HomeArchiveखासदार राहुल शेवाळे...

खासदार राहुल शेवाळे महापुरूषांच्या चरणी नतमस्तक!

Details
खासदार राहुल शेवाळे महापुरूषांच्या चरणी नतमस्तक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे विजयी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी विजयानंतर महापुरूषांना वंदन करून आपला विजय साजरा केला. नवनिर्वाचित खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर खासदार शेवाळे यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शेवाळे नतमस्तक झाले.

 

दादर येथील स्वामी समर्थ मठ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊनही शेवाळे यांनी दर्शन घेतले. दक्षिण-मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा विजय मी वंदनीय बाळासाहेबांना समर्पित करतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. गेल्या 5 वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. या विजयामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या 5 वर्षांत पूर्ण करणार. दक्षिण-मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी व्यक्त केली.

 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे विजयी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरूवारी विजयानंतर महापुरूषांना वंदन करून आपला विजय साजरा केला. नवनिर्वाचित खासदार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यानंतर खासदार शेवाळे यांनी दादर चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन शेवाळे नतमस्तक झाले.

 

दादर येथील स्वामी समर्थ मठ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊनही शेवाळे यांनी दर्शन घेतले. दक्षिण-मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा विजय मी वंदनीय बाळासाहेबांना समर्पित करतो आहे. हा विजय केवळ माझ्या एकट्याचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे. गेल्या 5 वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. या विजयामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या 5 वर्षांत पूर्ण करणार. दक्षिण-मध्य मुंबईला स्मार्ट मतदारसंघ बनविण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी व्यक्त केली.

 
 ”
 
 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content