HomeArchiveगिरीजा कीरांच्या 'कुणा...

गिरीजा कीरांच्या ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’चे प्रकाशन!

Details
गिरीजा कीरांच्या ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’चे प्रकाशन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुप्रसिद्ध साहित्यिका गिरीजा कीर यांच्या भरारी प्रकाशन प्रकाशित ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ या कादंबरीचे तसेच लता गुठे यांच्या संत चेतन्य सोहळा, या पुस्तकांचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमी येथे नुकतेच झाले. यावेळी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विनोद इंगळहळीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कादंबरीच्या कथानकाचे आणि मांडणीचे विश्लेषण केले.

गिरीजा कीर म्हणजे कथाकथन हे समीकरण ठरलेलं. जुन्या पिढीबरोबर साहित्याला पूरक ठरणारं कथाकथन आज हळूहळू लोप पावत चाललेलं दिसतंय म्हणून भरारी प्रकाशनाच्या प्रकाशिका लता गुठे आणि संत साहित्याच्या अभ्यासक रेखा नार्वेकर यांनी गिरिजा कीर कथाकथन स्पर्धा हा उपक्रम सुरू केला आहे. यानंतर कथाकथन पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला.

गिरीजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना स्पर्धक भारावून गेले. एकनाथ आव्हाड यांनी परीक्षक म्हणून समालोचन केले. याप्रसंगी रेखा नार्वेकर यांच्या ‘जागर’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. गुरूनाथ तेंडुलकर यांनी मोजक्या शब्दात पुस्तकाचं रसग्रहण केलं. लता गुठे यांच्या ‘संत साहित्याचा मेळा’ यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन झालं. रेखा नार्वेकर यांनी या पुस्तकाचे रसग्रहण केले. या कार्यक्रमाचा उल्लेखनीय विशेष म्हणजे पत्रकार व लेखक वसंत बंदावणे यांनी प्रस्तुत कादंबरी ‘कुणा नामदेवाची चित्रकथा’ याविषयी सांगताना कादंबरीचा नायक आपणच आहोत ही मर्मबंधातली ठेव उघड केली. सभागृहात क्षणभर सन्नाटा पसरला. त्यांच्या जीवनातील चढ-उतार आणि भोगवटा ऐकताना रसिक मनं हेलावली. लता गुठे यांची साहित्यिक वाटचाल जशी रोचक तशीच प्रसन्नवदना मृण्मयी भजक यांचं सूत्रसंचालन प्रसंगोचित होतं.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध आणि हौतात्म्यप्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजलीने सुरू झालेला कार्यक्रम सोहळा हळूहळू साहित्यिकांकडे वळला. पुरस्कार वितरणानं तो प्रसन्न ठरला. विविध वक्त्यांच्या मनोगतांमुळे रसिकांना बांधून ठेवणारा ठरला. डॉक्टर विनोद इंगळहळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमानं उंची गाठली. तुका झालासे कळस म्हणत जाणकार रसिक तृप्त होऊन बाहेर पडले. भरारी प्रकाशननं आणखी उंच भरारी घेतली. अनेक क्षेत्रातील मान्यवर कवी लेखक या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुप्रसिद्ध साहित्यिका गिरीजा कीर यांच्या भरारी प्रकाशन प्रकाशित ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ या कादंबरीचे तसेच लता गुठे यांच्या संत चेतन्य सोहळा, या पुस्तकांचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमी येथे नुकतेच झाले. यावेळी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विनोद इंगळहळीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कादंबरीच्या कथानकाचे आणि मांडणीचे विश्लेषण केले.

गिरीजा कीर म्हणजे कथाकथन हे समीकरण ठरलेलं. जुन्या पिढीबरोबर साहित्याला पूरक ठरणारं कथाकथन आज हळूहळू लोप पावत चाललेलं दिसतंय म्हणून भरारी प्रकाशनाच्या प्रकाशिका लता गुठे आणि संत साहित्याच्या अभ्यासक रेखा नार्वेकर यांनी गिरिजा कीर कथाकथन स्पर्धा हा उपक्रम सुरू केला आहे. यानंतर कथाकथन पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला.

गिरीजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना स्पर्धक भारावून गेले. एकनाथ आव्हाड यांनी परीक्षक म्हणून समालोचन केले. याप्रसंगी रेखा नार्वेकर यांच्या ‘जागर’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. गुरूनाथ तेंडुलकर यांनी मोजक्या शब्दात पुस्तकाचं रसग्रहण केलं. लता गुठे यांच्या ‘संत साहित्याचा मेळा’ यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन झालं. रेखा नार्वेकर यांनी या पुस्तकाचे रसग्रहण केले. या कार्यक्रमाचा उल्लेखनीय विशेष म्हणजे पत्रकार व लेखक वसंत बंदावणे यांनी प्रस्तुत कादंबरी ‘कुणा नामदेवाची चित्रकथा’ याविषयी सांगताना कादंबरीचा नायक आपणच आहोत ही मर्मबंधातली ठेव उघड केली. सभागृहात क्षणभर सन्नाटा पसरला. त्यांच्या जीवनातील चढ-उतार आणि भोगवटा ऐकताना रसिक मनं हेलावली. लता गुठे यांची साहित्यिक वाटचाल जशी रोचक तशीच प्रसन्नवदना मृण्मयी भजक यांचं सूत्रसंचालन प्रसंगोचित होतं.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध आणि हौतात्म्यप्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजलीने सुरू झालेला कार्यक्रम सोहळा हळूहळू साहित्यिकांकडे वळला. पुरस्कार वितरणानं तो प्रसन्न ठरला. विविध वक्त्यांच्या मनोगतांमुळे रसिकांना बांधून ठेवणारा ठरला. डॉक्टर विनोद इंगळहळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमानं उंची गाठली. तुका झालासे कळस म्हणत जाणकार रसिक तृप्त होऊन बाहेर पडले. भरारी प्रकाशननं आणखी उंच भरारी घेतली. अनेक क्षेत्रातील मान्यवर कवी लेखक या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते.”

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content