HomeArchiveतांडा सुधार समितीच्या...

तांडा सुधार समितीच्या गोर बंजारा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Details
तांडा सुधार समितीच्या गोर बंजारा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
अखिल भारतीय तांडा सुधार समितीतर्फे आयोजित करण्यात आलेले पहिले अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन, नागपूरमध्ये नुकतेच मोठ्या दिमाखात साजरे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमदास महाराज वलोनीकर होते. संमेलनाचे उद्घाटन श्याम गुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रस्ताविक भाषणात प्रा. डॉ. प्रकाश राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भजनकरी/शाहीरांनी समाजात प्रबोधन करताना विज्ञानवाद तसेच शिक्षणाचं महत्त्व समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचार करून समाजाला जागृत करण्याचे काम केले पाहिजे. संत सेवाभाया यांचे विचार विज्ञानवादी असून समाजाला दिशा देणारे होते व समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी सेवाभाया बरोबरच संत कबीर, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार भजनकरी शाहीरांच्या प्रबोधनाने झाले पाहिजे. त्याचाच धागा पकडून बंजारा समाजातील भजनकरी/शाहीर यांनी अशा पद्धतीने समाजात प्रबोधन केले पाहिजे.

 

मुख्य संयोजक नामा बंजारा यांनीदेखील अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन घेण्यामागचे ध्येय व उद्देश सांगत ज्या पद्धतीने प्रत्येक समाजात शाहीर लोकांना शासनाच्या वतीने मानधन मिळत आहे, त्याच धर्तीवर बंजारा समाजातील भजनकरी मंडळींनादेखील या समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.

 

उदघाटक श्याम मुडे यांनी स्पष्टपणे सांगताना समाजाला शिक्षित करण्याचे काम जर कोणी करत असतील तर ते फक्त भजनकरी मंडळी करत आली आले आहे आणि या संमेलनाच्या माध्यमातून येणाऱ्या नविन पीढीला दिशा देण्याचे काम या भजनकरी मंडळींकडून अपेक्षित आहे, असा आशावाद व्यक्त केला.

 

अध्यक्षीय भाषणात प्रेमदास महाराज यांनी अत्यंत आनंद व्यक्त करताना सांगितले की, समाजात गेल्या कित्येक वर्षांपासून भजनकरी मंडळी प्रबोधनाचं काम समाजात करत आहेत आणि त्या अनुषंगाने समाजाला जागृत करण्याचे काम आतापर्यंत करत आले आहेत. पण या अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या माध्यमातून अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर यांना गठीत करून शासनाकडे पाठपुरावा करून ही समिती समाजात प्रबोधन करणाऱ्या भजनकरी मंडळीना शासनाकडून मानधन मिळावे यासाठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ७०० ते ७५० भजनकरी तसेच भजनी रसिक यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या भजनकरींनी गायलेल्या भजनांचा आनंद घेतला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
अखिल भारतीय तांडा सुधार समितीतर्फे आयोजित करण्यात आलेले पहिले अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन, नागपूरमध्ये नुकतेच मोठ्या दिमाखात साजरे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमदास महाराज वलोनीकर होते. संमेलनाचे उद्घाटन श्याम गुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रस्ताविक भाषणात प्रा. डॉ. प्रकाश राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भजनकरी/शाहीरांनी समाजात प्रबोधन करताना विज्ञानवाद तसेच शिक्षणाचं महत्त्व समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचार करून समाजाला जागृत करण्याचे काम केले पाहिजे. संत सेवाभाया यांचे विचार विज्ञानवादी असून समाजाला दिशा देणारे होते व समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी सेवाभाया बरोबरच संत कबीर, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार भजनकरी शाहीरांच्या प्रबोधनाने झाले पाहिजे. त्याचाच धागा पकडून बंजारा समाजातील भजनकरी/शाहीर यांनी अशा पद्धतीने समाजात प्रबोधन केले पाहिजे.

 

मुख्य संयोजक नामा बंजारा यांनीदेखील अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर संमेलन घेण्यामागचे ध्येय व उद्देश सांगत ज्या पद्धतीने प्रत्येक समाजात शाहीर लोकांना शासनाच्या वतीने मानधन मिळत आहे, त्याच धर्तीवर बंजारा समाजातील भजनकरी मंडळींनादेखील या समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.

 

उदघाटक श्याम मुडे यांनी स्पष्टपणे सांगताना समाजाला शिक्षित करण्याचे काम जर कोणी करत असतील तर ते फक्त भजनकरी मंडळी करत आली आले आहे आणि या संमेलनाच्या माध्यमातून येणाऱ्या नविन पीढीला दिशा देण्याचे काम या भजनकरी मंडळींकडून अपेक्षित आहे, असा आशावाद व्यक्त केला.

 

अध्यक्षीय भाषणात प्रेमदास महाराज यांनी अत्यंत आनंद व्यक्त करताना सांगितले की, समाजात गेल्या कित्येक वर्षांपासून भजनकरी मंडळी प्रबोधनाचं काम समाजात करत आहेत आणि त्या अनुषंगाने समाजाला जागृत करण्याचे काम आतापर्यंत करत आले आहेत. पण या अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या माध्यमातून अखिल भारतीय गोर बंजारा भजनकरी/शाहीर यांना गठीत करून शासनाकडे पाठपुरावा करून ही समिती समाजात प्रबोधन करणाऱ्या भजनकरी मंडळीना शासनाकडून मानधन मिळावे यासाठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ७०० ते ७५० भजनकरी तसेच भजनी रसिक यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या भजनकरींनी गायलेल्या भजनांचा आनंद घेतला.”
 
 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content