HomeArchive'क्रांती चिरायु होवो'चे...

‘क्रांती चिरायु होवो’चे 15 ऑगस्टला प्रकाशन!

Details
‘क्रांती चिरायु होवो’चे 15 ऑगस्टला प्रकाशन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भरारी प्रकाशनच्या लता गुठेनिर्मित व ज्येष्ठ लेखिका स्मिता भागवत यांनी लिहिलेलं ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे प्रकाशन 15 ऑगस्टला होणार आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, उद्द्येश हाच आहे की आजच्या आणि उद्याच्या पिढीला देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांचं कार्य पोहोचावं आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांची आठवण कायम मनात जपून ठेवावी. पुस्तक प्रकाशित करून तुमच्या हातात ते देण्याचं माझं काम मी करत आहे. पण, तुमचं काम आहे, ते शाळा-कॉलेजपर्यंत, वाचनालयपर्यंत हेही पुस्तक पोहोचावे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने भेट म्हणून ही पुस्तकं देण्यात यावीत. काही प्रमाणात का होईना आपलं कर्तव्य आपण पार पाडुया.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करून आपण घरी येतो. या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरतो. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला मिळाल्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या क्रांतिकारकाचा किती त्याग त्यामागे आहे हे आठवले तरी अंगावर शहारे येतात. अशा या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यासाठी मी घेतलेले हे व्रत. प्रत्येक 15 ऑगस्टला क्रांतिवीरावर एक पुस्तक प्रकाशित करायचे हा नियम आहे. पहिल्या वर्षी ‘सावरकरांची पत्रकारिता’ हा विषय निवडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘मॅडम कामा’ यांच्यावर पुस्तक काढलं आणि यावर्षी हे अप्रतिम पुस्तक, मला प्रकाशित करायला मिळत आहे याचा मनोमन आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भरारी प्रकाशनच्या लता गुठेनिर्मित व ज्येष्ठ लेखिका स्मिता भागवत यांनी लिहिलेलं ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे प्रकाशन 15 ऑगस्टला होणार आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, उद्द्येश हाच आहे की आजच्या आणि उद्याच्या पिढीला देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांचं कार्य पोहोचावं आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांची आठवण कायम मनात जपून ठेवावी. पुस्तक प्रकाशित करून तुमच्या हातात ते देण्याचं माझं काम मी करत आहे. पण, तुमचं काम आहे, ते शाळा-कॉलेजपर्यंत, वाचनालयपर्यंत हेही पुस्तक पोहोचावे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने भेट म्हणून ही पुस्तकं देण्यात यावीत. काही प्रमाणात का होईना आपलं कर्तव्य आपण पार पाडुया.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करून आपण घरी येतो. या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरतो. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला मिळाल्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या क्रांतिकारकाचा किती त्याग त्यामागे आहे हे आठवले तरी अंगावर शहारे येतात. अशा या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यासाठी मी घेतलेले हे व्रत. प्रत्येक 15 ऑगस्टला क्रांतिवीरावर एक पुस्तक प्रकाशित करायचे हा नियम आहे. पहिल्या वर्षी ‘सावरकरांची पत्रकारिता’ हा विषय निवडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘मॅडम कामा’ यांच्यावर पुस्तक काढलं आणि यावर्षी हे अप्रतिम पुस्तक, मला प्रकाशित करायला मिळत आहे याचा मनोमन आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.”

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content