HomeArchiveगजानन कीर्तिकरांच्या रूपाने...

गजानन कीर्तिकरांच्या रूपाने पुन्हा युतीचा भगवा फडकणार!

Details
गजानन कीर्तिकरांच्या रूपाने पुन्हा युतीचा भगवा फडकणार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

मुंबई उत्‍तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्‍या कार्यकर्त्‍यांचा मेळावा संपन्‍न
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई उत्‍तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं(ए)-रासप महायुतीचे उमेदवार खा. गजानन कीर्तिकर यांना पुन्‍हा लोकसभेवर भरघोस मतांनी विजयी करण्‍याचा निर्धार अंधेरीच्‍या पंपहाऊस, शेर-ए-पंजाब कॉलनी येथे संपन्‍न झालेल्‍या महायुतीच्‍या गटप्रमुख-बुथप्रमुख व प्रमुख कार्यकर्ता-पदाधिकारी मेळाव्‍यात करण्‍यात आला.

शिवसेना-भाजपा यांची गेल्‍या २५ वर्षांची युती आहे. मधल्‍या काही काळात मतभेद झाले असले तरी मनभेद झाले नव्‍हते. आप-आपसातील कटुता विसरून शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना निवडून आणण्‍याचे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले. शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी गेल्‍या पाच वर्षांत खासदार म्‍हणून केलेल्‍या कामांची थोडक्‍यात माहिती दिली तर मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना-भाजपा युतीच्‍या कार्यकर्त्‍यांनी एकदिलाने काम करून कीर्तिकर यांना पुन्‍हा निवडून देण्‍याचे आवाहन उपस्थितांना केले.

या महायुतीच्‍या भव्‍य महामेळाव्‍यात राज्‍याचे राज्‍यमंत्री रविंद्र वायकर, राज्‍यमंत्री विद्या ठाकूर, शिवसेना आमदार व विभागप्रमुख अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार रमेश लटके, आमदार अमित साटम आणि आमदार भारती लव्‍हेकरसह रिपाइं(ए)-गटाचे नेते प्रकाश जाधव उपस्थित होते. शिवसेना-भाजपा पुरूष-महिला संघटक, नगरसेवक आदी मुख्‍य पदाधिकाऱ्यांसह गटप्रमुख-बुथप्रमुख यांची उपस्थिती लक्षणीय होती.

दरम्‍यान, शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार खा. गजानन कीर्तिकर यांच्‍या मुख्‍य निवडणूक कार्यालयाचे अंबिका टॉवर, पंपहाऊस, अंधेरी (पूर्व) येथे महायुतीचे नेते, आमदार, नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांच्‍या उपस्थितीत उद्घाटन झाले.”
 
“मुंबई उत्‍तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्‍या कार्यकर्त्‍यांचा मेळावा संपन्‍न
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई उत्‍तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं(ए)-रासप महायुतीचे उमेदवार खा. गजानन कीर्तिकर यांना पुन्‍हा लोकसभेवर भरघोस मतांनी विजयी करण्‍याचा निर्धार अंधेरीच्‍या पंपहाऊस, शेर-ए-पंजाब कॉलनी येथे संपन्‍न झालेल्‍या महायुतीच्‍या गटप्रमुख-बुथप्रमुख व प्रमुख कार्यकर्ता-पदाधिकारी मेळाव्‍यात करण्‍यात आला.

शिवसेना-भाजपा यांची गेल्‍या २५ वर्षांची युती आहे. मधल्‍या काही काळात मतभेद झाले असले तरी मनभेद झाले नव्‍हते. आप-आपसातील कटुता विसरून शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना निवडून आणण्‍याचे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले. शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी गेल्‍या पाच वर्षांत खासदार म्‍हणून केलेल्‍या कामांची थोडक्‍यात माहिती दिली तर मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना-भाजपा युतीच्‍या कार्यकर्त्‍यांनी एकदिलाने काम करून कीर्तिकर यांना पुन्‍हा निवडून देण्‍याचे आवाहन उपस्थितांना केले.

या महायुतीच्‍या भव्‍य महामेळाव्‍यात राज्‍याचे राज्‍यमंत्री रविंद्र वायकर, राज्‍यमंत्री विद्या ठाकूर, शिवसेना आमदार व विभागप्रमुख अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार रमेश लटके, आमदार अमित साटम आणि आमदार भारती लव्‍हेकरसह रिपाइं(ए)-गटाचे नेते प्रकाश जाधव उपस्थित होते. शिवसेना-भाजपा पुरूष-महिला संघटक, नगरसेवक आदी मुख्‍य पदाधिकाऱ्यांसह गटप्रमुख-बुथप्रमुख यांची उपस्थिती लक्षणीय होती.

दरम्‍यान, शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार खा. गजानन कीर्तिकर यांच्‍या मुख्‍य निवडणूक कार्यालयाचे अंबिका टॉवर, पंपहाऊस, अंधेरी (पूर्व) येथे महायुतीचे नेते, आमदार, नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांच्‍या उपस्थितीत उद्घाटन झाले.”

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content