Homeमाय व्हॉईसइंडिया आघाडीची कालची...

इंडिया आघाडीची कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग!

कालची इंडिया आघाडीची सभा म्हणजे केवळ एक फॅमिली गॅदरिंग होती. भानुमतीचा गुंदा अशी एक गोष्ट आहे. तशाप्रकारे धरून-बांधून आणलेले लोक या सभेमध्ये दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. नैराश्याचे भाव स्पष्ट दिसत होते. एक विश्वास गमावलेला विरोधी पक्ष समोर दिसत होता. त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. कोणताही विकासाचा अजेंडा नाही. पंतप्रधानपदाचा उमेदवारदेखील ते अजूनपर्यंत जाहीर करू शकले नाहीत. केवळ एकमेकांकडे बोट दाखवतात. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे, त्यांचा द्वेष करणे हा एकमेव अजेंडा असल्याचे प्रत्येकाच्या भाषणातून दिसत होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेची खिल्ली उडवली.

ज्यांना देशाच्या जनतेने आधीच नाकारले आहे. सत्तेतून हद्दपार केलेले आहे अशा इंडिया आघाडीच्या तडीपार नेत्यांची ती सभा होती. २०१४पूर्वी याच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकीदार म्हणून हिणवले होते. आज देशाच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. या सभेमधून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये एक नवीन गोष्ट घडली. ती म्हणजे वंदनीय बाळासाहेब भाषणाची सुरुवात करताना ज्याप्रकारे ‘माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो आणि मातांनो’ या शब्दांनी भाषणाची सुरुवात करायचे. ते शब्ददेखील उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना गाळले. यावरून त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना आणि धोरणांना कायमची तिलांजली दिल्याचे दिसून आले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्हाला त्यांना सोडण्याचा विचार करावा लागला. स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या स्टालिनसारख्या लोकांसोबत एकाच मंचावर बसावे लागले, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची माफी मागायला हवी, असेही ते म्हणाले.

फॅमिली गॅदरिंग

जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले. उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसले. कालच्या सभेमध्ये बोलायला उद्धव ठाकरे यांना फक्त पाच मिनिटे देण्यात आली. यातच आता त्यांची पत काय हे दिसून येते. आमदार, खासदार सारे सोडून गेल्यानंतर अशीच गत होणार, असेही शिंदे म्हणाले.

आपल्या भाषणामध्ये विरोधक आम्हाला डीलर म्हणाले. मी म्हणतो हो, आम्ही खरंच डिलर आहोत. कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी, ज्येष्ठ, तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही डील केले. काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे झाले. मोदींच्या काळात एकही घोटाळा बाहेर आला नाही. पहिल्या कॅबिनेटपासून ते शेवटच्या कॅबिनेटपर्यंत 500 निर्णय घेतले. एक पॉझिटीव्हीटी आणण्याचं काम आम्ही केलं आहे. लोकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत नक्की होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं. केंद्राने आम्हाला पूर्ण पाठबळ दिलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेनेदेखील आम्हाला भरभरून पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content