HomeArchiveबालभारती महाविद्यालयात 'सर्वोदय...

बालभारती महाविद्यालयात ‘सर्वोदय उत्सव’ साजरा

Details
बालभारती महाविद्यालयात ‘सर्वोदय उत्सव’ साजरा

    07-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
राष्ट्रपिता महात्मा गांधींजीच्या १५०व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बालभारती महाविद्यालयात गेल्या २ ऑक्टोबर २०१८पासून ते यंदाच्या २ ऑक्टोबर २०१९पर्यंत “”सर्वोदय उत्सव”” या विशिष्ट कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी पुस्तक मेळा, खादी प्रदर्शन, दानोत्सव इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बालभारती महाविद्यालय १ ऑक्टोबर २०१९ ते ५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये गांधीजयंती साजरी करण्यात आली.
 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनावर, विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, भाईंदर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा गांधींजींच्या जीवनावर आधारित चलचित्रांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा गांधींजींच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता अध्यात्माचे ख्यातनाम प्रवचनकार व्याख्याते, प्रसिद्ध लेखक रमेशभाई ओझा यांना निमंत्रित करण्यात आले होते‌. त्यांच्या सुश्राव्य व्याख्यानामुळे महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला अभूतपूर्व झळाळी प्राप्त होत या महोत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
 
 

 
 
 
या कार्यक्रमाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रभातफेरी घेऊन करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या प्रिय भजनांचे गायन केले‌. गांधीजींच्या विचारांचे घोषवाक्यातून दर्शन घडविले. समाजातील विविध स्तरातील लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी बालभारती संस्थेच्या विश्वस्त व सदस्यांनी विशेष सहकार्य केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांबरोबर प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.
 

 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“राष्ट्रपिता महात्मा गांधींजीच्या १५०व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बालभारती महाविद्यालयात गेल्या २ ऑक्टोबर २०१८पासून ते यंदाच्या २ ऑक्टोबर २०१९पर्यंत “”सर्वोदय उत्सव”” या विशिष्ट कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी पुस्तक मेळा, खादी प्रदर्शन, दानोत्सव इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बालभारती महाविद्यालय १ ऑक्टोबर २०१९ ते ५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये गांधीजयंती साजरी करण्यात आली.”
 

“या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनावर, विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, भाईंदर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा गांधींजींच्या जीवनावर आधारित चलचित्रांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा गांधींजींच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता अध्यात्माचे ख्यातनाम प्रवचनकार व्याख्याते, प्रसिद्ध लेखक रमेशभाई ओझा यांना निमंत्रित करण्यात आले होते‌. त्यांच्या सुश्राव्य व्याख्यानामुळे महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला अभूतपूर्व झळाळी प्राप्त होत या महोत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.”
 
 

 
 
 
या कार्यक्रमाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रभातफेरी घेऊन करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या प्रिय भजनांचे गायन केले‌. गांधीजींच्या विचारांचे घोषवाक्यातून दर्शन घडविले. समाजातील विविध स्तरातील लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी बालभारती संस्थेच्या विश्वस्त व सदस्यांनी विशेष सहकार्य केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांबरोबर प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.

 

 

“राष्ट्रपिता महात्मा गांधी””सर्वोदय उत्सव””मुंबईच्या कांदिवली पश्चिमबालभारती महाविद्यालय”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content