HomeArchiveआंबेडकरी चळवळीचे ‘पानीपत’!

आंबेडकरी चळवळीचे ‘पानीपत’!

Details
आंबेडकरी चळवळीचे ‘पानीपत’!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

भगवान निळे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
दलित चळवळीला एवढा क्रान्तिकारी वारसा असताना नवीन दलित नेतृत्त्व उदयाला येताना दिसत नाही. आंबेडकरी चळवळीतून नवे नेतृत्त्व उभे का राहत नाही, हा प्रश्न आजही कायम आहे. वर्तमान दलित चळवळ मोठ्या अरिष्टात सापडली आहे. त्यामुळे दलित चळवळ संपली आहे का, हे तपासणे क्रमप्राप्त झाले आहे. जगातील कुठलीही सामाजिक चळवळ कायम गतिमान राहू शकत नाही. सामाजिक चळवळीत चढउतार असतात. चळवळीचे संदर्भ, प्रश्न आणि नेतृत्त्व बदलत राहते, म्हणून चळवळही बदलत राहते. दलित चळवळ दिशाहीन झाली हे वादातीत आहे. पण, याचे खापर फक्त नेत्यांवर फोडून कसे चालेल? याला चळवळीसाठीचे सर्व घटक जबाबदार असतात. अलीकडे लोक दलित चळवळीत सहभागी होत नाहीत. लोक काही उद्द्येशांमुळे चळवळीत सहभागी होतात. चळवळीतील सहभाग्यांना वर्तमान परिस्थितीमध्ये बदल घडवून आणायचा असतो. तसेच, कुठल्यातरी समुदायाचा, गटाचा सभासद असावे असे लोकांना वाटते. लोकांच्या मनात स्वत:च्या जीवनाला वेगळा अर्थ व संदर्भ मिळवून देण्याची तीव्र ‘इच्छा असते. चळवळीतील सहभाग्यांना आपली वेगळी अस्मिता निर्माण करायची असते. सामाजिक चळवळीतील सहभागाविषयी वरील प्रकारचे निकष दलित चळवळीला लावून पाहिले तर आजची दलित चळवळ दिशाहीन का झाली, याची उत्तरे सापडू शकतात.

दलितांच्या शारीरिक स्तरीकरणात आपण काय केले? बाबा आढावांची ‘एक गाव एक पाणवठा’ ही पाण्यासंदर्भातील तर ‘झुणका भाकर एक रूपयात’ अशा अन्नासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या योजना दलित संघटनांनी गावागावात का नेल्या नाहीत? राखीव जागांचा लाभ घेऊन जे दलित डॉक्टर्स तयार झाले, त्यातले किती जण दलित वस्त्यांत गेले? दलितांनी किती इस्पितळे उघडली? दलितांनी एकत्र येऊन बांधकाम करून इस्पितळाची इमारत बांधणे अशक्य नव्हते. ते आम्ही का केले नाही? दलित वृद्धाश्रम का उभारले गेले नाहीत? जर बाबा आढाव सवर्णमान्य नव्हते, तर अशी समांतर योजना दलितांनी गावागावात का उभारली नाही? सरकारकडून मदत घेऊन झुणका भाकरसारखी अन्नकेंद्रे उभारणे का झाले नाही? बाबासाहेबांच्या जयंतीसाठी पैसे जमतात आणि ह्या कामासाठी पैसे जमत नाहीत? आम्ही दारूबंदी चळवळ का उभी करत नाही? दलितांच्यात व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यासाठी किती व्यसनमुक्ती केंद्रे दलितांनी उभी केली? असे प्रश्न सर्व दलितांनी स्वतःला विचारायला हवेत.

 

