HomeArchiveगोंदियाला लवकरच मिळणार...

गोंदियाला लवकरच मिळणार विमानसेवा! पालकमंत्री राजकुमार बडोलेंच्या प्रयत्नांना यश

Details
गोंदियाला लवकरच मिळणार विमानसेवा! पालकमंत्री राजकुमार बडोलेंच्या प्रयत्नांना यश

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
अतिदूर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला नागरी विमान सेवेने जोडण्याची प्रक्रिया लवकरच आकाराला येईल, असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
बुधवारी बडोले यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडण्याची त्यांनी मागणी केली. गोंदिया जिल्हा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असल्यामुळे तसा दुर्लक्षित राहिलेला आहे.

मात्र या जिल्ह्याला लाभलेली वनसंपदा, वन्यजीवसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे ते पर्यटनाचे केंद्र बनल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. याशिवाय देशातील दुर्मिळ असलेल्या सारस पक्षाचे गोंदिया जिल्हा आश्रयस्थान असल्यामुळे या पक्षाच्या दर्शनासाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी सुरू असते. गोंदिया जिल्ह्यात उद्योगधंदे कमी आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडल्यास पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील हे सुरेश प्रभू यांच्या निर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लवकरच गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जाडण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे बडोले यांनी सांगितले.

गोंदिया जिल्हा वनसंपत्तीने नटलेला जिल्हा आहे. येथील ऐतिहासिक मामा तलाव, प्रसिध्द अभियारण्ये, पाणसाठे, तलाव यामुळे आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील हवामानामुळे धानातील रूचकर असलेला तांदूळ पिकतो. देशातील दुसरा आणि राज्यातील पहिला राईस पार्कसुध्दा येथे प्रस्तावित आहे. येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहे. भरतीपूर्व सैनिक प्रशिक्षण, दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडल्यास गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असेल असेही बडोले यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
अतिदूर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला नागरी विमान सेवेने जोडण्याची प्रक्रिया लवकरच आकाराला येईल, असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
बुधवारी बडोले यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडण्याची त्यांनी मागणी केली. गोंदिया जिल्हा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असल्यामुळे तसा दुर्लक्षित राहिलेला आहे.

मात्र या जिल्ह्याला लाभलेली वनसंपदा, वन्यजीवसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे ते पर्यटनाचे केंद्र बनल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. याशिवाय देशातील दुर्मिळ असलेल्या सारस पक्षाचे गोंदिया जिल्हा आश्रयस्थान असल्यामुळे या पक्षाच्या दर्शनासाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी सुरू असते. गोंदिया जिल्ह्यात उद्योगधंदे कमी आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडल्यास पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील हे सुरेश प्रभू यांच्या निर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लवकरच गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जाडण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे बडोले यांनी सांगितले.

गोंदिया जिल्हा वनसंपत्तीने नटलेला जिल्हा आहे. येथील ऐतिहासिक मामा तलाव, प्रसिध्द अभियारण्ये, पाणसाठे, तलाव यामुळे आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील हवामानामुळे धानातील रूचकर असलेला तांदूळ पिकतो. देशातील दुसरा आणि राज्यातील पहिला राईस पार्कसुध्दा येथे प्रस्तावित आहे. येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहे. भरतीपूर्व सैनिक प्रशिक्षण, दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडल्यास गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असेल असेही बडोले यांनी सांगितले.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content