HomeArchiveआतातरी तरी ताळ्यावर...

आतातरी तरी ताळ्यावर या!

Details

 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
“भारतात लॉकडाऊनच्या १६ दिवसानंतर देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या ५८६५ रूग्णांची नोंद झाली. यामध्ये महाराष्ट्रातल्या १३६४ रूग्णांचा समावेश असून आतातरी राज्य सरकारने लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य करत आहेत.”
 
“आज देशात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कालपर्यंतची आकडेवारी पाहिली तर ती १३६४ होती. त्याचवेळी अंदमान-निकोबार- ११, गोवा- ७, हिमाचल प्रदेश- १८, पुद्दूचेरी- ५, झारखंड- ४, केरळ- ३४५, उत्तर प्रदेश- ३६१, आसाम- २८, दिल्ली- ६६९, जम्मू-काश्मीर- १५८, ओडिशा- ४२, कर्नाटक- १८१, तेलंगाणा- ४२७, गुजरात- १७९, राजस्थान- ३८१, उत्तराखंड- ३३, मिझोराम- १, तामीळनाडू- ७३८, बिहार- ३८, अरूणाचल प्रदेश- १, पंजाब- १०१, मध्य प्रदेश- २२९, प. बंगाल- १०३, आंध्र प्रदेश- ३४८, लडाख- १४, छत्तीसगड- १०, मणिपूर- १, हरयाणा- १४७ व चंदीगड येथे १८ रूग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी पाहता महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वांच्या तुलनेत कितीतरी मोठी आहे. यात मुंबईची संख्या तर जवळजवळ निम्मी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंचा दरही जगाच्या दरापैक्षा जास्त आहे. जगाचा मृत्यूदर साडेपाच टक्क्यांपर्यंत असताना महाराष्ट्रात तो सहा टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळेच आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. मात्र नुसते जागे होऊन चालणार नाही तर त्यादृष्टीने अंमलबजावणीही करावी लागणार हे, असे सामान्य नागरिकांचे मत आहे.”
 
“राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल २२९ रूग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांची संख्या आता १३६४ झाली आहे. यामध्ये मुंबईतल्या ७४६ रूग्णांचा समावेश आहे. मुंबईतल्या वाढत्या रूग्णांची संख्या चिंता वाढवणारी असून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यामुळेच धारावीसारख्या गर्दीच्या वसाहतींमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपी) वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी दिली.”

 
“पोलीस नियंत्रम कक्षाच्या माध्यमातून सीसीटीव्हीद्वारे सर्व प्रमुख रस्त्यांच्या निगराणी ठेवली जात आहे. मात्र, यामुळे आतल्या भागांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळेच गर्दीच्या ठिकाणी टेहाळणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावीसारख्या दाट वस्तींच्या वसाहतीत एकेका सार्वजनिक शौचालयाचा वापर दिवसभरात दोनशेहून अधिक लोक करतात. त्यामुळे स्वच्छतेचा आणि निर्जंतुकीकरणाचा मोठा प्रश्न उपस्थित होतो. यावर उपाययोजना म्हणून अशा वसाहतींमधली सर्व शौचालये दर तास, दोन तासांनी जेटच्या माध्यमातून स्वच्छ करण्याची जबाबदारी अग्नीशामक दलाकडे सोपविण्यात आली आहे. ड्रोनच्या सहाय्यानेही ती स्वच्छ केली जातील, असे आरोग्यमंत्री म्हणाले.”
 
“हातावर पोट असलेल्या लोकांसाठी तसेच घराघरांमधून कुटिरोद्योग करून पोट भरणाऱ्या लोकांसाठी आज इस्कॉन, श्री श्री रविशंकर आदींच्या संस्थांमार्फत मोफत जेवण पुरवले जात आहे. परंतु, ही व्यवस्था पुरेशी नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कम्युनिटी किचनतर्फे या लोकांना जवण पुरविण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही टोपे म्हणाले.”
  

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content