HomeArchiveअरविंद सावंत यांच्या...

अरविंद सावंत यांच्या रूपाने मुंबईला मिळाले सशक्त प्रतिनिधित्व – लोढा

Details
अरविंद सावंत यांच्या रूपाने मुंबईला मिळाले सशक्त प्रतिनिधित्व – लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळासाठी निवड केल्यामुळे मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. या आनंदाच्या क्षणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष लोढा म्हणाले की, सावंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाल्याने दक्षिण मुंबईला आणखी एक सशक्त प्रतिनिधित्व लाभले आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, सावंत यांना दक्षिण मुंबईतील समस्यांबाबत माहिती आहे. त्यामुळे आता येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्राकडून अधिक सहकार्य मिळेल.

नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर सावंत यांच्या घरी भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दक्षिण मुंबईच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. लोढा यांनी विश्वास व्यक्त केला की, मंत्री झाल्यानंतर केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत सावंत यांचा महत्त्वाचा वाटा असेल व समस्या निराकरणाचे काम लवकर सुरू होईल व तितक्याच लवकर पूर्ण होईल. खासदार अरविंद सावंत मंत्री झाल्याने विकासासाठी अडथळा ठरणारे अनेक प्रस्ताव मार्गी लागतील.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मलबार हिल भागातील सावंत यांना सुमारे ६० हजारांनी मताधिक्य मिळाले आहे. त्यांच्या विजयासाठी मलबार हिल येथील मतदानाचा टक्का महत्त्वपूर्ण ठऱला आहे. आमदार लोढा म्हणाले, की सावंत एक लढाऊ नेता आहेत व ते जनतेच्या समस्या समजून घेतात. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळासाठी निवड केल्यामुळे मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. या आनंदाच्या क्षणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष लोढा म्हणाले की, सावंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाल्याने दक्षिण मुंबईला आणखी एक सशक्त प्रतिनिधित्व लाभले आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, सावंत यांना दक्षिण मुंबईतील समस्यांबाबत माहिती आहे. त्यामुळे आता येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्राकडून अधिक सहकार्य मिळेल.

नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर सावंत यांच्या घरी भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दक्षिण मुंबईच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. लोढा यांनी विश्वास व्यक्त केला की, मंत्री झाल्यानंतर केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत सावंत यांचा महत्त्वाचा वाटा असेल व समस्या निराकरणाचे काम लवकर सुरू होईल व तितक्याच लवकर पूर्ण होईल. खासदार अरविंद सावंत मंत्री झाल्याने विकासासाठी अडथळा ठरणारे अनेक प्रस्ताव मार्गी लागतील.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मलबार हिल भागातील सावंत यांना सुमारे ६० हजारांनी मताधिक्य मिळाले आहे. त्यांच्या विजयासाठी मलबार हिल येथील मतदानाचा टक्का महत्त्वपूर्ण ठऱला आहे. आमदार लोढा म्हणाले, की सावंत एक लढाऊ नेता आहेत व ते जनतेच्या समस्या समजून घेतात. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.”

Continue reading

‘होर्मुझ’च्या कोंडीमुळे जागतिक विमानसेवा धोक्यात

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणने गेल्या दोन महिन्यांपासून 'होर्मुझची सामुद्रधुनी' रोखून धरल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कठोर लष्करी पावले उचलण्याचे संकेत दिले...

जॅनिक सिनरने मोडला पीट सॅम्प्रासचा ३२ वर्षांपूर्वीचा विक्रम

इटलीच्या स्टार टेनिसपटूने आणि सध्याचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिनरने टेनिसविश्वात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. त्याने एटीपी १००० मास्टर्स स्पर्धेत वर्षाची सुरुवात सलग २० विजयांनी करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. असा पराक्रम करणारा तो नोव्हाक...

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...
Skip to content