HomeArchiveट्रॉम्बे ते गेट...

ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू करा! खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

Details
ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू करा! खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

वाहनांची वाढती संख्या, होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि शहराच्या रस्त्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यावर उपाय म्हणून मानखुर्दजवळच्या ट्रॉम्बे येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.

हा जलवाहतुकीचा मार्ग लवकरात लवकर सुरू करून त्यानंतर शहरांतर्गत जलवाहतुकीसाठी नवे पर्यायही शोधण्याची गरज असल्याचे शेवाळे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नमूद केले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दररोज सुमारे सहा लाख वाहने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचे, स्पष्ट झाले आहे. मुंबईत, देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी येत असतात. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण या समस्यांबरोबरच प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे. मुंबईतील जागा आता नव्याने वाढू शकत नाही. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्याय सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करावा आणि त्याची सुरूवात ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गाने करावी, असे खासदार शेवाळे यांनी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्र्यांना सांगितले. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. याआधीही शेवाळे यांनी या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती.”
 
“केएचएल ब्युरो

वाहनांची वाढती संख्या, होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि शहराच्या रस्त्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यावर उपाय म्हणून मानखुर्दजवळच्या ट्रॉम्बे येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.

हा जलवाहतुकीचा मार्ग लवकरात लवकर सुरू करून त्यानंतर शहरांतर्गत जलवाहतुकीसाठी नवे पर्यायही शोधण्याची गरज असल्याचे शेवाळे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नमूद केले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दररोज सुमारे सहा लाख वाहने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचे, स्पष्ट झाले आहे. मुंबईत, देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी येत असतात. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण या समस्यांबरोबरच प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे. मुंबईतील जागा आता नव्याने वाढू शकत नाही. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्याय सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करावा आणि त्याची सुरूवात ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गाने करावी, असे खासदार शेवाळे यांनी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्र्यांना सांगितले. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. याआधीही शेवाळे यांनी या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती.”

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content