HomeArchiveपूरबाधित कुटुंबियांच्या घरी...

पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

Details
पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

    29-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
 
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच स्थानिक कुंभार समाजाने बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा, हा प्रश्न जिल्ह्यातील गणेशभक्तांसमोर निर्माण झाला होता. 
 
दरम्यान, महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तसेच कुंभार समाजाने आपली व्यथा मांडली. देवावरील श्रद्धा आणि जनभावनेची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक कुंभार समाजबांधवांच्या माध्यमातून या मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे.
 
कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरूंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे गणेशमूर्तींचे मोठे नुकसान झाले होते. कुरूंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम, असा मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक अत्यंत सलोख्याने दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र, यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातील बांधवानी बनवलेल्या गणेश मूर्ती पाण्यात वाहून गेल्या. कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री पाटील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरूंदवाड येथील कुंभार समाजबांधवांची समस्या जाणून या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेण येथून कुरूंदवाड येथे आणण्यात आल्या आहेत.”

 
 
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
 
“कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच स्थानिक कुंभार समाजाने बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा, हा प्रश्न जिल्ह्यातील गणेशभक्तांसमोर निर्माण झाला होता. ”
 

“दरम्यान, महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तसेच कुंभार समाजाने आपली व्यथा मांडली. देवावरील श्रद्धा आणि जनभावनेची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक कुंभार समाजबांधवांच्या माध्यमातून या मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे.”

 
“कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरूंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे गणेशमूर्तींचे मोठे नुकसान झाले होते. कुरूंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम, असा मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक अत्यंत सलोख्याने दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र, यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातील बांधवानी बनवलेल्या गणेश मूर्ती पाण्यात वाहून गेल्या. कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री पाटील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरूंदवाड येथील कुंभार समाजबांधवांची समस्या जाणून या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेण येथून कुरूंदवाड येथे आणण्यात आल्या आहेत.”

Continue reading

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...
Skip to content