HomeArchiveपुन्हा एकदा मेंदीच्या...

पुन्हा एकदा मेंदीच्या पानावर..

Details
पुन्हा एकदा मेंदीच्या पानावर..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पंचवीस वर्षांपूर्वी अविट गोडीच्या सुमधूर गीतांनी अवघ्या महाराष्ट्र व मराठी जगताला नादावून सोडलेल्या अष्टगंध निर्मित मेंदीचं पान पुन्हा प्रकटले आहे. 26 जुलैला तुफानी पर्जन्यवृष्टी असतानाही डोंबिवलीत मेंदीच्या पानाचा पुनरागमनाचा शुभारंभ सोहळा संपऩ्न झाला. रसिकांनी उदंड प्रतिसाद देत आपण या प्रतिक्षेत होतो याची पावती दिली.

सर्वेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रथम तुला वंदितो, मेंदीच्या पानावर, हा रूसवा सोड सखे, माझे राणी.. यासह सोळा गीतं सादर झाली. उत्तरार्धात रात्रीस खेळ चाले, येग रामाच्या, गोमू माहेरला जा, चंद्र आहे साक्षीला, गोमू संगतीनं.. यासह 12 गाणी सादर झाली. प्रभंजन-कीर्ति मराठे, दीपक कुंटे-काश्मिरा, भानुदास, प्रणिता, यांच्या संयुक्त व एकल गीत सादरीकरणाला रसिक जोरदार प्रतिसाद देत होते. मेंदीच्या पान प्रयोगाचं वैशिष्ट्य असलेले सूत्रधार व निवेदक बच्चू पांडे. त्यांच्या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद डोंबिवलीकरांचा लाभला.

सूर म्हणतो साथ दे.., दिवा म्हणतो वात दे.., गाण्याच्या या मैफलीला रसिका अशाीच साथ दे.., या गोड आवाहनाने मेंदीच्या पानाची सुरूवात हे एक आगळे वैशिष्ट्य. या दुसऱ्या शुभारंभातही ती तशीच झाली, त्यामुळे रसिक हरखून गेले.

अष्टगंध एकत्र आले

पंचवीस वर्षांनी उदय चितळे, प्रभंजन मराठे, भानूदास देशपांडे, अनिल जोशी, मधू बने, श्रूतकीर्ति मराठे, वासुदेव बापट, बच्चू पांडे हे अष्टगंध एका अनामिक प्रेरणेने एकत्र आले. पाच जून 2019 रोजी, प्रदीर्घ काळानंतर बच्चू पांडे यांनी सर्वांना एकत्र आणले. मेंदीच्या पानाचं पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय सर्वांनी चार तास सुसंवाद साधून घेतला. त्यानंतर सारेच तयारीस लागले. त्यानंतर अवघ्या दिड महिन्यातच मेंदीचं पान.. पुन्हा प्रकटले. आता संगीतवेडा महाराष्ट्र त्याचे स्वागत कसे करतो याची उत्सुकता आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पंचवीस वर्षांपूर्वी अविट गोडीच्या सुमधूर गीतांनी अवघ्या महाराष्ट्र व मराठी जगताला नादावून सोडलेल्या अष्टगंध निर्मित मेंदीचं पान पुन्हा प्रकटले आहे. 26 जुलैला तुफानी पर्जन्यवृष्टी असतानाही डोंबिवलीत मेंदीच्या पानाचा पुनरागमनाचा शुभारंभ सोहळा संपऩ्न झाला. रसिकांनी उदंड प्रतिसाद देत आपण या प्रतिक्षेत होतो याची पावती दिली.

सर्वेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रथम तुला वंदितो, मेंदीच्या पानावर, हा रूसवा सोड सखे, माझे राणी.. यासह सोळा गीतं सादर झाली. उत्तरार्धात रात्रीस खेळ चाले, येग रामाच्या, गोमू माहेरला जा, चंद्र आहे साक्षीला, गोमू संगतीनं.. यासह 12 गाणी सादर झाली. प्रभंजन-कीर्ति मराठे, दीपक कुंटे-काश्मिरा, भानुदास, प्रणिता, यांच्या संयुक्त व एकल गीत सादरीकरणाला रसिक जोरदार प्रतिसाद देत होते. मेंदीच्या पान प्रयोगाचं वैशिष्ट्य असलेले सूत्रधार व निवेदक बच्चू पांडे. त्यांच्या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद डोंबिवलीकरांचा लाभला.

सूर म्हणतो साथ दे.., दिवा म्हणतो वात दे.., गाण्याच्या या मैफलीला रसिका अशाीच साथ दे.., या गोड आवाहनाने मेंदीच्या पानाची सुरूवात हे एक आगळे वैशिष्ट्य. या दुसऱ्या शुभारंभातही ती तशीच झाली, त्यामुळे रसिक हरखून गेले.

अष्टगंध एकत्र आले

पंचवीस वर्षांनी उदय चितळे, प्रभंजन मराठे, भानूदास देशपांडे, अनिल जोशी, मधू बने, श्रूतकीर्ति मराठे, वासुदेव बापट, बच्चू पांडे हे अष्टगंध एका अनामिक प्रेरणेने एकत्र आले. पाच जून 2019 रोजी, प्रदीर्घ काळानंतर बच्चू पांडे यांनी सर्वांना एकत्र आणले. मेंदीच्या पानाचं पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय सर्वांनी चार तास सुसंवाद साधून घेतला. त्यानंतर सारेच तयारीस लागले. त्यानंतर अवघ्या दिड महिन्यातच मेंदीचं पान.. पुन्हा प्रकटले. आता संगीतवेडा महाराष्ट्र त्याचे स्वागत कसे करतो याची उत्सुकता आहे.”

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content