HomeArchiveबारवी धरणाची उंची...

बारवी धरणाची उंची वाढल्याने पाण्याची टंचाई नाही : सुभाष देसाई

Details
बारवी धरणाची उंची वाढल्याने पाण्याची टंचाई नाही : सुभाष देसाई

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प आज पूर्ण झाला असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेनुसार भरले आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले म्हणून बारवी धरणाचे जलपूजन गुरूवारी भरपावसात आनंदी वातावरणात उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरूण कटाळे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते.

या धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली, प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढून निर्णय घेतला असे देसाई यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांतील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे, आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाण्याची पातळी वाढल्याने कोळेवडखळ गावात पाणी शिरलं आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे शासनाचे धोरण असल्याचे उद्योग मंत्र्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प आज पूर्ण झाला असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेनुसार भरले आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले म्हणून बारवी धरणाचे जलपूजन गुरूवारी भरपावसात आनंदी वातावरणात उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरूण कटाळे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते.

या धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली, प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढून निर्णय घेतला असे देसाई यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांतील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे, आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाण्याची पातळी वाढल्याने कोळेवडखळ गावात पाणी शिरलं आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे शासनाचे धोरण असल्याचे उद्योग मंत्र्यांनी सांगितले.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content