HomeArchiveगिरीजा कीरांच्या 'कुणा...

गिरीजा कीरांच्या ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’चे प्रकाशन!

Details
गिरीजा कीरांच्या ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’चे प्रकाशन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुप्रसिद्ध साहित्यिका गिरीजा कीर यांच्या भरारी प्रकाशन प्रकाशित ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ या कादंबरीचे तसेच लता गुठे यांच्या संत चेतन्य सोहळा, या पुस्तकांचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमी येथे नुकतेच झाले. यावेळी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विनोद इंगळहळीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कादंबरीच्या कथानकाचे आणि मांडणीचे विश्लेषण केले.

गिरीजा कीर म्हणजे कथाकथन हे समीकरण ठरलेलं. जुन्या पिढीबरोबर साहित्याला पूरक ठरणारं कथाकथन आज हळूहळू लोप पावत चाललेलं दिसतंय म्हणून भरारी प्रकाशनाच्या प्रकाशिका लता गुठे आणि संत साहित्याच्या अभ्यासक रेखा नार्वेकर यांनी गिरिजा कीर कथाकथन स्पर्धा हा उपक्रम सुरू केला आहे. यानंतर कथाकथन पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला.

गिरीजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना स्पर्धक भारावून गेले. एकनाथ आव्हाड यांनी परीक्षक म्हणून समालोचन केले. याप्रसंगी रेखा नार्वेकर यांच्या ‘जागर’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. गुरूनाथ तेंडुलकर यांनी मोजक्या शब्दात पुस्तकाचं रसग्रहण केलं. लता गुठे यांच्या ‘संत साहित्याचा मेळा’ यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन झालं. रेखा नार्वेकर यांनी या पुस्तकाचे रसग्रहण केले. या कार्यक्रमाचा उल्लेखनीय विशेष म्हणजे पत्रकार व लेखक वसंत बंदावणे यांनी प्रस्तुत कादंबरी ‘कुणा नामदेवाची चित्रकथा’ याविषयी सांगताना कादंबरीचा नायक आपणच आहोत ही मर्मबंधातली ठेव उघड केली. सभागृहात क्षणभर सन्नाटा पसरला. त्यांच्या जीवनातील चढ-उतार आणि भोगवटा ऐकताना रसिक मनं हेलावली. लता गुठे यांची साहित्यिक वाटचाल जशी रोचक तशीच प्रसन्नवदना मृण्मयी भजक यांचं सूत्रसंचालन प्रसंगोचित होतं.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध आणि हौतात्म्यप्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजलीने सुरू झालेला कार्यक्रम सोहळा हळूहळू साहित्यिकांकडे वळला. पुरस्कार वितरणानं तो प्रसन्न ठरला. विविध वक्त्यांच्या मनोगतांमुळे रसिकांना बांधून ठेवणारा ठरला. डॉक्टर विनोद इंगळहळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमानं उंची गाठली. तुका झालासे कळस म्हणत जाणकार रसिक तृप्त होऊन बाहेर पडले. भरारी प्रकाशननं आणखी उंच भरारी घेतली. अनेक क्षेत्रातील मान्यवर कवी लेखक या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुप्रसिद्ध साहित्यिका गिरीजा कीर यांच्या भरारी प्रकाशन प्रकाशित ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ या कादंबरीचे तसेच लता गुठे यांच्या संत चेतन्य सोहळा, या पुस्तकांचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमी येथे नुकतेच झाले. यावेळी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विनोद इंगळहळीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कादंबरीच्या कथानकाचे आणि मांडणीचे विश्लेषण केले.

गिरीजा कीर म्हणजे कथाकथन हे समीकरण ठरलेलं. जुन्या पिढीबरोबर साहित्याला पूरक ठरणारं कथाकथन आज हळूहळू लोप पावत चाललेलं दिसतंय म्हणून भरारी प्रकाशनाच्या प्रकाशिका लता गुठे आणि संत साहित्याच्या अभ्यासक रेखा नार्वेकर यांनी गिरिजा कीर कथाकथन स्पर्धा हा उपक्रम सुरू केला आहे. यानंतर कथाकथन पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला.

गिरीजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना स्पर्धक भारावून गेले. एकनाथ आव्हाड यांनी परीक्षक म्हणून समालोचन केले. याप्रसंगी रेखा नार्वेकर यांच्या ‘जागर’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. गुरूनाथ तेंडुलकर यांनी मोजक्या शब्दात पुस्तकाचं रसग्रहण केलं. लता गुठे यांच्या ‘संत साहित्याचा मेळा’ यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन झालं. रेखा नार्वेकर यांनी या पुस्तकाचे रसग्रहण केले. या कार्यक्रमाचा उल्लेखनीय विशेष म्हणजे पत्रकार व लेखक वसंत बंदावणे यांनी प्रस्तुत कादंबरी ‘कुणा नामदेवाची चित्रकथा’ याविषयी सांगताना कादंबरीचा नायक आपणच आहोत ही मर्मबंधातली ठेव उघड केली. सभागृहात क्षणभर सन्नाटा पसरला. त्यांच्या जीवनातील चढ-उतार आणि भोगवटा ऐकताना रसिक मनं हेलावली. लता गुठे यांची साहित्यिक वाटचाल जशी रोचक तशीच प्रसन्नवदना मृण्मयी भजक यांचं सूत्रसंचालन प्रसंगोचित होतं.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध आणि हौतात्म्यप्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजलीने सुरू झालेला कार्यक्रम सोहळा हळूहळू साहित्यिकांकडे वळला. पुरस्कार वितरणानं तो प्रसन्न ठरला. विविध वक्त्यांच्या मनोगतांमुळे रसिकांना बांधून ठेवणारा ठरला. डॉक्टर विनोद इंगळहळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमानं उंची गाठली. तुका झालासे कळस म्हणत जाणकार रसिक तृप्त होऊन बाहेर पडले. भरारी प्रकाशननं आणखी उंच भरारी घेतली. अनेक क्षेत्रातील मान्यवर कवी लेखक या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content