क्रीडा क्षेत्र हे एक दलितांना स्वतःला सिध्द करण्याचे चांगले क्षेत्र होते. आम्ही ह्या क्षेत्राकडे किती लक्ष दिले? दलित नेत्यांना साधा एक कबड्डीचा किंवा खो-खोचा संघ तयार करावासा वाटला नाही? आदिवासींच्यात आलेल्या क्रीडाक्षमतेबाबत आम्ही काय केले? अमेरिकेतल्या निग्रोंची प्रतिष्ठा वाढवण्यात तिथल्या कृष्णवर्णीय क्रीडापटूंचा मोठा वाटा आहे हे आम्ही कधी लक्षात घेणार आहोत? तब्ब्येतीसाठी जीमच पाहिजे असे नाही. दण्डबैठका, योगासने ह्यांच्या साहाय्यानेही ही किमया साधता येते. ज्युदो-कराटे हे तर बौध्द भिःखुंनी शोधलेले अहिंसक प्रतिकाराचे वर्ग. आम्ही ते आमच्या तरूणांना-तरूणींना का शिकवत नाही? दलित वस्तीत विपश्यना केन्द्रे का उघडली जात नाहीत? ह्या संदर्भात बौध्द भिःखू काय करत आहेत? आज प्राध्यापक झालेल्या बौद्धांनीही बुद्धांचे साधे त्रिपिटीक वाचलेले नाही. हा कसला आळशीपणा? ह्या आळशीपणाचे दलित किती काळ समर्थन करणार आहेत? रामकृष्ण मठ वगैरे ठिकाणी आज हिंदू-दलितांना पूर्ण खुला प्रवेश आहे. तिथे हे दलित का जात नाहीत? मन्दिरप्रवेशाचे लढे आम्ही का सोडून दिले आहेत? इगतपुरीसारख्या विपश्यना केन्द्रात सुशिक्षित दलितांपेक्षा सवर्ण हिंदूंची संख्या कित्येक पटींनी अधिक आहे. दलित डॉक्टर्स, प्राध्यापकांना इथे जायला कोणी मज्जाव केला आहे?

दलितांनी बाबासाहेबांच्यानंतर किती शाळा उघडल्या? किती महाविद्यालये काढली? वास्तविक बाबासाहेबांनी जो ज्ञानाचा ठेवा उपलब्ध केला त्याच्या कितीतरी पुढे आम्ही जायला हवे होते. पण घोडे अडले कुठे? बाबासाहेब हे दलितांचे एकमेव नेते नव्हते. दक्षिणेत पेरियार यांनी बाबासाहेबांच्या तोडीचे काम केले आहे. अशा नेत्यांचे कार्य व विचारसरणी आम्ही किती समजून घेतली? दलितांच्या बाबत केलेल्या सवर्ण सुधारकांच्या कामगिरीचे आम्ही नीट मूल्यमापन केले आहे का?
(पुढे चालू)”
 
“भगवान निळे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
दलित चळवळीला एवढा क्रान्तिकारी वारसा असताना नवीन दलित नेतृत्त्व उदयाला येताना दिसत नाही. आंबेडकरी चळवळीतून नवे नेतृत्त्व उभे का राहत नाही, हा प्रश्न आजही कायम आहे. वर्तमान दलित चळवळ मोठ्या अरिष्टात सापडली आहे. त्यामुळे दलित चळवळ संपली आहे का, हे तपासणे क्रमप्राप्त झाले आहे. जगातील कुठलीही सामाजिक चळवळ कायम गतिमान राहू शकत नाही. सामाजिक चळवळीत चढउतार असतात. चळवळीचे संदर्भ, प्रश्न आणि नेतृत्त्व बदलत राहते, म्हणून चळवळही बदलत राहते. दलित चळवळ दिशाहीन झाली हे वादातीत आहे. पण, याचे खापर फक्त नेत्यांवर फोडून कसे चालेल? याला चळवळीसाठीचे सर्व घटक जबाबदार असतात. अलीकडे लोक दलित चळवळीत सहभागी होत नाहीत. लोक काही उद्द्येशांमुळे चळवळीत सहभागी होतात. चळवळीतील सहभाग्यांना वर्तमान परिस्थितीमध्ये बदल घडवून आणायचा असतो. तसेच, कुठल्यातरी समुदायाचा, गटाचा सभासद असावे असे लोकांना वाटते. लोकांच्या मनात स्वत:च्या जीवनाला वेगळा अर्थ व संदर्भ मिळवून देण्याची तीव्र ‘इच्छा असते. चळवळीतील सहभाग्यांना आपली वेगळी अस्मिता निर्माण करायची असते. सामाजिक चळवळीतील सहभागाविषयी वरील प्रकारचे निकष दलित चळवळीला लावून पाहिले तर आजची दलित चळवळ दिशाहीन का झाली, याची उत्तरे सापडू शकतात.

