HomeArchiveगणेशोत्सव काळात शालेय...

गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नको – सुनील प्रभू

Details
गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नको – सुनील प्रभू

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषत: कोकणातील बहुतांश चाकरमानी या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. या कॉन्व्हेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.

या अनुषंगाने ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि युवा सेना मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी बुधवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली. तत्काळ आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देऊन संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी, कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषत: कोकणातील बहुतांश चाकरमानी या काळात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्व्हेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात. या कॉन्व्हेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.

या अनुषंगाने ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि युवा सेना मुंबई विद्यापीठ सेनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी बुधवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली. तत्काळ आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देऊन संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी, कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content