HomeArchiveपूरबाधित कुटुंबियांच्या घरी...

पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

Details
पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

    29-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
 
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच स्थानिक कुंभार समाजाने बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा, हा प्रश्न जिल्ह्यातील गणेशभक्तांसमोर निर्माण झाला होता. 
 
दरम्यान, महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तसेच कुंभार समाजाने आपली व्यथा मांडली. देवावरील श्रद्धा आणि जनभावनेची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक कुंभार समाजबांधवांच्या माध्यमातून या मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे.
 
कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरूंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे गणेशमूर्तींचे मोठे नुकसान झाले होते. कुरूंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम, असा मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक अत्यंत सलोख्याने दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र, यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातील बांधवानी बनवलेल्या गणेश मूर्ती पाण्यात वाहून गेल्या. कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री पाटील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरूंदवाड येथील कुंभार समाजबांधवांची समस्या जाणून या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेण येथून कुरूंदवाड येथे आणण्यात आल्या आहेत.”

 
 
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
 
“कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच स्थानिक कुंभार समाजाने बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा, हा प्रश्न जिल्ह्यातील गणेशभक्तांसमोर निर्माण झाला होता. ”
 

“दरम्यान, महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तसेच कुंभार समाजाने आपली व्यथा मांडली. देवावरील श्रद्धा आणि जनभावनेची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक कुंभार समाजबांधवांच्या माध्यमातून या मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे.”

 
“कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरूंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे गणेशमूर्तींचे मोठे नुकसान झाले होते. कुरूंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम, असा मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक अत्यंत सलोख्याने दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र, यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातील बांधवानी बनवलेल्या गणेश मूर्ती पाण्यात वाहून गेल्या. कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री पाटील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरूंदवाड येथील कुंभार समाजबांधवांची समस्या जाणून या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेण येथून कुरूंदवाड येथे आणण्यात आल्या आहेत.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content