HomeArchiveट्रॉम्बे ते गेट...

ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू करा! खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

Details
ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू करा! खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

वाहनांची वाढती संख्या, होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि शहराच्या रस्त्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यावर उपाय म्हणून मानखुर्दजवळच्या ट्रॉम्बे येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.

हा जलवाहतुकीचा मार्ग लवकरात लवकर सुरू करून त्यानंतर शहरांतर्गत जलवाहतुकीसाठी नवे पर्यायही शोधण्याची गरज असल्याचे शेवाळे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नमूद केले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दररोज सुमारे सहा लाख वाहने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचे, स्पष्ट झाले आहे. मुंबईत, देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी येत असतात. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण या समस्यांबरोबरच प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे. मुंबईतील जागा आता नव्याने वाढू शकत नाही. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्याय सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करावा आणि त्याची सुरूवात ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गाने करावी, असे खासदार शेवाळे यांनी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्र्यांना सांगितले. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. याआधीही शेवाळे यांनी या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती.”
 
“केएचएल ब्युरो

वाहनांची वाढती संख्या, होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि शहराच्या रस्त्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यावर उपाय म्हणून मानखुर्दजवळच्या ट्रॉम्बे येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.

हा जलवाहतुकीचा मार्ग लवकरात लवकर सुरू करून त्यानंतर शहरांतर्गत जलवाहतुकीसाठी नवे पर्यायही शोधण्याची गरज असल्याचे शेवाळे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नमूद केले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दररोज सुमारे सहा लाख वाहने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचे, स्पष्ट झाले आहे. मुंबईत, देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी येत असतात. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण या समस्यांबरोबरच प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे. मुंबईतील जागा आता नव्याने वाढू शकत नाही. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्याय सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करावा आणि त्याची सुरूवात ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गाने करावी, असे खासदार शेवाळे यांनी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्र्यांना सांगितले. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. याआधीही शेवाळे यांनी या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content