HomeArchiveटेट्रापॉड म्हणजे सुशोभिकरण...

टेट्रापॉड म्हणजे सुशोभिकरण नव्हे – राहुल शेवाळे!

Details
टेट्रापॉड म्हणजे सुशोभिकरण नव्हे – राहुल शेवाळे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नितीन सरदेसाईंवर केला पलटवार

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर-माहीम चौपाटीचे सुशोभिकरण करण्याच्या कामाचे भूमीपूजन बुधवारी खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते झाल्यानंतर हैराण झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी त्यावर टीका केली. खासदार शेवाळे यांनी यानिमित्ताने सरदेसाई यांच्यावर पलटवार केला आहे.

सरदेसाईंना उद्द्येशून ते माणाले की, माझा आता केवळ एकच प्रश्न आहे, आता दादर जनतेसाठी सुरू झालेल्या सौन्दर्यीकरणाच्या कामात तुम्हाला खोडा घालायचा आहे का? तुम्ही केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी काही अधिकाऱ्यांना हाताशी पकडून अशास्त्रीय पद्धतीने दादर चौपाटी इथं टेट्रापॉड टाकलेत. याच कामाला तुम्ही सुशोभीकरण म्हणत असाल तर तुम्ही सुशोभीकरण केलंत. आता राहिला प्रश्न कालच्या भूमीपूजनाचा.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हा प्रकल्प मी मंजूर करून घेतला. या प्रकल्पात होणारी विविंग गॅलरी, प्रोमोनाड, सोलर पॅनल या गोष्टींची संकल्पना माझी होती. मला कंत्राटदाराच्या फायद्यासाठी केवळ चौपाटीवर एक रस्ता बनवायचा नव्हता तर दादरकर जनतेसाठी आणि पर्यायाने मुंबईकरांसाठी एक नवं लँडमार्क टुरिस्ट डेस्टिनेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपल्यासारख्या जनतेने नाकारलेल्या लोकप्रतिनिधीने कितीही आकांडतांडव केले, तरी ते व्यर्थ आहे. दादर शिवाजीपार्कच्या सुशोभिकरणाच्या कामात खोडा घालून ते सुशोभिकरण जसं मनसेमुळे रखडलं आहे, तसा प्रकार मी या दादर चौपाटी सौन्दर्यीकरणाच्या बाबतीत होऊ देणार नाही, असेही दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.”
 
“नितीन सरदेसाईंवर केला पलटवार

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर-माहीम चौपाटीचे सुशोभिकरण करण्याच्या कामाचे भूमीपूजन बुधवारी खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते झाल्यानंतर हैराण झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी त्यावर टीका केली. खासदार शेवाळे यांनी यानिमित्ताने सरदेसाई यांच्यावर पलटवार केला आहे.

सरदेसाईंना उद्द्येशून ते माणाले की, माझा आता केवळ एकच प्रश्न आहे, आता दादर जनतेसाठी सुरू झालेल्या सौन्दर्यीकरणाच्या कामात तुम्हाला खोडा घालायचा आहे का? तुम्ही केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी काही अधिकाऱ्यांना हाताशी पकडून अशास्त्रीय पद्धतीने दादर चौपाटी इथं टेट्रापॉड टाकलेत. याच कामाला तुम्ही सुशोभीकरण म्हणत असाल तर तुम्ही सुशोभीकरण केलंत. आता राहिला प्रश्न कालच्या भूमीपूजनाचा.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हा प्रकल्प मी मंजूर करून घेतला. या प्रकल्पात होणारी विविंग गॅलरी, प्रोमोनाड, सोलर पॅनल या गोष्टींची संकल्पना माझी होती. मला कंत्राटदाराच्या फायद्यासाठी केवळ चौपाटीवर एक रस्ता बनवायचा नव्हता तर दादरकर जनतेसाठी आणि पर्यायाने मुंबईकरांसाठी एक नवं लँडमार्क टुरिस्ट डेस्टिनेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपल्यासारख्या जनतेने नाकारलेल्या लोकप्रतिनिधीने कितीही आकांडतांडव केले, तरी ते व्यर्थ आहे. दादर शिवाजीपार्कच्या सुशोभिकरणाच्या कामात खोडा घालून ते सुशोभिकरण जसं मनसेमुळे रखडलं आहे, तसा प्रकार मी या दादर चौपाटी सौन्दर्यीकरणाच्या बाबतीत होऊ देणार नाही, असेही दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.”

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content