HomeArchiveगोरेगाव, पहाडी येथे...

गोरेगाव, पहाडी येथे म्हाडाची १ हजार ९४७ घरे – मधु चव्हाण

Details
“गोरेगाव, पहाडी येथे म्हाडाची १ हजार ९४७ घरे – मधु चव्हाण”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गोरेगाव, पहाडी येथे म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत पंतप्रधान आवास योजनेतून १ हजार ९४७ घरांची निर्मिती करण्यात येणार असून साधारण दोन वर्षात ही घरे पूर्ण होतील अशी माहिती, म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली.

म्हाडा प्राधिकरणाचा २०१९-२० वर्षाकरिता ८ हजार २५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. त्यावेळी सभापती मधु चव्हाण यांनी ही माहिती दिली. १ हजार ५६६.७५ कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात नवीन प्रकल्पासह गृहनिर्माण उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडा मुंबई मंडळांतर्गत १ हजार ९४७ घरांची निर्मिती होणार आहे. जमीन खरेदीसह गृहनिर्माण विकासासाठी १०० कोटी व वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे.

म्हाडाच्या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकरिता ५ कोटी २८ लाख रुपये आणि संक्रमण शिबिरासाठी ५ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. म्हाडाचा २०१९-२० वर्षांचा अर्थसंकल्प ८ हजार २५९.७५ कोटी रुपयांचा असून यातील शासकीय अनुदानाची रक्कम ४५७.४४ कोटी रुपये एवढी आहे. महसुली रक्कम १ हजार ५२९.८५ कोटी, भांडवली रक्कम ५ हजार १०.१६ कोटी, अनामत रक्कम ८४०.७१ कोटी रुपये इतकी आहे.

अर्थसंकल्पातील खर्चाचा विचार करता महसुली खर्च १ हजार ४८.४८ कोटी रुपये, भांडवली खर्च ४ हजार ६६३ कोटी, कर्ज व अग्रीम १५४.८७ कोटी तसेच अनामत रकमेचा खर्च ७२७.६१ कोटी रुपये आहे. यात एकूण खर्चाचा विचार करता तो ६ हजार ५९४.९२ कोटी रुपये असून, यात ९८ कोटींची भर पडली आहे. म्हाडा आणि शासन असा विचार करता ही खर्चाची रक्कम ६ हजार ६९२.९२ कोटी रुपये इतकी आहे. तर शिल्लक रक्कम १ हजार ५६६.८३ कोटी रुपये इतकी आहे, असेही चव्हाण म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गोरेगाव, पहाडी येथे म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत पंतप्रधान आवास योजनेतून १ हजार ९४७ घरांची निर्मिती करण्यात येणार असून साधारण दोन वर्षात ही घरे पूर्ण होतील अशी माहिती, म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली.

म्हाडा प्राधिकरणाचा २०१९-२० वर्षाकरिता ८ हजार २५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. त्यावेळी सभापती मधु चव्हाण यांनी ही माहिती दिली. १ हजार ५६६.७५ कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात नवीन प्रकल्पासह गृहनिर्माण उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडा मुंबई मंडळांतर्गत १ हजार ९४७ घरांची निर्मिती होणार आहे. जमीन खरेदीसह गृहनिर्माण विकासासाठी १०० कोटी व वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे.

म्हाडाच्या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीकरिता ५ कोटी २८ लाख रुपये आणि संक्रमण शिबिरासाठी ५ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. म्हाडाचा २०१९-२० वर्षांचा अर्थसंकल्प ८ हजार २५९.७५ कोटी रुपयांचा असून यातील शासकीय अनुदानाची रक्कम ४५७.४४ कोटी रुपये एवढी आहे. महसुली रक्कम १ हजार ५२९.८५ कोटी, भांडवली रक्कम ५ हजार १०.१६ कोटी, अनामत रक्कम ८४०.७१ कोटी रुपये इतकी आहे.

अर्थसंकल्पातील खर्चाचा विचार करता महसुली खर्च १ हजार ४८.४८ कोटी रुपये, भांडवली खर्च ४ हजार ६६३ कोटी, कर्ज व अग्रीम १५४.८७ कोटी तसेच अनामत रकमेचा खर्च ७२७.६१ कोटी रुपये आहे. यात एकूण खर्चाचा विचार करता तो ६ हजार ५९४.९२ कोटी रुपये असून, यात ९८ कोटींची भर पडली आहे. म्हाडा आणि शासन असा विचार करता ही खर्चाची रक्कम ६ हजार ६९२.९२ कोटी रुपये इतकी आहे. तर शिल्लक रक्कम १ हजार ५६६.८३ कोटी रुपये इतकी आहे, असेही चव्हाण म्हणाले.”

Continue reading

टिटवीच्या अंड्यांमध्ये दडलेय पावसाचे रहस्य!

देशातील काही भागात शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, टिटवीची अंडी मान्सूनच्या आगमनाचे आणि तीव्रतेचे अचूक संकेत देतात. टिटवीने दिलेल्या अंड्यांची संख्या, अंडी घालण्याची जागा यानुसार पारंपरिकरित्या, पिढ्या न् पिढ्या देशाच्या काही भागात मान्सूनच्या पावसाचे ठोकताळे आणि अंदाज बांधले जातात. अंड्यांची...

आता देशातच बनणार एमआरआय मशिन, चाचण्यांचे दर होणार ७०%पर्यंत कमी!

भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बेंगळुरूस्थित 'व्होक्सेल ग्रिड्स' या कंपनीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय...

आठवलेंची ‘आरपीआय’ उत्तर प्रदेशात लढवणार विधानसभा निवडणूक!

उत्तर प्रदेशातील आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ने राज्यात आपली ताकद आजमावण्याची तयारी पूर्ण केली आहे. भाजपासोबतच्या महायुतीत (एनडीए) राहून आरपीआयने उत्तर प्रदेशात २५...
Skip to content