HomeArchiveकोस्टल रोडबाधीत मच्छिमारांवर...

कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांवर झाली सकारात्मक चर्चा!

Details
कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांवर झाली सकारात्मक चर्चा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांच्या प्रश्नांवर नुकतीच विधान परिषदेत सकारात्मक चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी मुंबई ते कांदिवलीपर्यंतच्या एकूण 29 कि.मी.च्या कोस्टल रोड संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नामुळे अनेक कोळी मच्छिमार बांधवांचे उदरनिर्वाह प्रश्न मार्गी लागणार आहेत. उदा. कोस्टल रोडमुळे बाधित झालेले किनाऱ्यालगतच्या कोळी बांधवांचे पुनर्वसन तसेच आर्थिक नुकसानभरपाई आणि जैवविविधतेचे होणारे नुकसान याबाबत सकारत्मक चर्चा झाली अशी माहिती पाटील यांनी दिली.

यावेळी वरळी सिलिंकचा स्पॅन वाढवुन द्यावा अशी मागणी केली गेली. तसेच संपूर्ण कोस्टल भागातील सीमांकन हद्द निश्चित करुन मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

 

मुंबईतील 42 कोळीवाड्यापैकी 12 कोळीवड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली गेली. त्याबाबत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रश्नाबाबत येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कोस्टल रोडबाधीत मच्छिमारांच्या प्रश्नांवर नुकतीच विधान परिषदेत सकारात्मक चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी मुंबई ते कांदिवलीपर्यंतच्या एकूण 29 कि.मी.च्या कोस्टल रोड संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नामुळे अनेक कोळी मच्छिमार बांधवांचे उदरनिर्वाह प्रश्न मार्गी लागणार आहेत. उदा. कोस्टल रोडमुळे बाधित झालेले किनाऱ्यालगतच्या कोळी बांधवांचे पुनर्वसन तसेच आर्थिक नुकसानभरपाई आणि जैवविविधतेचे होणारे नुकसान याबाबत सकारत्मक चर्चा झाली अशी माहिती पाटील यांनी दिली.

यावेळी वरळी सिलिंकचा स्पॅन वाढवुन द्यावा अशी मागणी केली गेली. तसेच संपूर्ण कोस्टल भागातील सीमांकन हद्द निश्चित करुन मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

 

मुंबईतील 42 कोळीवाड्यापैकी 12 कोळीवड्यांचे सीमांकन पूर्ण झाले असून उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली गेली. त्याबाबत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रश्नाबाबत येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.”
 

Continue reading

५००-१०००च्या जुन्या नोटा अजूनही बदलून मिळणार?

सोशल मीडियाच्या जमान्यात माहिती जितक्या वेगाने पसरते, तितक्याच वेगाने अफवा आणि फसवणुकीचे जाळेही विणले जाते. सध्या इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या (बंदी घातलेल्या) नोटांबाबत मोठा दावा...

‘होर्मुझ’च्या कोंडीमुळे जागतिक विमानसेवा धोक्यात

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणने गेल्या दोन महिन्यांपासून 'होर्मुझची सामुद्रधुनी' रोखून धरल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कठोर लष्करी पावले उचलण्याचे संकेत दिले...

जॅनिक सिनरने मोडला पीट सॅम्प्रासचा ३२ वर्षांपूर्वीचा विक्रम

इटलीच्या स्टार टेनिसपटूने आणि सध्याचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिनरने टेनिसविश्वात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. त्याने एटीपी १००० मास्टर्स स्पर्धेत वर्षाची सुरुवात सलग २० विजयांनी करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. असा पराक्रम करणारा तो नोव्हाक...
Skip to content