HomeArchiveपुन्हा लोकसभेत 'जय...

पुन्हा लोकसभेत ‘जय श्रीराम’ची घोषणा!

Details
पुन्हा लोकसभेत ‘जय श्रीराम’ची घोषणा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राममंदिराच्या उभारणीसाठी सुरूवातीपासूनच आग्रही असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा संसदेत ‘जय श्रीराम’ ची घोषणा दिली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी, राममंदिर उभारणीसाठी कठोर कायदा करण्याची मागणी लोकसभेच्या शून्य प्रहरात शुक्रवारी केली. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या शेवाळे यांनी दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच भाषणात राममंदिराच्या मुद्द्याला हात घालून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभेच्या शून्य प्रहरात खासदार शेवाळे यांनी 500 वर्षीय राम मंदिराच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, “1528 मध्ये मुघलांनी हिंदूंचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी राममंदिर उद्ध्वस्त करून त्याचठिकाणी मशिदीसारखा ढाचा उभा केला. पण याठिकाणी कधीही नमाज केला गेला नाही. 23 डिसेंबर 1949 पासून अयोध्येतील याठिकाणी रामाच्या भजन-कीर्तनांना सुरूवात झाली. त्याचवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी नायर यांनी ही वास्तू विवादास्पद ठरवून बंद केली. प्रत्यक्षात, याठिकाणी उत्खनन केले असता मंदिराचे अवशेष असल्याचे पुरावे सापडले. तरीही 70 वर्षे जगभरातील हिंदूंना न्याय मिळू शकला नाही. आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.”

 

खासदार शेवाळे पुढे म्हणाले, “गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारासह अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळी राम मंदिर उभारण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली” जगभरातील हिंदूंच्या भावनेचा आदर राखत राममंदिर उभारणीचा मार्ग खुला करण्यासाठी कठोर कायदा करावा, असेही ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राममंदिराच्या उभारणीसाठी सुरूवातीपासूनच आग्रही असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा संसदेत ‘जय श्रीराम’ ची घोषणा दिली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी, राममंदिर उभारणीसाठी कठोर कायदा करण्याची मागणी लोकसभेच्या शून्य प्रहरात शुक्रवारी केली. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या शेवाळे यांनी दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच भाषणात राममंदिराच्या मुद्द्याला हात घालून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभेच्या शून्य प्रहरात खासदार शेवाळे यांनी 500 वर्षीय राम मंदिराच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले, “1528 मध्ये मुघलांनी हिंदूंचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी राममंदिर उद्ध्वस्त करून त्याचठिकाणी मशिदीसारखा ढाचा उभा केला. पण याठिकाणी कधीही नमाज केला गेला नाही. 23 डिसेंबर 1949 पासून अयोध्येतील याठिकाणी रामाच्या भजन-कीर्तनांना सुरूवात झाली. त्याचवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी नायर यांनी ही वास्तू विवादास्पद ठरवून बंद केली. प्रत्यक्षात, याठिकाणी उत्खनन केले असता मंदिराचे अवशेष असल्याचे पुरावे सापडले. तरीही 70 वर्षे जगभरातील हिंदूंना न्याय मिळू शकला नाही. आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.”

 

खासदार शेवाळे पुढे म्हणाले, “गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारासह अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळी राम मंदिर उभारण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली” जगभरातील हिंदूंच्या भावनेचा आदर राखत राममंदिर उभारणीचा मार्ग खुला करण्यासाठी कठोर कायदा करावा, असेही ते म्हणाले.”
 

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content