HomeArchive"दासावा"मध्ये रंगला आहे...

“दासावा”मध्ये रंगला आहे मुंबई शहर ग्रंथोत्सव!

Details
“””दासावा””मध्ये रंगला आहे मुंबई शहर ग्रंथोत्सव!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

एकशे अकरा वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या दादर सार्वजनिक वाचनालयात सोमवारपासून दोन दिवसांचा मुंबई शहर ग्रंथोत्सव होत आहे. या महोत्सवात वाचनसंस्कृती आणि ग्रंथ चळवळीला वाहिलेल्या दर्जेदार प्रबोधनात्मक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ग्रंथालय संचालनालय मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुरू सभागृहात या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने हा ग्रंथोत्सव सुरू झाला.

 

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. साडेअकरा ते दीड या दरम्यान वाचनसंस्कृती व ग्रंथ चळवळ कशी वाढेल या विषयावर परिसंवाद झाला. दुपारी नाट्य व खुली चर्चा रंगली. मी, फॅमिली, मोबाईल आणि वाचनसंस्कृती या विषयाचा त्यात वेध घेतला गेला. संध्याकाळी साहित्यातून उमललेले स्वरतरंग कार्यक्रम रंगला.

 

आज, मंगळवारी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत महात्मा गांधी यांचे साहित्य आणि विचार या विषयावर प्राध्यापक व्याप जवाहर मुथा यांचे व्याख्यान होईल. सकाळी 10 ते 11 या दरम्यान मराठी भाषा उपरी होते का यावर रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून परिसंवाद होणार आहे. यात सुशिला महाराव, डॉ. लीला गोविलकर आणि कांचन घाणेकर यांचा सहभाग होणार आहे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मराठी साहित्यातील आधुनिकता या विषयावर रंगणाऱ्या परिसंवादात डॉ. शीतल पावसकर, लता पांचाळ, डॉ. प्रतिभा टेंबे मतप्रदर्शन करणार आहेत.
दुपारी दोन ते चार दरम्यान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या आठवणींना त्यांचे कुटुंबीय उजाळा देणार आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे जयंत देशपांडे आणि दीपा देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी रसिकांसमोर मांडणार आहेत. पुलंवरचा माहितीपट, घरगुती किस्से आणि त्याचबरोबर पुलंच्या शब्दांत फुलं, ही ध्वनिफीत रसिकांना पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर साडेचार ते पावणेपाच या दरम्यान गाजलांजली हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. सायंकाळी सहा वाजता ग्रंथोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती भीमराव जीवणे, चंद्रशेखर देशमुख आणि दत्ता कामथे यांनी दिली.”
 
“एकशे अकरा वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या दादर सार्वजनिक वाचनालयात सोमवारपासून दोन दिवसांचा मुंबई शहर ग्रंथोत्सव होत आहे. या महोत्सवात वाचनसंस्कृती आणि ग्रंथ चळवळीला वाहिलेल्या दर्जेदार प्रबोधनात्मक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ग्रंथालय संचालनालय मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुरू सभागृहात या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने हा ग्रंथोत्सव सुरू झाला.

 

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. साडेअकरा ते दीड या दरम्यान वाचनसंस्कृती व ग्रंथ चळवळ कशी वाढेल या विषयावर परिसंवाद झाला. दुपारी नाट्य व खुली चर्चा रंगली. मी, फॅमिली, मोबाईल आणि वाचनसंस्कृती या विषयाचा त्यात वेध घेतला गेला. संध्याकाळी साहित्यातून उमललेले स्वरतरंग कार्यक्रम रंगला.

 

आज, मंगळवारी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत महात्मा गांधी यांचे साहित्य आणि विचार या विषयावर प्राध्यापक व्याप जवाहर मुथा यांचे व्याख्यान होईल. सकाळी 10 ते 11 या दरम्यान मराठी भाषा उपरी होते का यावर रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून परिसंवाद होणार आहे. यात सुशिला महाराव, डॉ. लीला गोविलकर आणि कांचन घाणेकर यांचा सहभाग होणार आहे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मराठी साहित्यातील आधुनिकता या विषयावर रंगणाऱ्या परिसंवादात डॉ. शीतल पावसकर, लता पांचाळ, डॉ. प्रतिभा टेंबे मतप्रदर्शन करणार आहेत.
दुपारी दोन ते चार दरम्यान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या आठवणींना त्यांचे कुटुंबीय उजाळा देणार आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे जयंत देशपांडे आणि दीपा देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी रसिकांसमोर मांडणार आहेत. पुलंवरचा माहितीपट, घरगुती किस्से आणि त्याचबरोबर पुलंच्या शब्दांत फुलं, ही ध्वनिफीत रसिकांना पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर साडेचार ते पावणेपाच या दरम्यान गाजलांजली हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. सायंकाळी सहा वाजता ग्रंथोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती भीमराव जीवणे, चंद्रशेखर देशमुख आणि दत्ता कामथे यांनी दिली.”
 
 

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content