारण उपग्रहांचे प्रक्षेपण हा एक मोठा व्यवसाय आहे. अनेक देशांकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध नाही. सर्वच देशांना त्यांच्या दळणवणासाठी उपग्रह हा लागतोच. ती सेवा आता इस्त्रो अनेक देशांना पुरवित आहे. गेल्या 60 वर्षांत स्पुटनिकच्या प्रक्षेपणानंतर जगात अनेक तांत्रिक बदल झाले. उपग्रहांमुळे दळणवळण सुलभ झाले. शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज आगाऊ देता येऊ लागला. शत्रू पक्षावर नजर ठेवून त्यांच्या हालचाली टिपता येऊ लागल्या. मानवाच्या विकासात हा मोलाचा टप्पा आहे. त्यामुळेच 60 वर्षांपूर्वी स्पुटनिकचे अवकाशातील प्रक्षेपण ही संशोधनातील क्रांतिकारी घटना आहे. त्यानंतर आता मंगळावरची स्वारी हाएक मैलाचा दगड ठरला आहे.

आता पुढील टप्पा म्हणजे, सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी पार्कर सोलर प्रोब हे अंतराळ यान पुढील वर्षी 31 जुलै नासा अंतराळात सोडणार आहे. अशाप्रकारे थेट सूर्याच्या जवळ जाणारे हे पहिलेच यान असेल. ही मोहीम एकूण सात वर्षांची असून, ती 2025 मध्ये संपेल.हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून 40 लाख मैल एवढे जवळ जाईल. 2,550 फॅरेनहीट एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये हे यान ताशी 4.30 लाख किमी वेगाने सूर्याच्या 24 प्रदक्षिणा करत आपल्या सूर्यमालेतील या ताऱ्यांच्या वातावरणाचा अभ्यास करेल. मानवाची आपल्या ग्रहमालिकेचा शोध घेण्याची इच्छा अतिशय तीव्र आहे. आता तर या मालिकेचा पीतग्रहावर त्याचे चाल केली आहे. माणसाचा हा प्रयत्न म्हणजे नवनवीन शोधांचा ध्यास घेऊन काम करण्याचा प्रकार आहे.यात त्यांच्या संशोधनाला यश लाभो हीच सदिच्छा!”
 

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content