HomeArchiveकविता कशी जन्माला...

कविता कशी जन्माला येते?

Details
कविता कशी जन्माला येते?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

जानेवारीमध्ये यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. या संमेलनाला महाराष्ट्रातील कवी-कवयित्रींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 11 ते 13 जानेवारी दरम्यान संमेलनात रंगणार्‍या काव्य कट्ट्यासाठी गेल्या तीन वर्षांचा विक्रम मोडत एक हजार 286 कविता पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, तीन दिवस चालणार्‍या या संमेलनात कवी कट्ट्यासाठी एकूण 23 तास मिळणार असल्याने यातील 460 कवींना कट्ट्यावर काव्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर कविता कशी जन्माला येते हे आपण सोदाहरण पाहूया.

कविता ही अचानक सुचते. एखादी घटना कविता जन्माला घालते. प्रेमातून जसे काव्य निर्माण होते. तसेच प्रेमभंगातूनदेखील ते जन्माला येते. तथापि, कवितेसाठी गाठीशी त्या घटनेचा अनुभव असावाच लागतो असे नव्हे. उदा. हरिवंशराय बच्चन यांनी ‘मधुशाला’ हे मद्यपानावरील अजरामर दीर्घकाव्य लिहीले. पण हरिवंशरायजी स्वत: मद्यपान करीत नव्हते. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर एकदा सायन येथे बसमध्ये बसले. त्यांना व्ही.टी.ला जायचे होते. दादर टी.टी. येथे एक तरूणी बसमध्ये चढली. पाडगावकरांचे तिच्याकडे लक्ष गेले. ती तरूणी आपल्याच विश्वात रमली होती. कधी खिडकीबाहेर पाहून स्वत:शीच हसत होती तर कधी लाजत होती. पाडगावकर टक लावून तिचा तो बोलका चेहरा न्याहळत होते. ती तरूणी लालबागला उतरून निघून गेली. त्याक्षणी पाडगावकरांना ते अजरामर गीत सुचले: ‘‘ लाजून हासणे अन् हासून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे..’’

 

पाडगावकरांनी हा किस्सा वृत्तपत्र छायाचित्रकार विजय तारी यांना सांगितला तेव्हा तारींनादेखील एक चारोळी सुचली. ते पाडगावकारांना म्हणाले, ‘‘पाडगावकर, तुम्ही कंडक्टरला तिकीटसाठी नाणे दिले. पण, त्या मुलीने तुम्हाला जाता जाता गाणे दिले.’’

सारांश, कविता कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही परिस्थितीत जन्माला येते. यासंदर्भात आमचा अनुभव असा: आम्ही कार्यालयात जाण्यासाठी घरचा जीना उतरत होतो तेव्हा एक मोटार एका कुत्र्याला चिरडून निघून गेली. तो दुर्दैवी मुका प्राणी काही क्षणात तडफडून मेला. आम्ही काहीच करू शकलो नाही. कार्यालयात जाताना त्याचे ते तडफडणे नजरेसमोर येत होते. तेव्हा आम्हाला एक चारोळी सुचली. ती आमच्या ‘पाकळ्या’ या चारोळी संग्रहात आहे. ती अशी:
अपघात झालेलं कुत्रं
मी मरताना पाहिलं
पाऊलं माझी पुढे गेली
मन त्याच्याजवळ राहिलं
भविष्यात मराठी कवितांचा इतिहास लिहायचा झाल्यास अशी कितीतरी उदाहरणे समोर येतील. लोकप्रिय कविता कशा जन्माला आल्या हे वाचणे वाचकांना निश्चितच आवडेल.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

जानेवारीमध्ये यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. या संमेलनाला महाराष्ट्रातील कवी-कवयित्रींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 11 ते 13 जानेवारी दरम्यान संमेलनात रंगणार्‍या काव्य कट्ट्यासाठी गेल्या तीन वर्षांचा विक्रम मोडत एक हजार 286 कविता पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, तीन दिवस चालणार्‍या या संमेलनात कवी कट्ट्यासाठी एकूण 23 तास मिळणार असल्याने यातील 460 कवींना कट्ट्यावर काव्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर कविता कशी जन्माला येते हे आपण सोदाहरण पाहूया.

