HomeArchiveईशान्य मुंबईत भाजपच्या...

ईशान्य मुंबईत भाजपच्या कोटक यांचा हायटेक प्रचारावर भर

Details
ईशान्य मुंबईत भाजपच्या कोटक यांचा हायटेक प्रचारावर भर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
एकीकडे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदारसंघातील पदयात्रा आणि चौकसभांद्वारे जनसंवादावर भर देत परंपरागत प्रचारपद्धतीचा अवलंब केला असतानाच सोशल मीडियासारख्या नव्या तंत्राचा वापरही प्रचारात प्रभावीपणे केला जात आहे. विशेष करून युवा आणि उच्चशिक्षित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हायटेक प्रचारावरही भर देण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणचे बुथ वर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठीही फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंगसाईट्सचा प्रभावीपणे वापर केला जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या मतदारांशी थेट संवादावर प्रचाराचा भर असून चौकसभा आणि पदयात्रांचे योग्य आयोजन करण्यात येत आहे. मात्र सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग असून फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सही संवादाचे प्रमुख माध्यम बनल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुक प्रचारातही त्यांचा प्रभावी वापर केला जात आहे. विशेषत: तरूण आणि उच्चशिक्षित वर्गाद्वारे या सोशल नेटवर्किंग साईट्सचा सढळ हस्ते वापर होत असल्याने त्या माध्यमातूनही प्रचार करण्याचे नियोजन महायुतीतर्फे करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेत सोशल मीडियाचा वापर करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय महायुतीचे कार्यकर्ते, बुथवर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स यांच्याशी समन्वय राखण्याच्या कामीही सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. एकूणच काय तर कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची सगळी यंत्रणा महायुतीने ईशान्य मुंबईत कामाला लावल्याचे चित्र आहे.

 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
एकीकडे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदारसंघातील पदयात्रा आणि चौकसभांद्वारे जनसंवादावर भर देत परंपरागत प्रचारपद्धतीचा अवलंब केला असतानाच सोशल मीडियासारख्या नव्या तंत्राचा वापरही प्रचारात प्रभावीपणे केला जात आहे. विशेष करून युवा आणि उच्चशिक्षित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हायटेक प्रचारावरही भर देण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणचे बुथ वर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठीही फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंगसाईट्सचा प्रभावीपणे वापर केला जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या मतदारांशी थेट संवादावर प्रचाराचा भर असून चौकसभा आणि पदयात्रांचे योग्य आयोजन करण्यात येत आहे. मात्र सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग असून फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सही संवादाचे प्रमुख माध्यम बनल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुक प्रचारातही त्यांचा प्रभावी वापर केला जात आहे. विशेषत: तरूण आणि उच्चशिक्षित वर्गाद्वारे या सोशल नेटवर्किंग साईट्सचा सढळ हस्ते वापर होत असल्याने त्या माध्यमातूनही प्रचार करण्याचे नियोजन महायुतीतर्फे करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेत सोशल मीडियाचा वापर करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय महायुतीचे कार्यकर्ते, बुथवर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स यांच्याशी समन्वय राखण्याच्या कामीही सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. एकूणच काय तर कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची सगळी यंत्रणा महायुतीने ईशान्य मुंबईत कामाला लावल्याचे चित्र आहे.

 
 
 
 ”
 
 
 
 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content