HomeArchiveगिरणी कामगारांच्या घरांच्या...

गिरणी कामगारांच्या घरांच्या बेकायदा विक्रीवर होणार कारवाई!

Details
गिरणी कामगारांच्या घरांच्या बेकायदा विक्रीवर होणार कारवाई!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

सभापती मधु चव्हाण घेणार आढावा
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गिरणी कामगारांना म्हाडाने दिलेली घरे मुदतीआधी विकली जात आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण गिरणी कामगारांच्या घरांचे वाटप व योजनांचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

मुंबईतील गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून गेली अनेक वर्षे कामगार संघटनांकडून वर्षानुवर्षे आंदोलने आजही सुरू आहेत. त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याने दीड लाखांहून अधिक कामगारांना घरे देण्यास म्हाडा बांधील आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गिरणी कामगारांचे मोठे योगदान होते. मात्र हेच गिरणी कामगार व त्यांचे वारसदार ही घरे पाच वर्षांच्या मुदतीत न विकण्याची अट मोडून ही घरे विकली जात असल्याचे ही बाब लक्षात आल्याने सभापती मधु चव्हाण यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कामगारांनी जागा विकू नये म्हणून ते प्रत्यक्ष पुढाकार घेणार आहेत.

 
गिरणी कामगारांना सात ते नऊ लाख रूपयांत म्हाडाने घरे दिलीत. ही घरे दहा वर्षांत विकू नये अशी त्यांना अट घालण्यात आली होती. परंतु ही अट नंतर शिथिल करून पाच वर्षांपर्यंत आणण्यात आली. त्यानंतर त्यांना बँक कर्जाचे हप्ते देण्यासाठी भाडेकरू ठेवण्यास सवलत देण्यात आली. परंतु काही गिरणी कामगारांननी हीच घरे मुदतीपूर्वी आणि बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री केल्याचे निदर्शनास आले व तशा तक्रारीही आहेत. याची दाखल घेऊन चव्हाण यांनी घरांची पाहणी करण्याचे ठरविले आहे.
गिरणी कामगारांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन या व्यवहारात दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याकडून कामगारांकडून कमी भावात घरे घेऊन जास्त दरात घरे विकण्यात येत आहेत. या दलाल मंडळीकडून गावी असलेल्या कामगारांना मुंबईत आणले जाते आणि कमी रकमेत ही घरे घेतली जाते. यासाठी हे दलाल या गरीब कामगारांना आगाऊ रक्कम देतात. हा गैरव्यवहार थांबविण्यासाठी गिरणी कामगारांनी आपली हक्काची घरे न विकता मुंबईतच राहवे याकरिता मधु चव्हाण प्रयत्न करणार आहेत.
 
सभापती मधु चव्हाण घेणार आढावा
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गिरणी कामगारांना म्हाडाने दिलेली घरे मुदतीआधी विकली जात आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण गिरणी कामगारांच्या घरांचे वाटप व योजनांचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

मुंबईतील गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून गेली अनेक वर्षे कामगार संघटनांकडून वर्षानुवर्षे आंदोलने आजही सुरू आहेत. त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याने दीड लाखांहून अधिक कामगारांना घरे देण्यास म्हाडा बांधील आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गिरणी कामगारांचे मोठे योगदान होते. मात्र हेच गिरणी कामगार व त्यांचे वारसदार ही घरे पाच वर्षांच्या मुदतीत न विकण्याची अट मोडून ही घरे विकली जात असल्याचे ही बाब लक्षात आल्याने सभापती मधु चव्हाण यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कामगारांनी जागा विकू नये म्हणून ते प्रत्यक्ष पुढाकार घेणार आहेत.

 
गिरणी कामगारांना सात ते नऊ लाख रूपयांत म्हाडाने घरे दिलीत. ही घरे दहा वर्षांत विकू नये अशी त्यांना अट घालण्यात आली होती. परंतु ही अट नंतर शिथिल करून पाच वर्षांपर्यंत आणण्यात आली. त्यानंतर त्यांना बँक कर्जाचे हप्ते देण्यासाठी भाडेकरू ठेवण्यास सवलत देण्यात आली. परंतु काही गिरणी कामगारांननी हीच घरे मुदतीपूर्वी आणि बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री केल्याचे निदर्शनास आले व तशा तक्रारीही आहेत. याची दाखल घेऊन चव्हाण यांनी घरांची पाहणी करण्याचे ठरविले आहे.
गिरणी कामगारांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन या व्यवहारात दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याकडून कामगारांकडून कमी भावात घरे घेऊन जास्त दरात घरे विकण्यात येत आहेत. या दलाल मंडळीकडून गावी असलेल्या कामगारांना मुंबईत आणले जाते आणि कमी रकमेत ही घरे घेतली जाते. यासाठी हे दलाल या गरीब कामगारांना आगाऊ रक्कम देतात. हा गैरव्यवहार थांबविण्यासाठी गिरणी कामगारांनी आपली हक्काची घरे न विकता मुंबईतच राहवे याकरिता मधु चव्हाण प्रयत्न करणार आहेत.
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content