HomeArchiveकलिना कॅम्पस पुनर्विकासासाठी...

कलिना कॅम्पस पुनर्विकासासाठी 500 कोटींचा निधी द्या – राहुल शेवाळे

Details
कलिना कॅम्पस पुनर्विकासासाठी 500 कोटींचा निधी द्या – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुमारे 162 वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस पुनर्विकासाची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.

‘सेंट्रल युनिव्हर्सिटीज बिल 2019’ या विधयेकाच्या चर्चेदरम्यान खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या अनेक समस्या सोडविण्यासाठीही केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाला 162 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासाचा आराखडा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार किंवा विद्यापीठाकडे इतका निधी उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून कलिना कॅम्पसचा पुनर्विकास रखडला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी या पुनर्विकासासाठी त्वरित उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबतची समस्याही खासदार शेवाळे यांनी लोकसभेत मांडली. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 86 पदांपैकी 59 पदे रिक्त आहेत तर सहाय्यक प्राध्यापकांच्या 129 पदांपैकी 57 पदे रिक्त आहेत. वास्तविक, विद्यापीठाला उत्पन्न नसल्याने आणि प्राध्यापकांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागेल म्हणून ही रिक्त पदे भरली जात नसल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी सभागृहात मांडली. ही रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी त्यांनी केली. कलिना कॅम्पसमधील डिस्टन्स एज्युकेशन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विशेष स्पोर्ट्स पदवी अभ्यासक्रम यासाठीचे सरकारच्या विचाराधीन असलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, असेही ते म्हणाले.

मुंबईतून केंद्र सरकारला सुमारे 40 टक्के महसूल जातो, त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई आणि मुंबई विद्यापीठातील समस्या सोडविण्यासाठी निधी द्यावा. गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया आणि पेपर तपासणीत बऱ्याचदा घोळ झाले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या समस्यांना वाचा फोडली, याची आठवण करून देत केंद्र सरकारने मुंबई विद्यापीठाला बळकटी द्यावी, अशी मागणी खासदार शेवाळे केली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुमारे 162 वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस पुनर्विकासाची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.

‘सेंट्रल युनिव्हर्सिटीज बिल 2019’ या विधयेकाच्या चर्चेदरम्यान खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या अनेक समस्या सोडविण्यासाठीही केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाला 162 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासाचा आराखडा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार किंवा विद्यापीठाकडे इतका निधी उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून कलिना कॅम्पसचा पुनर्विकास रखडला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी या पुनर्विकासासाठी त्वरित उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबतची समस्याही खासदार शेवाळे यांनी लोकसभेत मांडली. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 86 पदांपैकी 59 पदे रिक्त आहेत तर सहाय्यक प्राध्यापकांच्या 129 पदांपैकी 57 पदे रिक्त आहेत. वास्तविक, विद्यापीठाला उत्पन्न नसल्याने आणि प्राध्यापकांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागेल म्हणून ही रिक्त पदे भरली जात नसल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी सभागृहात मांडली. ही रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी त्यांनी केली. कलिना कॅम्पसमधील डिस्टन्स एज्युकेशन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विशेष स्पोर्ट्स पदवी अभ्यासक्रम यासाठीचे सरकारच्या विचाराधीन असलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, असेही ते म्हणाले.

मुंबईतून केंद्र सरकारला सुमारे 40 टक्के महसूल जातो, त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई आणि मुंबई विद्यापीठातील समस्या सोडविण्यासाठी निधी द्यावा. गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया आणि पेपर तपासणीत बऱ्याचदा घोळ झाले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या समस्यांना वाचा फोडली, याची आठवण करून देत केंद्र सरकारने मुंबई विद्यापीठाला बळकटी द्यावी, अशी मागणी खासदार शेवाळे केली.”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content