HomeArchiveउमेदवार आणण्याची परंपरा...

उमेदवार आणण्याची परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यावेळचीच! – मधु चव्हाण

Details
उमेदवार आणण्याची परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यावेळचीच! – मधु चव्हाण

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दुसऱ्या पक्षातील उमेदवार भारतीय जनता पार्टीत स्वतःहून येत आहेत. ही उमेदवारांची पळवापळवी नाही. उमेदवारांना स्वतःच्या पक्षात घेण्याची परंपरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वेळेपासून सुरू झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे अभ्यासू नेते यशवंतराव मोहिते यांना काँग्रेस पक्षाच्या घेऊन पक्ष वाढविण्याची परंपरा सुरू झाली. त्याचे मानसपुत्र शरद पवार यांनीही ही परंपरा आजतागायत चालू ठेवली आहे. त्यामुळे भाजपाची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास कार्यक्रम आवडला म्हणून इतर पक्षातील ज्येष्ठ भाजपात येत असतील तर त्यात वावगे काहीच नाही, असे मत भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते व म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने लोकसभा निवडणूक : २०१९, ही वार्तालाप मालिका आयोजित केली आहे. त्यात मधु चव्हाण बोलत होते. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मधु चव्हाण यांनी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी देशात विकासाची कामे केली आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रत्येक देशाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केल्याने पाकिस्तान आज एकटा पडला आहे. सन २००८ मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईत ३०० हून अधिक निरपराध माणसांना मारले. त्यात आमचे आघाडीचे पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळकर आणि अशोक कामटे मारले गेले. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने निषेधाचे पाकिस्तानला पत्र पाठविले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्काराला पूर्ण स्वातंत्र्य देऊन लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला. पण दुर्दैव असं की, राहुल गांधी यांचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा मोदी यांच्याकडे पुरावा मागत आहेत. इतर विरोधी पक्षही पुरावा मागत आहेत. परंतु जनमानसात याबाबत प्रचंड संताप निर्माण झाला असून त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, असेही मधु चव्हाण यांनी यावेळी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दुसऱ्या पक्षातील उमेदवार भारतीय जनता पार्टीत स्वतःहून येत आहेत. ही उमेदवारांची पळवापळवी नाही. उमेदवारांना स्वतःच्या पक्षात घेण्याची परंपरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वेळेपासून सुरू झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे अभ्यासू नेते यशवंतराव मोहिते यांना काँग्रेस पक्षाच्या घेऊन पक्ष वाढविण्याची परंपरा सुरू झाली. त्याचे मानसपुत्र शरद पवार यांनीही ही परंपरा आजतागायत चालू ठेवली आहे. त्यामुळे भाजपाची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास कार्यक्रम आवडला म्हणून इतर पक्षातील ज्येष्ठ भाजपात येत असतील तर त्यात वावगे काहीच नाही, असे मत भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते व म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने लोकसभा निवडणूक : २०१९, ही वार्तालाप मालिका आयोजित केली आहे. त्यात मधु चव्हाण बोलत होते. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मधु चव्हाण यांनी मुंबईतील लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी देशात विकासाची कामे केली आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रत्येक देशाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केल्याने पाकिस्तान आज एकटा पडला आहे. सन २००८ मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईत ३०० हून अधिक निरपराध माणसांना मारले. त्यात आमचे आघाडीचे पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळकर आणि अशोक कामटे मारले गेले. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने निषेधाचे पाकिस्तानला पत्र पाठविले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्काराला पूर्ण स्वातंत्र्य देऊन लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला. पण दुर्दैव असं की, राहुल गांधी यांचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा मोदी यांच्याकडे पुरावा मागत आहेत. इतर विरोधी पक्षही पुरावा मागत आहेत. परंतु जनमानसात याबाबत प्रचंड संताप निर्माण झाला असून त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, असेही मधु चव्हाण यांनी यावेळी सांगितले.”

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content