HomeArchiveदेवनार पशुवधगृह येत्या...

देवनार पशुवधगृह येत्या बकरा ईदसाठी सज्ज!

Details
देवनार पशुवधगृह येत्या बकरा ईदसाठी सज्ज!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
हाजी अरफात शेख यांनी घेतला आढावा
आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह असलेले मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह येत्या 12 तारखेच्या बकरा ईदसाठी सज्ज झाले आहे. साधारण 2 लाख शेळ्या-मेंढ्या येथे येण्याचा अंदाज असल्याने महापालिकेने सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. शनिवारी संध्याकाळी या पशुवध केंद्राची राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष तसेच राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी मनपा आणि पोलिस अधिकार्यां समवेत या ठिकाणची पाहणी केली. या केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश शेट्टी, या विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भुजबळ, झुल्फीकार कुरेशी, हाजी रहमान, सोहेल शेख आणि अफझल शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री विनोद तावडे आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सुचनांचे पालक करण्यात आले असून तेथे सर्व सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यात आल्याचे हाजी अरफात शेख यांनी सांगितले. याबद्दल आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचे आभार मानतो असेही ते यावेळी म्हणाले.
 
आतापर्यंत 81 हजार 308 शेळ्या-मेंढ्या तर 15 शेच्या वर मोठ्या जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. या परिसरात सर्व सुरक्षायंत्रणा चोख राहवी म्हणून 11 फूट उंचीचे 15 टॉवर्स व 22 फूट उंचीचा चेक टॉवर, 16 इतर टॉवर्स उभारण्यात आले आहेत. परिसरावर लक्ष ठेवता यावे म्हणून 208 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या 300 करण्यात आली आहे. जनावरांची चोरी होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. प्रवेशपत्रांचे बारकोडींग, स्मार्ट कार्ड अशा डिजीटल यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे.
 
बाहेरून आलेल्या विक्रेत्यांना व्यापार्यांेना योग्य त्या सोईसुविधा पुरवण्याचे काम महापालिका यंत्रणेने केले असून सुरक्षेची काळजी पोलीसयंत्रणेने घेतली आहे. यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
हाजी अरफात शेख यांनी घेतला आढावा
आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह असलेले मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह येत्या 12 तारखेच्या बकरा ईदसाठी सज्ज झाले आहे. साधारण 2 लाख शेळ्या-मेंढ्या येथे येण्याचा अंदाज असल्याने महापालिकेने सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. शनिवारी संध्याकाळी या पशुवध केंद्राची राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष तसेच राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी मनपा आणि पोलिस अधिकार्यां समवेत या ठिकाणची पाहणी केली. या केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश शेट्टी, या विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भुजबळ, झुल्फीकार कुरेशी, हाजी रहमान, सोहेल शेख आणि अफझल शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री विनोद तावडे आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सुचनांचे पालक करण्यात आले असून तेथे सर्व सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यात आल्याचे हाजी अरफात शेख यांनी सांगितले. याबद्दल आम्ही मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांचे आभार मानतो असेही ते यावेळी म्हणाले.
 
आतापर्यंत 81 हजार 308 शेळ्या-मेंढ्या तर 15 शेच्या वर मोठ्या जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. या परिसरात सर्व सुरक्षायंत्रणा चोख राहवी म्हणून 11 फूट उंचीचे 15 टॉवर्स व 22 फूट उंचीचा चेक टॉवर, 16 इतर टॉवर्स उभारण्यात आले आहेत. परिसरावर लक्ष ठेवता यावे म्हणून 208 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या 300 करण्यात आली आहे. जनावरांची चोरी होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. प्रवेशपत्रांचे बारकोडींग, स्मार्ट कार्ड अशा डिजीटल यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे.
 
बाहेरून आलेल्या विक्रेत्यांना व्यापार्यांेना योग्य त्या सोईसुविधा पुरवण्याचे काम महापालिका यंत्रणेने केले असून सुरक्षेची काळजी पोलीसयंत्रणेने घेतली आहे. यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.”
 
 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content