HomeArchiveगिरीजा कीरांच्या 'कुणा...

गिरीजा कीरांच्या ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’चे प्रकाशन!

Details
गिरीजा कीरांच्या ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’चे प्रकाशन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुप्रसिद्ध साहित्यिका गिरीजा कीर यांच्या भरारी प्रकाशन प्रकाशित ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ या कादंबरीचे तसेच लता गुठे यांच्या संत चेतन्य सोहळा, या पुस्तकांचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमी येथे नुकतेच झाले. यावेळी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विनोद इंगळहळीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कादंबरीच्या कथानकाचे आणि मांडणीचे विश्लेषण केले.

गिरीजा कीर म्हणजे कथाकथन हे समीकरण ठरलेलं. जुन्या पिढीबरोबर साहित्याला पूरक ठरणारं कथाकथन आज हळूहळू लोप पावत चाललेलं दिसतंय म्हणून भरारी प्रकाशनाच्या प्रकाशिका लता गुठे आणि संत साहित्याच्या अभ्यासक रेखा नार्वेकर यांनी गिरिजा कीर कथाकथन स्पर्धा हा उपक्रम सुरू केला आहे. यानंतर कथाकथन पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला.

गिरीजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना स्पर्धक भारावून गेले. एकनाथ आव्हाड यांनी परीक्षक म्हणून समालोचन केले. याप्रसंगी रेखा नार्वेकर यांच्या ‘जागर’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. गुरूनाथ तेंडुलकर यांनी मोजक्या शब्दात पुस्तकाचं रसग्रहण केलं. लता गुठे यांच्या ‘संत साहित्याचा मेळा’ यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन झालं. रेखा नार्वेकर यांनी या पुस्तकाचे रसग्रहण केले. या कार्यक्रमाचा उल्लेखनीय विशेष म्हणजे पत्रकार व लेखक वसंत बंदावणे यांनी प्रस्तुत कादंबरी ‘कुणा नामदेवाची चित्रकथा’ याविषयी सांगताना कादंबरीचा नायक आपणच आहोत ही मर्मबंधातली ठेव उघड केली. सभागृहात क्षणभर सन्नाटा पसरला. त्यांच्या जीवनातील चढ-उतार आणि भोगवटा ऐकताना रसिक मनं हेलावली. लता गुठे यांची साहित्यिक वाटचाल जशी रोचक तशीच प्रसन्नवदना मृण्मयी भजक यांचं सूत्रसंचालन प्रसंगोचित होतं.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध आणि हौतात्म्यप्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजलीने सुरू झालेला कार्यक्रम सोहळा हळूहळू साहित्यिकांकडे वळला. पुरस्कार वितरणानं तो प्रसन्न ठरला. विविध वक्त्यांच्या मनोगतांमुळे रसिकांना बांधून ठेवणारा ठरला. डॉक्टर विनोद इंगळहळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमानं उंची गाठली. तुका झालासे कळस म्हणत जाणकार रसिक तृप्त होऊन बाहेर पडले. भरारी प्रकाशननं आणखी उंच भरारी घेतली. अनेक क्षेत्रातील मान्यवर कवी लेखक या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुप्रसिद्ध साहित्यिका गिरीजा कीर यांच्या भरारी प्रकाशन प्रकाशित ‘कुणा नामदेवाची चित्तरकथा’ या कादंबरीचे तसेच लता गुठे यांच्या संत चेतन्य सोहळा, या पुस्तकांचे शानदार प्रकाशन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमी येथे नुकतेच झाले. यावेळी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. विनोद इंगळहळीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कादंबरीच्या कथानकाचे आणि मांडणीचे विश्लेषण केले.

गिरीजा कीर म्हणजे कथाकथन हे समीकरण ठरलेलं. जुन्या पिढीबरोबर साहित्याला पूरक ठरणारं कथाकथन आज हळूहळू लोप पावत चाललेलं दिसतंय म्हणून भरारी प्रकाशनाच्या प्रकाशिका लता गुठे आणि संत साहित्याच्या अभ्यासक रेखा नार्वेकर यांनी गिरिजा कीर कथाकथन स्पर्धा हा उपक्रम सुरू केला आहे. यानंतर कथाकथन पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला.

गिरीजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना स्पर्धक भारावून गेले. एकनाथ आव्हाड यांनी परीक्षक म्हणून समालोचन केले. याप्रसंगी रेखा नार्वेकर यांच्या ‘जागर’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. गुरूनाथ तेंडुलकर यांनी मोजक्या शब्दात पुस्तकाचं रसग्रहण केलं. लता गुठे यांच्या ‘संत साहित्याचा मेळा’ यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन झालं. रेखा नार्वेकर यांनी या पुस्तकाचे रसग्रहण केले. या कार्यक्रमाचा उल्लेखनीय विशेष म्हणजे पत्रकार व लेखक वसंत बंदावणे यांनी प्रस्तुत कादंबरी ‘कुणा नामदेवाची चित्रकथा’ याविषयी सांगताना कादंबरीचा नायक आपणच आहोत ही मर्मबंधातली ठेव उघड केली. सभागृहात क्षणभर सन्नाटा पसरला. त्यांच्या जीवनातील चढ-उतार आणि भोगवटा ऐकताना रसिक मनं हेलावली. लता गुठे यांची साहित्यिक वाटचाल जशी रोचक तशीच प्रसन्नवदना मृण्मयी भजक यांचं सूत्रसंचालन प्रसंगोचित होतं.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध आणि हौतात्म्यप्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजलीने सुरू झालेला कार्यक्रम सोहळा हळूहळू साहित्यिकांकडे वळला. पुरस्कार वितरणानं तो प्रसन्न ठरला. विविध वक्त्यांच्या मनोगतांमुळे रसिकांना बांधून ठेवणारा ठरला. डॉक्टर विनोद इंगळहळीकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमानं उंची गाठली. तुका झालासे कळस म्हणत जाणकार रसिक तृप्त होऊन बाहेर पडले. भरारी प्रकाशननं आणखी उंच भरारी घेतली. अनेक क्षेत्रातील मान्यवर कवी लेखक या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते.”

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content