HomeArchiveडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीसाठी मतदान करा – राहुल शेवाळे

Details
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीसाठी मतदान करा – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रविवारी बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. शेवाळे यांचाही रविवारी जन्मदिन असल्याने रामदास आठवले यांनी राहुल शेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शाल दिली तर राहुल शेवाळेंनी वाढदिवसाचं निमित्त साधत रामदास आठवलेंचा मुलगा जीत आणि इतर विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचं ‘रूपयाचा प्रश्न’ हे पुस्तक वाटलं. “विद्यार्थी दशेतच जर बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांना समजले तर ते सक्षम भारतीय नागरिक बनतील. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवे” असे आवाहनही शेवाळे यांनी यावेळी केले. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

प्रचारादरम्यान साजरा केला वाढदिवस

दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना रविवारी प्राचारादरम्यान नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सुखद धक्का दिला. प्रचारादरम्यानच नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जागोजागी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जनतेने दिलेल्या या सुखद धक्क्याने ते भारावले. 14 एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी, राहुल शेवाळे यांचाही वाढदिवस असतो. मात्र, लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा प्रचाराला वेळ देणे त्यांनी पसंत केले. सकाळी 9 च्या दरम्यान देवनार परिसरात प्रचारफेरीला सुरूवात झाली. मात्र मध्येच प्रचारफेरीत काही नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत केक कापून शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशाच रीतीने सुमारे 5 ते 6 ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रविवारी बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. शेवाळे यांचाही रविवारी जन्मदिन असल्याने रामदास आठवले यांनी राहुल शेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शाल दिली तर राहुल शेवाळेंनी वाढदिवसाचं निमित्त साधत रामदास आठवलेंचा मुलगा जीत आणि इतर विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचं ‘रूपयाचा प्रश्न’ हे पुस्तक वाटलं. “विद्यार्थी दशेतच जर बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांना समजले तर ते सक्षम भारतीय नागरिक बनतील. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवे” असे आवाहनही शेवाळे यांनी यावेळी केले. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

प्रचारादरम्यान साजरा केला वाढदिवस

दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना रविवारी प्राचारादरम्यान नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सुखद धक्का दिला. प्रचारादरम्यानच नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जागोजागी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जनतेने दिलेल्या या सुखद धक्क्याने ते भारावले. 14 एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी, राहुल शेवाळे यांचाही वाढदिवस असतो. मात्र, लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा प्रचाराला वेळ देणे त्यांनी पसंत केले. सकाळी 9 च्या दरम्यान देवनार परिसरात प्रचारफेरीला सुरूवात झाली. मात्र मध्येच प्रचारफेरीत काही नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत केक कापून शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशाच रीतीने सुमारे 5 ते 6 ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 
 ”
 
 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content