HomeArchiveअहल-ए-अदब फाऊंडेशनद्वारा मुशायराचे...

अहल-ए-अदब फाऊंडेशनद्वारा मुशायराचे शानदार आयोजन!

Details
अहल-ए-अदब फाऊंडेशनद्वारा मुशायराचे शानदार आयोजन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अहल ए अदब या साहित्यिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा व शायरी संध्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमाने श्रोते व रसिक मंत्रमुग्ध झाले.

 

अहल ए अदब या संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम भरगच्च गर्दीत झाला. दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदना झाल्यानंतर गजल गायक आजम असादत खान यांनी रूचि दरोलियाची गजल ‘जब से गिरे हैं इश्क में उडने लगे हैं देखिए’ गाऊन श्रोत्यांना कार्यक्रमाच्या अंतरंगात नेले. ग़ज़ल गायक सचिन शर्मा यांनी हस्तीमल हस्तीजींची प्रसिद्ध ग़ज़ल, ‘प्यार का पहला खत लिखने में वक़्त तो लगता है’ सादर केली. गझल गायकीनंतर मुशायराला प्रारंभ झाला. त्यात डॉ वसिफ, जनाब स्वप्नील, जुबैर अली तबिश यांनी सादर केलेल्या गझलांना श्रोत्यांमध्ये विशेषतः युवा वर्गाने विशेष दाद दिली. लुधियानाचे शायर मुकेश आलम यांनी शेर, ‘इतने सारे राबतों में इक सहारा ढूंढना, तसेच जैसे एक तारा ढूंढना’ यांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

 

डॉ. राजेश मोहन यांनी तरन्नुममध्ये गझल सादर केली. ‘खयाल ए यार में उलझे हुए हैं, नए अशआर में उलझे हुए हैं’ यांना श्रोत्यांकडून वन्समोअर मिळाला. वरिष्ठ शायर जनाब शारिक कैफी काही अपरिचित शायरी सादर केल्या. त्याला सर्व स्तरातील श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. जनाब शमीम अब्बास साहब यांनी शेर,’ तुममे कुछ भी वाहियात नहीं, जाओ तुम आदमी की जात नहीं’ याच्याबरोबरच गझल सादर केली. संस्थापक रोहित दरोलिया यांनी श्रोत्यांच्या मागणीवरून आणखी एक कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अहल ए अदब या साहित्यिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा व शायरी संध्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमाने श्रोते व रसिक मंत्रमुग्ध झाले.

 

अहल ए अदब या संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम भरगच्च गर्दीत झाला. दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदना झाल्यानंतर गजल गायक आजम असादत खान यांनी रूचि दरोलियाची गजल ‘जब से गिरे हैं इश्क में उडने लगे हैं देखिए’ गाऊन श्रोत्यांना कार्यक्रमाच्या अंतरंगात नेले. ग़ज़ल गायक सचिन शर्मा यांनी हस्तीमल हस्तीजींची प्रसिद्ध ग़ज़ल, ‘प्यार का पहला खत लिखने में वक़्त तो लगता है’ सादर केली. गझल गायकीनंतर मुशायराला प्रारंभ झाला. त्यात डॉ वसिफ, जनाब स्वप्नील, जुबैर अली तबिश यांनी सादर केलेल्या गझलांना श्रोत्यांमध्ये विशेषतः युवा वर्गाने विशेष दाद दिली. लुधियानाचे शायर मुकेश आलम यांनी शेर, ‘इतने सारे राबतों में इक सहारा ढूंढना, तसेच जैसे एक तारा ढूंढना’ यांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

 

डॉ. राजेश मोहन यांनी तरन्नुममध्ये गझल सादर केली. ‘खयाल ए यार में उलझे हुए हैं, नए अशआर में उलझे हुए हैं’ यांना श्रोत्यांकडून वन्समोअर मिळाला. वरिष्ठ शायर जनाब शारिक कैफी काही अपरिचित शायरी सादर केल्या. त्याला सर्व स्तरातील श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. जनाब शमीम अब्बास साहब यांनी शेर,’ तुममे कुछ भी वाहियात नहीं, जाओ तुम आदमी की जात नहीं’ याच्याबरोबरच गझल सादर केली. संस्थापक रोहित दरोलिया यांनी श्रोत्यांच्या मागणीवरून आणखी एक कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले.”
 
 

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content