HomeArchiveपूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने...

पूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने दिले १० कोटी

Details
पूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने दिले १० कोटी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
साईबाबा संस्थान विश्वीस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी न्या‍यालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यामंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्किळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.

 
यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्था्न विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने घेण्यात आला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधेही पाठविणार आहे, असे ते म्हणाले.

राज्यशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतून बाहेर पडण्याासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचेही डॉ. हावरे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
साईबाबा संस्थान विश्वीस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी न्या‍यालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यामंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्किळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.

 
यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उद्ध्वस्त झाली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्था्न विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने घेण्यात आला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधेही पाठविणार आहे, असे ते म्हणाले.

राज्यशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतून बाहेर पडण्याासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचेही डॉ. हावरे यांनी सांगितले.”
 

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content