HomeArchiveडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी...

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदेंचे संसदेत खासगी विधेयक

Details
डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदेंचे संसदेत खासगी विधेयक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
डॉक्टर आणि रूग्णालयांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी अस्तित्वातील कायदे निष्प्रभ ठरत असल्यामुळे स्वतः डॉक्टर असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या कायद्याचे खासगी विधेयक मांडले.

डॉक्टर तसेच रूग्णालयांवर हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत. डॉक्टरांच्या हेतूवरच शंका घेऊन रूग्णाच्या नातलगांकडून हल्ले केले जातात. पोलीस आणि सरकार हे हल्ले रोखण्यास तसेच हल्लेखोरांना अटक करून न्यायपालिकेमार्फत त्यांना शिक्षा देण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच हे प्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी यापूर्वी लोकसभेत केली होती. मात्र, या मागणीची दखल घेतली न गेल्यामुळे शुक्रवारी खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत याबाबतचे खासगी विधेयक मांडले. याअंतर्गत हल्लेखोरांना किमान सहा महिने ते कमाल पाच वर्षे तुरूंगवास आणि किमान पाच हजार ते कमाल पाच लाख रूपयांचा आर्थिक दंड या शिक्षेची तरतूद आहे. तसेच, हल्ल्यात स्थावर, जंगम मालमत्तेचे जे नुकसान होईल, त्याचीही वसुली हल्लेखोराकडून करण्याची तरतूद या खासगी विधेयकात आहे.

आर्थिक दंड भरण्याची क्षमता हल्लेखोरांची नसल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही विधेयकात आहे. त्याचबरोबर, उपचार करण्यापूर्वी रूग्ण आणि नातलगांना रूग्णाची सद्यस्थिती, करावे लागणारे वैद्यकीय उपचार आणि त्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया, या उपचारांचे होऊ शकणारे परिणाम, त्यातील संभाव्य धोके यांची संपूर्ण कल्पना लिखित स्वरूपात देण्याची जबाबदारी डॉक्टरांवर टाकण्यात आली आहे. या कठोर कलमांमुळे डॉक्टर अथवा रूग्णालयांवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर दहादा विचार करतील. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांना शिक्षा होण्याऐवजी हल्ला होऊच नये, यादृष्टीने कायद्यात कठोर कलमांची तरतूद करण्यात आल्याचे खा. शिंदे यांनी सांगितले. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासही या कायद्यामुळे मदत होईल, असेही त्यांनी या विधेयकात म्हटले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
डॉक्टर आणि रूग्णालयांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी अस्तित्वातील कायदे निष्प्रभ ठरत असल्यामुळे स्वतः डॉक्टर असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या कायद्याचे खासगी विधेयक मांडले.

डॉक्टर तसेच रूग्णालयांवर हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत. डॉक्टरांच्या हेतूवरच शंका घेऊन रूग्णाच्या नातलगांकडून हल्ले केले जातात. पोलीस आणि सरकार हे हल्ले रोखण्यास तसेच हल्लेखोरांना अटक करून न्यायपालिकेमार्फत त्यांना शिक्षा देण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच हे प्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी यापूर्वी लोकसभेत केली होती. मात्र, या मागणीची दखल घेतली न गेल्यामुळे शुक्रवारी खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत याबाबतचे खासगी विधेयक मांडले. याअंतर्गत हल्लेखोरांना किमान सहा महिने ते कमाल पाच वर्षे तुरूंगवास आणि किमान पाच हजार ते कमाल पाच लाख रूपयांचा आर्थिक दंड या शिक्षेची तरतूद आहे. तसेच, हल्ल्यात स्थावर, जंगम मालमत्तेचे जे नुकसान होईल, त्याचीही वसुली हल्लेखोराकडून करण्याची तरतूद या खासगी विधेयकात आहे.

आर्थिक दंड भरण्याची क्षमता हल्लेखोरांची नसल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही विधेयकात आहे. त्याचबरोबर, उपचार करण्यापूर्वी रूग्ण आणि नातलगांना रूग्णाची सद्यस्थिती, करावे लागणारे वैद्यकीय उपचार आणि त्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया, या उपचारांचे होऊ शकणारे परिणाम, त्यातील संभाव्य धोके यांची संपूर्ण कल्पना लिखित स्वरूपात देण्याची जबाबदारी डॉक्टरांवर टाकण्यात आली आहे. या कठोर कलमांमुळे डॉक्टर अथवा रूग्णालयांवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर दहादा विचार करतील. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांना शिक्षा होण्याऐवजी हल्ला होऊच नये, यादृष्टीने कायद्यात कठोर कलमांची तरतूद करण्यात आल्याचे खा. शिंदे यांनी सांगितले. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासही या कायद्यामुळे मदत होईल, असेही त्यांनी या विधेयकात म्हटले आहे.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content