HomeArchiveअंधेरीच्या राजाचे १८...

अंधेरीच्या राजाचे १८ तासांनी झाले विसर्जन!

Details
अंधेरीच्या राजाचे १८ तासांनी झाले विसर्जन!

    19-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईतल्या अंधेरीच्या राजाचे बुधवारी दुपारी २ वाजता, सुमारे १८ तासांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गणेशभक्तांच्या साक्षीने वेसावे समुद्रात वाजतगाजत विसर्जन झाले.
 
 
राज्यातील जवळजवळ सर्व गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाचे १९७४पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. आझाद नगर मेट्रो रेल्वेस्थानकापासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींसह गणेश भाविकांनी यंदादेखील मोठी गर्दी केली होती. अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग साधून अंधेरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
 
 
मंगळवारी, दि. १७ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आझादनगर २ येथील गणेश मंडपातून सजवलेल्या ट्रकमध्ये आरूढ झालेल्या अंधेरीच्या राजाची सुमारे १५ हजारांहून अधिक गणेशभक्तांच्या उपस्थितीत भव्य विसर्जन मिरवणूक निघाली. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही. रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, गंगाभवन मार्गे वेसावे समुदकिनारी बुधवारी दुपारी दोन वाजता १८ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेसाव्याच्या खोल समुद्रात खास बोटीतून अंधेरीच्या राजाला भावपूर्ण निरोप दिला अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.
 
 
या मिरवणुकीदरम्यान विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि अंधेरीच्या राजाला ओवाळून मिरवणुकीत सहभाग घेतला. अनेक गणेशभक्तांनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर संकष्टीचा उपवास सोडला. मिरवणुकीच्या मार्गक्रमणात गणेश भक्तांसाठी अल्पोपहार आणि पाणपोईची व्यवस्थादेखील अनेक संस्था व दानशूरांनी केली होती. अंधेरी मार्केट येथील अल्पसंख्याक बांधवांनी दिवाळीतला फटाक्यांचा धंदा चांगला होण्यासाठी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले.
 

 
 ”

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“मुंबईतल्या अंधेरीच्या राजाचे बुधवारी दुपारी २ वाजता, सुमारे १८ तासांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गणेशभक्तांच्या साक्षीने वेसावे समुद्रात वाजतगाजत विसर्जन झाले.”
 
 
राज्यातील जवळजवळ सर्व गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मात्र नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाचे १९७४पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. आझाद नगर मेट्रो रेल्वेस्थानकापासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटींसह गणेश भाविकांनी यंदादेखील मोठी गर्दी केली होती. अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग साधून अंधेरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
 
 
“मंगळवारी, दि. १७ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आझादनगर २ येथील गणेश मंडपातून सजवलेल्या ट्रकमध्ये आरूढ झालेल्या अंधेरीच्या राजाची सुमारे १५ हजारांहून अधिक गणेशभक्तांच्या उपस्थितीत भव्य विसर्जन मिरवणूक निघाली. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही. रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला, गंगाभवन मार्गे वेसावे समुदकिनारी बुधवारी दुपारी दोन वाजता १८ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेसाव्याच्या खोल समुद्रात खास बोटीतून अंधेरीच्या राजाला भावपूर्ण निरोप दिला अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली.”
 
 
या मिरवणुकीदरम्यान विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि अंधेरीच्या राजाला ओवाळून मिरवणुकीत सहभाग घेतला. अनेक गणेशभक्तांनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर संकष्टीचा उपवास सोडला. मिरवणुकीच्या मार्गक्रमणात गणेश भक्तांसाठी अल्पोपहार आणि पाणपोईची व्यवस्थादेखील अनेक संस्था व दानशूरांनी केली होती. अंधेरी मार्केट येथील अल्पसंख्याक बांधवांनी दिवाळीतला फटाक्यांचा धंदा चांगला होण्यासाठी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले.

 

 
 

 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content