HomeArchiveपुन्हा लोकसभेत 'जय...

पुन्हा लोकसभेत ‘जय श्रीराम’ची घोषणा!

Details
पुन्हा लोकसभेत ‘जय श्रीराम’ची घोषणा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राममंदिराच्या उभारणीसाठी सुरूवातीपासूनच आग्रही असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा संसदेत ‘जय श्रीराम’ ची घोषणा दिली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी, राममंदिर उभारणीसाठी कठोर कायदा करण्याची मागणी लोकसभेच्या शून्य प्रहरात शुक्रवारी केली. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या शेवाळे यांनी दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच भाषणात राममंदिराच्या मुद्द्याला हात घालून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभेच्या शून्य प्रहरात खासदार शेवाळे यांनी 500 वर्षीय राम मंदिराच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, “1528 मध्ये मुघलांनी हिंदूंचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी राममंदिर उद्ध्वस्त करून त्याचठिकाणी मशिदीसारखा ढाचा उभा केला. पण याठिकाणी कधीही नमाज केला गेला नाही. 23 डिसेंबर 1949 पासून अयोध्येतील याठिकाणी रामाच्या भजन-कीर्तनांना सुरूवात झाली. त्याचवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी नायर यांनी ही वास्तू विवादास्पद ठरवून बंद केली. प्रत्यक्षात, याठिकाणी उत्खनन केले असता मंदिराचे अवशेष असल्याचे पुरावे सापडले. तरीही 70 वर्षे जगभरातील हिंदूंना न्याय मिळू शकला नाही. आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.”

 

खासदार शेवाळे पुढे म्हणाले, “गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारासह अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळी राम मंदिर उभारण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली” जगभरातील हिंदूंच्या भावनेचा आदर राखत राममंदिर उभारणीचा मार्ग खुला करण्यासाठी कठोर कायदा करावा, असेही ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राममंदिराच्या उभारणीसाठी सुरूवातीपासूनच आग्रही असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा संसदेत ‘जय श्रीराम’ ची घोषणा दिली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी, राममंदिर उभारणीसाठी कठोर कायदा करण्याची मागणी लोकसभेच्या शून्य प्रहरात शुक्रवारी केली. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या शेवाळे यांनी दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच भाषणात राममंदिराच्या मुद्द्याला हात घालून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभेच्या शून्य प्रहरात खासदार शेवाळे यांनी 500 वर्षीय राम मंदिराच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, “1528 मध्ये मुघलांनी हिंदूंचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी राममंदिर उद्ध्वस्त करून त्याचठिकाणी मशिदीसारखा ढाचा उभा केला. पण याठिकाणी कधीही नमाज केला गेला नाही. 23 डिसेंबर 1949 पासून अयोध्येतील याठिकाणी रामाच्या भजन-कीर्तनांना सुरूवात झाली. त्याचवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी नायर यांनी ही वास्तू विवादास्पद ठरवून बंद केली. प्रत्यक्षात, याठिकाणी उत्खनन केले असता मंदिराचे अवशेष असल्याचे पुरावे सापडले. तरीही 70 वर्षे जगभरातील हिंदूंना न्याय मिळू शकला नाही. आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.”

 

खासदार शेवाळे पुढे म्हणाले, “गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारासह अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळी राम मंदिर उभारण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली” जगभरातील हिंदूंच्या भावनेचा आदर राखत राममंदिर उभारणीचा मार्ग खुला करण्यासाठी कठोर कायदा करावा, असेही ते म्हणाले.”
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content