दलितांच्या शारीरिक स्तरीकरणात आपण काय केले? बाबा आढावांची ‘एक गाव एक पाणवठा’ ही पाण्यासंदर्भातील तर ‘झुणका भाकर एक रूपयात’ अशा अन्नासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या योजना दलित संघटनांनी गावागावात का नेल्या नाहीत? राखीव जागांचा लाभ घेऊन जे दलित डॉक्टर्स तयार झाले, त्यातले किती जण दलित वस्त्यांत गेले? दलितांनी किती इस्पितळे उघडली? दलितांनी एकत्र येऊन बांधकाम करून इस्पितळाची इमारत बांधणे अशक्य नव्हते. ते आम्ही का केले नाही? दलित वृद्धाश्रम का उभारले गेले नाहीत? जर बाबा आढाव सवर्णमान्य नव्हते, तर अशी समांतर योजना दलितांनी गावागावात का उभारली नाही? सरकारकडून मदत घेऊन झुणका भाकरसारखी अन्नकेंद्रे उभारणे का झाले नाही? बाबासाहेबांच्या जयंतीसाठी पैसे जमतात आणि ह्या कामासाठी पैसे जमत नाहीत? आम्ही दारूबंदी चळवळ का उभी करत नाही? दलितांच्यात व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यासाठी किती व्यसनमुक्ती केंद्रे दलितांनी उभी केली? असे प्रश्न सर्व दलितांनी स्वतःला विचारायला हवेत.

 

क्रीडा क्षेत्र हे एक दलितांना स्वतःला सिध्द करण्याचे चांगले क्षेत्र होते. आम्ही ह्या क्षेत्राकडे किती लक्ष दिले? दलित नेत्यांना साधा एक कबड्डीचा किंवा खो-खोचा संघ तयार करावासा वाटला नाही? आदिवासींच्यात आलेल्या क्रीडाक्षमतेबाबत आम्ही काय केले? अमेरिकेतल्या निग्रोंची प्रतिष्ठा वाढवण्यात तिथल्या कृष्णवर्णीय क्रीडापटूंचा मोठा वाटा आहे हे आम्ही कधी लक्षात घेणार आहोत? तब्ब्येतीसाठी जीमच पाहिजे असे नाही. दण्डबैठका, योगासने ह्यांच्या साहाय्यानेही ही किमया साधता येते. ज्युदो-कराटे हे तर बौध्द भिःखुंनी शोधलेले अहिंसक प्रतिकाराचे वर्ग. आम्ही ते आमच्या तरूणांना-तरूणींना का शिकवत नाही? दलित वस्तीत विपश्यना केन्द्रे का उघडली जात नाहीत? ह्या संदर्भात बौध्द भिःखू काय करत आहेत? आज प्राध्यापक झालेल्या बौद्धांनीही बुद्धांचे साधे त्रिपिटीक वाचलेले नाही. हा कसला आळशीपणा? ह्या आळशीपणाचे दलित किती काळ समर्थन करणार आहेत? रामकृष्ण मठ वगैरे ठिकाणी आज हिंदू-दलितांना पूर्ण खुला प्रवेश आहे. तिथे हे दलित का जात नाहीत? मन्दिरप्रवेशाचे लढे आम्ही का सोडून दिले आहेत? इगतपुरीसारख्या विपश्यना केन्द्रात सुशिक्षित दलितांपेक्षा सवर्ण हिंदूंची संख्या कित्येक पटींनी अधिक आहे. दलित डॉक्टर्स, प्राध्यापकांना इथे जायला कोणी मज्जाव केला आहे?

दलितांनी बाबासाहेबांच्यानंतर किती शाळा उघडल्या? किती महाविद्यालये काढली? वास्तविक बाबासाहेबांनी जो ज्ञानाचा ठेवा उपलब्ध केला त्याच्या कितीतरी पुढे आम्ही जायला हवे होते. पण घोडे अडले कुठे? बाबासाहेब हे दलितांचे एकमेव नेते नव्हते. दक्षिणेत पेरियार यांनी बाबासाहेबांच्या तोडीचे काम केले आहे. अशा नेत्यांचे कार्य व विचारसरणी आम्ही किती समजून घेतली? दलितांच्या बाबत केलेल्या सवर्ण सुधारकांच्या कामगिरीचे आम्ही नीट मूल्यमापन केले आहे का?
(पुढे चालू)”
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content