HomeArchiveडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीसाठी मतदान करा – राहुल शेवाळे

Details
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीसाठी मतदान करा – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रविवारी बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. शेवाळे यांचाही रविवारी जन्मदिन असल्याने रामदास आठवले यांनी राहुल शेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शाल दिली तर राहुल शेवाळेंनी वाढदिवसाचं निमित्त साधत रामदास आठवलेंचा मुलगा जीत आणि इतर विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचं ‘रूपयाचा प्रश्न’ हे पुस्तक वाटलं. “विद्यार्थी दशेतच जर बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांना समजले तर ते सक्षम भारतीय नागरिक बनतील. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवे” असे आवाहनही शेवाळे यांनी यावेळी केले. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

प्रचारादरम्यान साजरा केला वाढदिवस

दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना रविवारी प्राचारादरम्यान नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सुखद धक्का दिला. प्रचारादरम्यानच नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जागोजागी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जनतेने दिलेल्या या सुखद धक्क्याने ते भारावले. 14 एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी, राहुल शेवाळे यांचाही वाढदिवस असतो. मात्र, लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा प्रचाराला वेळ देणे त्यांनी पसंत केले. सकाळी 9 च्या दरम्यान देवनार परिसरात प्रचारफेरीला सुरूवात झाली. मात्र मध्येच प्रचारफेरीत काही नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत केक कापून शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशाच रीतीने सुमारे 5 ते 6 ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रविवारी बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. शेवाळे यांचाही रविवारी जन्मदिन असल्याने रामदास आठवले यांनी राहुल शेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शाल दिली तर राहुल शेवाळेंनी वाढदिवसाचं निमित्त साधत रामदास आठवलेंचा मुलगा जीत आणि इतर विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचं ‘रूपयाचा प्रश्न’ हे पुस्तक वाटलं. “विद्यार्थी दशेतच जर बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांना समजले तर ते सक्षम भारतीय नागरिक बनतील. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवे” असे आवाहनही शेवाळे यांनी यावेळी केले. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

प्रचारादरम्यान साजरा केला वाढदिवस

दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना रविवारी प्राचारादरम्यान नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सुखद धक्का दिला. प्रचारादरम्यानच नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जागोजागी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जनतेने दिलेल्या या सुखद धक्क्याने ते भारावले. 14 एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी, राहुल शेवाळे यांचाही वाढदिवस असतो. मात्र, लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वाढदिवस साजरा करण्यापेक्षा प्रचाराला वेळ देणे त्यांनी पसंत केले. सकाळी 9 च्या दरम्यान देवनार परिसरात प्रचारफेरीला सुरूवात झाली. मात्र मध्येच प्रचारफेरीत काही नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत केक कापून शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशाच रीतीने सुमारे 5 ते 6 ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 
 ”
 
 
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content