HomeArchive"दासावा"मध्ये रंगला आहे...

“दासावा”मध्ये रंगला आहे मुंबई शहर ग्रंथोत्सव!

Details
“””दासावा””मध्ये रंगला आहे मुंबई शहर ग्रंथोत्सव!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

एकशे अकरा वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या दादर सार्वजनिक वाचनालयात सोमवारपासून दोन दिवसांचा मुंबई शहर ग्रंथोत्सव होत आहे. या महोत्सवात वाचनसंस्कृती आणि ग्रंथ चळवळीला वाहिलेल्या दर्जेदार प्रबोधनात्मक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ग्रंथालय संचालनालय मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुरू सभागृहात या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने हा ग्रंथोत्सव सुरू झाला.

 

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. साडेअकरा ते दीड या दरम्यान वाचनसंस्कृती व ग्रंथ चळवळ कशी वाढेल या विषयावर परिसंवाद झाला. दुपारी नाट्य व खुली चर्चा रंगली. मी, फॅमिली, मोबाईल आणि वाचनसंस्कृती या विषयाचा त्यात वेध घेतला गेला. संध्याकाळी साहित्यातून उमललेले स्वरतरंग कार्यक्रम रंगला.

 

आज, मंगळवारी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत महात्मा गांधी यांचे साहित्य आणि विचार या विषयावर प्राध्यापक व्याप जवाहर मुथा यांचे व्याख्यान होईल. सकाळी 10 ते 11 या दरम्यान मराठी भाषा उपरी होते का यावर रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून परिसंवाद होणार आहे. यात सुशिला महाराव, डॉ. लीला गोविलकर आणि कांचन घाणेकर यांचा सहभाग होणार आहे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मराठी साहित्यातील आधुनिकता या विषयावर रंगणाऱ्या परिसंवादात डॉ. शीतल पावसकर, लता पांचाळ, डॉ. प्रतिभा टेंबे मतप्रदर्शन करणार आहेत.
दुपारी दोन ते चार दरम्यान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या आठवणींना त्यांचे कुटुंबीय उजाळा देणार आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे जयंत देशपांडे आणि दीपा देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी रसिकांसमोर मांडणार आहेत. पुलंवरचा माहितीपट, घरगुती किस्से आणि त्याचबरोबर पुलंच्या शब्दांत फुलं, ही ध्वनिफीत रसिकांना पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर साडेचार ते पावणेपाच या दरम्यान गाजलांजली हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. सायंकाळी सहा वाजता ग्रंथोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती भीमराव जीवणे, चंद्रशेखर देशमुख आणि दत्ता कामथे यांनी दिली.”
 
“एकशे अकरा वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या दादर सार्वजनिक वाचनालयात सोमवारपासून दोन दिवसांचा मुंबई शहर ग्रंथोत्सव होत आहे. या महोत्सवात वाचनसंस्कृती आणि ग्रंथ चळवळीला वाहिलेल्या दर्जेदार प्रबोधनात्मक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ग्रंथालय संचालनालय मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुरू सभागृहात या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने हा ग्रंथोत्सव सुरू झाला.

 

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. साडेअकरा ते दीड या दरम्यान वाचनसंस्कृती व ग्रंथ चळवळ कशी वाढेल या विषयावर परिसंवाद झाला. दुपारी नाट्य व खुली चर्चा रंगली. मी, फॅमिली, मोबाईल आणि वाचनसंस्कृती या विषयाचा त्यात वेध घेतला गेला. संध्याकाळी साहित्यातून उमललेले स्वरतरंग कार्यक्रम रंगला.

 

आज, मंगळवारी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत महात्मा गांधी यांचे साहित्य आणि विचार या विषयावर प्राध्यापक व्याप जवाहर मुथा यांचे व्याख्यान होईल. सकाळी 10 ते 11 या दरम्यान मराठी भाषा उपरी होते का यावर रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून परिसंवाद होणार आहे. यात सुशिला महाराव, डॉ. लीला गोविलकर आणि कांचन घाणेकर यांचा सहभाग होणार आहे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मराठी साहित्यातील आधुनिकता या विषयावर रंगणाऱ्या परिसंवादात डॉ. शीतल पावसकर, लता पांचाळ, डॉ. प्रतिभा टेंबे मतप्रदर्शन करणार आहेत.
दुपारी दोन ते चार दरम्यान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या आठवणींना त्यांचे कुटुंबीय उजाळा देणार आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे जयंत देशपांडे आणि दीपा देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी रसिकांसमोर मांडणार आहेत. पुलंवरचा माहितीपट, घरगुती किस्से आणि त्याचबरोबर पुलंच्या शब्दांत फुलं, ही ध्वनिफीत रसिकांना पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर साडेचार ते पावणेपाच या दरम्यान गाजलांजली हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. सायंकाळी सहा वाजता ग्रंथोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती भीमराव जीवणे, चंद्रशेखर देशमुख आणि दत्ता कामथे यांनी दिली.”
 
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content