HomeArchiveनिवडणूक खर्चमर्यादेवर नव्याने...

निवडणूक खर्चमर्यादेवर नव्याने चर्चा!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“निवडणूक आयोगाने मतदारसंख्या आणि महागाई निर्देशांक तसेच इतर घटकांमध्ये झालेली वाढ पाहता उमेदवारांच्या खर्चमर्यादेच्या बाबींसंबंधी हरीश कुमार, निवृत्त आयआरएस आणि महासंचालक (अन्वेषण); उमेश सिन्हा सरचिटणीस आणि महासंचालक (अन्वेषण) यांची समिती स्थापन केली आहे. ”
 
“कोविड-19 परिस्थिती पाहता, विधि आणि न्याय मंत्रालयाने 19.10.2020 रोजी निवडणुकांचे आयोजन कायदा-1961 यातील 90व्या नियमात सुधारणा केली आहे, ज्यात सध्याच्या खर्च मर्यादेत 10% नी वाढ करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांसाठी ही 10% वाढ तत्काळ लागू होणार आहे. उमेदवार खर्चमर्यादेत यापूर्वी 2014मध्ये 28. 02. 2014 रोजी सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा निवडणुकांसंदर्भात 10. 10. 2018 रोजी सुधारणा करण्यात आली होती. ”
 
“गेल्या 6 वर्षांत मतदारसंख्येत 2019मध्ये 834 दशलक्षांहून 910 दशलक्षएवढी वाढ झाली. सध्या 921 दशलक्ष मतदारसंख्या आहे. तसेच महागाई निर्देशांकात याच कालावधीत 220 ते 280, 2019मध्ये आणि सध्या 301 एवढी वाढ झाली आहे.”
 
समितीसमोर संदर्भासाठी पुढील अटी/शर्ती असतील
 
1. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारांच्या संख्येतील बदल आणि त्यावरील खर्च याचा आढावा घेणे.
 
2. महागाई निर्देशांकातील बदल आणि अलिकडील निवडणुकांमध्ये उमेदवारांनी केलेल्या खर्चाच्या पध्दतीवरील परिणाम यांचे मूल्यांकन करणे.
 
3. राजकीय पक्ष आणि इतर भागधारकांची मते / माहिती घेणे.
 
4. खर्चासंबंधीच्या इतर घटकांचे परीक्षण करणे.
 
5. इतर कोणत्याही संबंधित मुद्याचे परीक्षण करणे.
 
6. समिती स्थापनेपासून 120 दिवसांत अहवाल सादर करेल.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content