HomeArchiveचोरता हृदय हे...

चोरता हृदय हे…

Details
चोरता हृदय हे…

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
आपण अनेक प्रकारच्या चोर्‍यांविषयी ऐकले असेल. पण एखाद्याचे हृदय चोरीला गेल्याचे कधी ऐकले आहे का? या ‘चोरी’ची तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याचे कधी पाहिले आहे का? अशा तक्रारीने बिचारे पोलीसदेखील निरूत्तर झाल्याचे कधी दिसले आहे का? नागपूर पोलिसांनी अलिकडेच चोरीला गेलेला 82 लाख रूपयांचा ऐवज संबंधितांना परत केला. त्यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी सांगितलेला किस्सा मनोरंजक आहे.

काही दिवसांपूर्वी एक तरुण नागपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये गेला. तेथे त्याने आपले ह्दय चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. आपली चोरीची तक्रार नोंदवून घ्यावी असा हट्ठच त्याने धरला. पोलिसांनी कायद्याची कलमे तपासून पाहिल्यानंतर इंडियन पिनल कोडमध्ये अशा प्रकारची हृदय चोरीची तक्रार नोंदविण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या तक्रारदाराला आपली अडचण समजावून परत पाठविले. आयुक्त उपाध्याय यांनी हा किस्सा पत्रकारांना सांगितला तेव्हा त्यांची चांगलीच करमणूक झाली.

यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर प्रश्न असा पडतो की, हृदयाची चोरी कधी होत नाही का? ती झाली नसती तर लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट, शिरी-फरहाद इत्यादी जगभरातील अमर झालेल्या प्रेमकथा कशा जन्माला आल्या असत्या? प्रेमभंग झालेल्या प्रियकर-प्रेयसीने कशा आत्महत्त्या केल्या असत्या? आपल्या सुंदर प्रेयसीने काही दिवसांत आपल्याला सोडून दिल्यानंतर एक दु:खी कष्टी प्रियकर म्हणतो,
महवशों की मेहरबानी हो चुकी
चार दिन की चांदनी थी, हो चुकी
(चंद्रमुखीची मेहरबानी होऊन गेली
चार दिवसांची चांदणी होऊन गेली.)

प्रियकराशी विवाहबद्ध झाल्यानंतर पत्नी बनलेली प्रेयसी काही काळ नक्कीच खूष असते. पण लग्नाआधी पाहिलेली स्वप्ने भंग होताना दिसताच पती-पत्नीपैकी एक जण तलाक देण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतो. ही भूमिका पतीने घेतली असेल तर ती दु:खी पत्नी काय म्हणते पाहा:
तलाक दे रहे हो गुरूरो-कहर के साथ
मेरा शबाब भी लौटा दो मेरे महर के साथ।

(इतक्या घमेंडीत आणि क्रोधाने तू मला तलाक देत आहेस तर मग माझे सौंदर्यदेखील तुला लग्नात मिळालेल्या धनराशीसह (महर) परत कर.)
वरील दोन उर्दू शेर सादर करण्याचे कारण असे की, सच्चे प्रेम, हृदयाची चोरी आदी सारी बकवास आहे. प्रेमिकांचा विवाह झाल्यानंतर ते वास्तव जीवन जगू लागतात तेव्हा त्यांना या गोष्टींचा अनुभव येतो. एखादे प्रेम सफल होत नाही तोपर्यंत संबंधित तो किंवा ती हृदय चोरीला गेल्यासारखी बालिश तक्रार करतात. वास्तवात त्यांचे हृदय होते तिकडेच असते. फक्त प्रेमाच्या भावनेतून त्यांचा मेंदू बधिर झालेला असतो. नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेलेला तो तरूण अशा बधिर मेंदूवाल्यांपैकीच एक होता.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
आपण अनेक प्रकारच्या चोर्‍यांविषयी ऐकले असेल. पण एखाद्याचे हृदय चोरीला गेल्याचे कधी ऐकले आहे का? या ‘चोरी’ची तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याचे कधी पाहिले आहे का? अशा तक्रारीने बिचारे पोलीसदेखील निरूत्तर झाल्याचे कधी दिसले आहे का? नागपूर पोलिसांनी अलिकडेच चोरीला गेलेला 82 लाख रूपयांचा ऐवज संबंधितांना परत केला. त्यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी सांगितलेला किस्सा मनोरंजक आहे.

काही दिवसांपूर्वी एक तरुण नागपूरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये गेला. तेथे त्याने आपले ह्दय चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. आपली चोरीची तक्रार नोंदवून घ्यावी असा हट्ठच त्याने धरला. पोलिसांनी कायद्याची कलमे तपासून पाहिल्यानंतर इंडियन पिनल कोडमध्ये अशा प्रकारची हृदय चोरीची तक्रार नोंदविण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या तक्रारदाराला आपली अडचण समजावून परत पाठविले. आयुक्त उपाध्याय यांनी हा किस्सा पत्रकारांना सांगितला तेव्हा त्यांची चांगलीच करमणूक झाली.

यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर प्रश्न असा पडतो की, हृदयाची चोरी कधी होत नाही का? ती झाली नसती तर लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट, शिरी-फरहाद इत्यादी जगभरातील अमर झालेल्या प्रेमकथा कशा जन्माला आल्या असत्या? प्रेमभंग झालेल्या प्रियकर-प्रेयसीने कशा आत्महत्त्या केल्या असत्या? आपल्या सुंदर प्रेयसीने काही दिवसांत आपल्याला सोडून दिल्यानंतर एक दु:खी कष्टी प्रियकर म्हणतो,
महवशों की मेहरबानी हो चुकी
चार दिन की चांदनी थी, हो चुकी
(चंद्रमुखीची मेहरबानी होऊन गेली
चार दिवसांची चांदणी होऊन गेली.)

प्रियकराशी विवाहबद्ध झाल्यानंतर पत्नी बनलेली प्रेयसी काही काळ नक्कीच खूष असते. पण लग्नाआधी पाहिलेली स्वप्ने भंग होताना दिसताच पती-पत्नीपैकी एक जण तलाक देण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतो. ही भूमिका पतीने घेतली असेल तर ती दु:खी पत्नी काय म्हणते पाहा:
तलाक दे रहे हो गुरूरो-कहर के साथ
मेरा शबाब भी लौटा दो मेरे महर के साथ।

(इतक्या घमेंडीत आणि क्रोधाने तू मला तलाक देत आहेस तर मग माझे सौंदर्यदेखील तुला लग्नात मिळालेल्या धनराशीसह (महर) परत कर.)
वरील दोन उर्दू शेर सादर करण्याचे कारण असे की, सच्चे प्रेम, हृदयाची चोरी आदी सारी बकवास आहे. प्रेमिकांचा विवाह झाल्यानंतर ते वास्तव जीवन जगू लागतात तेव्हा त्यांना या गोष्टींचा अनुभव येतो. एखादे प्रेम सफल होत नाही तोपर्यंत संबंधित तो किंवा ती हृदय चोरीला गेल्यासारखी बालिश तक्रार करतात. वास्तवात त्यांचे हृदय होते तिकडेच असते. फक्त प्रेमाच्या भावनेतून त्यांचा मेंदू बधिर झालेला असतो. नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेलेला तो तरूण अशा बधिर मेंदूवाल्यांपैकीच एक होता.”

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content