HomeArchiveकांदिवली वाहतूक विभाग...

कांदिवली वाहतूक विभाग राबविणार धडक मोहीम – अतुल भातखळकर

Details
कांदिवली वाहतूक विभाग राबविणार धडक मोहीम – अतुल भातखळकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कांदिवलीमधील अनधिकृत वाहने, बेकायदा पार्किंग आदी वाहतूक समस्येसंदर्भात बुधवारी कांदिवली पूर्व, समता नगर, एसीपी कार्यालय येथे संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. या समस्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी येत्या आठवड्यात वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन धडक मोहीम राबविणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

 
कांदिवली पूर्व विभागातील वाहतूक समस्यांच्या संदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी नुकतीच डीसीपी, डीसीपी वाहतूक, परिवहन तसेच महानगरपालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पोलिस प्रशासनातर्फे येत्या आठवड्यात अवैध वाहनांवर कडक कारवाई केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांवरील सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात येतील असे आश्वासन पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. आकुर्ली रोड वरील वाहतुकीला आळा बसावा यासाठी पोलीस बंदोबस्त, कांदिवली आणि मालाड पूर्व रेल्वेस्टेशन परिसरात सकाळच्या वेळी पोलीस बंदोबस्त, अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंग थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश भातखळकर यांनी या बैठकीमध्ये दिले.
 
या सगळ्या मागण्या पोलीस, मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक प्रशासनाने मान्य केल्या आहेत. या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन डीसीपी स्वामी यांनी दिले आहे. त्याचबरोबर वर्दळीच्या ठिकाणी पे अँण्ड पार्किंग जागा, रॅश ड्रायव्हिंग, डबल पार्किंग आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी उपस्थित असलेल्या दक्ष नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीला कांदिवली डीसीपी डॉ. डी. स्वामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी कसबे, आर दक्षिण विभाग मुंबई मनपाचे अधिकारी आकरे, कांदिवली वाहतूक विभागाचे डीसीपी संदीप भाजीभाकरे, डेप्युटी आरटीओ दहिसर विभाग अशोक पवार, नगरसेविका सुरेखा पाटील, नगरसेवक ठाकूर सागर-सिंह, ‘लोखंडवाला रेसिडेंट्स असो.’ आणि दक्ष नागरिक उपस्थित यावेळी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कांदिवलीमधील अनधिकृत वाहने, बेकायदा पार्किंग आदी वाहतूक समस्येसंदर्भात बुधवारी कांदिवली पूर्व, समता नगर, एसीपी कार्यालय येथे संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. या समस्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी येत्या आठवड्यात वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन धडक मोहीम राबविणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

 
कांदिवली पूर्व विभागातील वाहतूक समस्यांच्या संदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी नुकतीच डीसीपी, डीसीपी वाहतूक, परिवहन तसेच महानगरपालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पोलिस प्रशासनातर्फे येत्या आठवड्यात अवैध वाहनांवर कडक कारवाई केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांवरील सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात येतील असे आश्वासन पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. आकुर्ली रोड वरील वाहतुकीला आळा बसावा यासाठी पोलीस बंदोबस्त, कांदिवली आणि मालाड पूर्व रेल्वेस्टेशन परिसरात सकाळच्या वेळी पोलीस बंदोबस्त, अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंग थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश भातखळकर यांनी या बैठकीमध्ये दिले.
 
या सगळ्या मागण्या पोलीस, मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक प्रशासनाने मान्य केल्या आहेत. या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन डीसीपी स्वामी यांनी दिले आहे. त्याचबरोबर वर्दळीच्या ठिकाणी पे अँण्ड पार्किंग जागा, रॅश ड्रायव्हिंग, डबल पार्किंग आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी उपस्थित असलेल्या दक्ष नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीला कांदिवली डीसीपी डॉ. डी. स्वामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी कसबे, आर दक्षिण विभाग मुंबई मनपाचे अधिकारी आकरे, कांदिवली वाहतूक विभागाचे डीसीपी संदीप भाजीभाकरे, डेप्युटी आरटीओ दहिसर विभाग अशोक पवार, नगरसेविका सुरेखा पाटील, नगरसेवक ठाकूर सागर-सिंह, ‘लोखंडवाला रेसिडेंट्स असो.’ आणि दक्ष नागरिक उपस्थित यावेळी उपस्थित होते.”
 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content