कविता ही अचानक सुचते. एखादी घटना कविता जन्माला घालते. प्रेमातून जसे काव्य निर्माण होते. तसेच प्रेमभंगातूनदेखील ते जन्माला येते. तथापि, कवितेसाठी गाठीशी त्या घटनेचा अनुभव असावाच लागतो असे नव्हे. उदा. हरिवंशराय बच्चन यांनी ‘मधुशाला’ हे मद्यपानावरील अजरामर दीर्घकाव्य लिहीले. पण हरिवंशरायजी स्वत: मद्यपान करीत नव्हते. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर एकदा सायन येथे बसमध्ये बसले. त्यांना व्ही.टी.ला जायचे होते. दादर टी.टी. येथे एक तरूणी बसमध्ये चढली. पाडगावकरांचे तिच्याकडे लक्ष गेले. ती तरूणी आपल्याच विश्वात रमली होती. कधी खिडकीबाहेर पाहून स्वत:शीच हसत होती तर कधी लाजत होती. पाडगावकर टक लावून तिचा तो बोलका चेहरा न्याहळत होते. ती तरूणी लालबागला उतरून निघून गेली. त्याक्षणी पाडगावकरांना ते अजरामर गीत सुचले: ‘‘ लाजून हासणे अन् हासून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे..’’

 

पाडगावकरांनी हा किस्सा वृत्तपत्र छायाचित्रकार विजय तारी यांना सांगितला तेव्हा तारींनादेखील एक चारोळी सुचली. ते पाडगावकारांना म्हणाले, ‘‘पाडगावकर, तुम्ही कंडक्टरला तिकीटसाठी नाणे दिले. पण, त्या मुलीने तुम्हाला जाता जाता गाणे दिले.’’

सारांश, कविता कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही परिस्थितीत जन्माला येते. यासंदर्भात आमचा अनुभव असा: आम्ही कार्यालयात जाण्यासाठी घरचा जीना उतरत होतो तेव्हा एक मोटार एका कुत्र्याला चिरडून निघून गेली. तो दुर्दैवी मुका प्राणी काही क्षणात तडफडून मेला. आम्ही काहीच करू शकलो नाही. कार्यालयात जाताना त्याचे ते तडफडणे नजरेसमोर येत होते. तेव्हा आम्हाला एक चारोळी सुचली. ती आमच्या ‘पाकळ्या’ या चारोळी संग्रहात आहे. ती अशी:
अपघात झालेलं कुत्रं
मी मरताना पाहिलं
पाऊलं माझी पुढे गेली
मन त्याच्याजवळ राहिलं
भविष्यात मराठी कवितांचा इतिहास लिहायचा झाल्यास अशी कितीतरी उदाहरणे समोर येतील. लोकप्रिय कविता कशा जन्माला आल्या हे वाचणे वाचकांना निश्चितच आवडेल.”
 

Continue reading

बेंगळुरूमध्ये पावसाचा हाहाःकार; ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भीषण रूप धारण केले. शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर...

१३ दिवस बंद राहणार बँका मे महिन्यात!

एप्रिल महिना संपायला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असून मे महिन्याला सुरुवात होत आहे. जर तुम्हाला मे महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (सर्व) कॅलेंडरनुसार, मे २०२६मध्ये...

इराणबरोबरच्या युद्धात ट्रम्प परस्पर करणार ‘विजया’ची घोषणा?

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही कराराशिवाय 'विजयाची घोषणा' करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका 'एक्झिट' रणनीतीनुसार, लवकरच विजयाची घोषणा करण्याची शक्यता आहे....
Skip to content